शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना प्रतिबंधासाठी लग्न पुढे ढकलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:33 IST

मांढळ येथील घटना लाखांदूर : दोन भिन्न गोत्रातील नव वर-वधूच्या लग्नसमारंभाची तारीख सुनिश्चित करण्यात आली. लग्न तारीख निश्चित ...

मांढळ येथील घटना

लाखांदूर : दोन भिन्न गोत्रातील नव वर-वधूच्या लग्नसमारंभाची तारीख सुनिश्चित करण्यात आली. लग्न तारीख निश्चित झाल्याने उभय कुटुंबीयांकडून लग्नसमारंभासाठी आवश्यक साहित्याची खरेदी व लग्नपत्रिका काढून त्यांचे वितरण आप्तेष्टांसह मित्रपरिवारातदेखील करण्यात आले. मात्र, तालुक्यात अचानक कोरोना विषाणूचा प्रभाव वाढल्याने या विषाणूच्या संभाव्य संसर्गाची खबरदारी घेत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून निश्चित झालेले लग्न कोरोना पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आले आहे. हे लग्न दोन्ही नव वर-वधू परिवारांकडून पुढे ढकलण्यात आल्याने जनतेत या दोन्ही परिवारांच्या या निर्णयाचे कौतुक केले जात आहे. या समाजाला प्रेरणादायी व आदर्शवत ठरणारा निर्णय तालुक्यातील मांढळ गावात घेण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील मांढळ गावातील एका नववधूचे आंतरतालुक्यातील एका नव वरासोबत लग्न पक्के करण्यात आले. लग्न पक्के होताच लग्नाची तारीखदेखील निश्चित करण्यात आली. या तारखेनुसार हे दोन्ही नव वर-वधू ११ एप्रिल रोजी सामाजिक रितीरिवाजानुसार विवाह बंधनात अडकणार होते. हे लग्न नववधूच्या राहत्या घरी पार पाडले जाणार होते.

दरम्यान, तालुक्यात गत काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना तालुक्यातील तीन गावे कोरोना पार्श्वभूमीवर प्रतिबंधितदेखील करण्यात आली. या संबंध परिस्थितीची दखल घेत ग्रामीण भागातील मांढळ गावात लग्न समारंभासाठी होणारी गर्दी व त्यामुळे कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेता स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने लग्नाची तारीख पुढे ढकलण्याची सूचना केली.

या सूचनेनुसार नववधूकडील परिवाराने नव वराच्या परिवाराकडे लग्नाची तारीख पुढे ढकलण्यासंबंधाने सकारात्मक चर्चा केली. त्यानुसार वर-वधू परिवारांच्या संमतीने लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली.

दरम्यान, कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासन स्तरावर नियमित निर्देश व प्रतिबंधात्मक उपययोजना निर्गमित केल्या जात असताना बहुतांश ठिकाणी नागरिकांकडून निष्काळजी व हलगर्जीपणा होऊन नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या अनेक घटना समाजात घडताना दिसत आहेत. मात्र, लग्नसंबंधामधून दोन भिन्न गोत्रांची खूणगाठ बांधणारा लग्नसोहळा कोरोना पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आल्याने दोन्ही नव वर-वधू परिवारांनी घेतलेला निर्णय समाजासाठी प्रेरणादायी व कौतुकास्पद ठरल्याचे बोलले जात आहे.