शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

कालव्याची पाळ पावसाळ्यापूर्वी बांधण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 00:46 IST

डाव्या कालव्यावर सोमनाळा गेट नं. १ च्या समोर कालव्यात पाणी सोडल्यावर नेहमी पाळ फुटते. परिणामी परिसरातील शेतीला धोका निर्माण होतो. पाळ ज्या ठिकाणी फुटत असते तिथे पावसाळ्यापुर्वी सिमेंट काँक्रीटचे पक्के बांधकाम धरण विभाग, डावा कालवा वाही यांनी करावे, अशी आजुबाजूच्या शेतकऱ्यांची मागणी आहे.

ठळक मुद्देसोमनाळा गेटसमोरील डावा कालवा : अन्यथा पिकांना बसू शकतो फटका

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा (कोसरा) : डाव्या कालव्यावर सोमनाळा गेट नं. १ च्या समोर कालव्यात पाणी सोडल्यावर नेहमी पाळ फुटते. परिणामी परिसरातील शेतीला धोका निर्माण होतो. पाळ ज्या ठिकाणी फुटत असते तिथे पावसाळ्यापुर्वी सिमेंट काँक्रीटचे पक्के बांधकाम धरण विभाग, डावा कालवा वाही यांनी करावे, अशी आजुबाजूच्या शेतकऱ्यांची मागणी आहे.सध्या डाव्या कालव्याचे काम इंदिरा सागर धरणापासून १० कि़मी. पर्यंत प्रगतीपथावर आहे. या कालव्याचे १० कि़मी. पर्यंत अस्तरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. यापुढे भांगडिया कंन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम आहे. पण त्यांच्या संथगतीमुळे शेतकºयाना यावर्षी देखिल सिंचनापासून वंचित राहावे लागणार आहे. १० कि़मी. च्या आतमध्ये डाव्या कालव्यावर सोमनाळा गेट क्रमांक १ आहे. ही गेट उघडल्यानंतर कालव्याचे पाणी प्रचंड वेगाने सेंद्री, भावड, खैरी गावाकडे जात असते. सोमनाळा गेटच्या अगदी समोरील उजव्या भागात पाण्यामुळे रस्ता उखडतो व डावा कालवा फुटण्याचा प्रकार पावसाळ्यात झाला. मागील पावसाळ्यात गेटच्या समोरची पाळ फूटून कोंढा गावच्या बाजुकडील शेतात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. वेळीच धरण विभाग, वाही यांनी लक्ष देवून डावा कालवा फुटू दिला नाही.चौरास भागात कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जाते. यावेळी डाव्या कालव्यात पाणी सोडावे लागेल. याशिवाय चौरास भागातील धान पिक होऊ शकत नाही. तेव्हा डाव्या कालव्याची पाट सोमनाळा गेटसमोर पक्क्या सिमेंटने बांधण्याची गरज आहे. यासंदर्भात मुख्य अभियंता (डावा कालवा,वाही) यांनी या कामाचे अंदाजपत्रक तयार करून ते काम त्वरित करून घ्यावे, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.