शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

नद्या काठावरील गावात दूषित पाण्याचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:47 IST

चुल्हाड (सिहोरा) : वैनगंगा, बावणथडी नद्याचे काठावर असणाऱ्या सिहोरा परिसरातील गावात दूषित व गढूळ पाण्याचा पुरवठा नागरिकांना होत ...

चुल्हाड (सिहोरा) : वैनगंगा, बावणथडी नद्याचे काठावर असणाऱ्या सिहोरा परिसरातील गावात दूषित व गढूळ पाण्याचा पुरवठा नागरिकांना होत आहे. जलशुद्धीकरण केंद्राकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नागरिकांवर जलजन्य आजाराचे संकट ओढवले आहे. गावात आजाराची साथ येण्याची शक्यता आहे. नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. गावात कावीळचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने गावठी उपचारासाठी नागरिक धाव घेत आहेत. यात प्रशासन बेखबर असल्याचे दिसून येत आहे.

कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावानंतर नागरिक बाहेर पडत असताना नव्या संसर्ग जलजन्य आजाराच्या गर्तेचे संकट प्रतीक्षा करीत आहे.

सिहोरा परिसरातून वैनगंगा, बावणथडी नद्या बारमाही वाहणाऱ्या आहेत. या नळयोजनांना जलशुद्धीकरणाची सोय नसल्याने गढूळ व दूषित पाण्यावर नागरिकांना तहान भागवावी लागत आहे. पावसाळ्याचे पाहिले पाणी नदी पात्रात पोहोचले असून पाणी गढूळ झाले आहे. गढूळ व दूषित पाणी नागरिकांना नळ योजनेने उपलब्ध केले जात आहेत. ग्रामपंचायतीने पाण्याचे टाकीत ब्लिचिंग पावडरचे मिश्रण करीत असले तरी जलशुद्धीकरण होत नाही. पाण्याचा लाल व पिवळसर रंग बदलत नाही. या दूषित व गढूळ पाण्यामुळे नागरिकांत भीती निर्माण झाली आहे.

लहान बालकांतील कावीळचे वाढते प्रमाण असल्याने पालकांच्या मनात रोष आहे. गढूळ व दूषित पाणी पुरवठा होत असल्याने उपाय योजना करण्यासाठी ग्रामपंचायतींनी अद्याप पुढाकार घेतला नाही. नळ योजना असणाऱ्या गावांत नागरिक हातपंपाच्या पाण्यावर तहान भागविण्यासाठी धाव घेत आहेत. सुकली नकुल, सिहोरा, येरली अशा तीन योजना परिसरात आहेत. परंतु यात सिहोरा गावातील योजना वगळता दोन्ही योजना आटल्या आहेत. दोन्ही योजना भंगारात निघाल्या आहेत. नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे बाबतीत शासनाची उदासीनता नागरिकांचे जिवावर बेतणारी ठरत आहे. परंतु कुणी गंभीर होताना दिसत नाही.

बॉक्स

सुकली प्रादेशिक योजना सुरु करा

बपेरा गावांचे हद्दीत असणाऱ्या सुकली नकुल प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला संजीवनी देण्याची ओरड नागरिक करीत आहेत. बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रातील गावांना ही योजना पाणीपुरवठा करीत आहे. परंतु या योजनेला गुंडाळण्यात आल्याने शुद्ध पाण्यापासून नागरिक वंचित झाले आहेत. पावसाळ्याचे तीन महिने या योजनेचे पाणीपुरवठा करण्याची मागणी युवा नेते किशोर राहगडाले, भाजयुमोचे विनोद पटले, सरपंच वैशाली पटले, ग्रामपंचायत सदस्या शीतल चिंचखेडे, सरपंच पारस भुसारी, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देवेंद्र मेश्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते राजेंद्र बघेले, सामाजिक कार्यकर्ते यादोराव बोरकर, सरपंच ममता राऊत, माजी सरपंच हरिकिशन बनकर यांनी केली आहे.