शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दूषित पाण्याचा पुरवठा नागरिकांच्या जीवावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 14:36 IST

शुद्ध पाणीपुरवठा ठरले दिवास्वप्न : अजूनही जलवाहिनींची कामे अपूर्णच

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : हाकेच्या अंतरावर जीवनदानींनी वैनगंगा नदी बारमाही वाहत असताना, भंडारेकरांना शुद्ध पाणी मिळत नाही. वाढीव पाणीपुरवठा योजना अंमलात येईल, आपल्यालाही मुबलक शुद्ध पाणी मिळेल, या आशेवर भंडारेकर चातकासारखी वाट पाहत आहेत, परंतु दूषित पाणीपुरवठा दीड लाख नागरिकांच्या जीवावर बेतला. लिकेजसह दूषित पाण्याची समस्या सुटत नसल्याचे बघून अनेकांनी नळाचे पाणी पिणेच सोडून दिले. आरोग्य व अन्य स्त्रोतांच्या भरोशावर तहान भागविली जात आहे.

खरे सांगितले, तर भंडारा शहरातील पाणीपुरवठा हा तसा जीवंत विषय, परंतु राजकारणात वाहत्या पाण्यालाही संथगती देण्यात आली. अशीच बाब योजनेच्या अंमलबजावणीतही झाली. सात वर्षांपासून डीपीआर ते अंतिम टप्पा गाठण्यापर्यंतच्या सर्वच कामाला प्रचंड उशीर झाला. उशीर कुणामुळे झाला?, का झाला?, याचा विचार न करता लवकरात लवकर शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्नही नगरपालिका प्रशासनाने केला नाही. दोन वर्षांपासून प्रशासकांचे राज असल्याने ती योजना पुन्हा वांद्यात आली की काय, असे वाटू लागले होते, परंतु हळूहळू का असेना पाणीपुरवठ्याची कासवगती सुरूच आहे. मध्यंतरी टेस्टिंग पूर्ण झाली. दोन महिन्यांतच पाणी मिळणार आहे, अशी घोषणा करण्यात आली.

मात्र, त्यानंतर काहीच झाले नाही. काही सामाजिक संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिल्यावर नगर परिषद प्रशासन हरकतीमध्ये आले, मात्र तिथेही आश्वासनाखेरीज काहीच मिळाले नाही. चार नवीन जलकुंभ व दोन जुन्या जलकुंभाच्या आधारे भंडारा शहरातील पावणेदोन लाख लोकसंख्येला शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जाणार होता, मात्र नदीत पाणी आणि गावात बोंब, अशी स्थिती पुन्हा उन्हाळ्यात भंडारेकरांसमोर येऊन ठेपली. वाढीव पाणीपुरवठा योजनेंतर्गत भंडारात चार ठिकाणी नवे जलकुंभ तयार करण्यात आले, मात्र जिल्हा परिषद चौक परिसराला लागून असलेल्या विदर्भ हाऊसिंग कॉलनीमध्ये जलकुंभ बांधकाम प्रकरण न्यायालयात असल्याने या योजनेचे भविष्यच अधांतरी असल्याची दिसत आहे.

खरे सांगा, का झाली नाही योजना पूर्ण ?पाणीपुरवठ्याचा विषयावर भंडारेकर आता चांगलेच संताप व्यक्त करू लागले आहेत. ठिकठिकाणी जलवाहिनीसाठी खोदलेले रस्ते नागरिकांच्या जीवावर उठले आहेत. त्यातच भरीस भर म्हणून भूमिगत गटार योजनेचाही खिंडार पडली. शहरातील रस्ते अधिकच विद्रूप झाले. चला शुद्ध पाणी मिळेल यापोटी नागरिकांनी हे सहन केले, पण आता पाणीपुरवठा होत नसल्याने, खरे सांगा, पाणीपुरवठा योजना पूर्ण का झाली नाही, असा जाब विचारण्यात येत आहे.

योजना गेली १६० कोटींवर■ ६८ कोटींपासून सुरुवात झालेल्या योजनेत ६५ कोटींनी वाढ झाली. १३५ कोटींची योजना आजघडीला १६० कोटींच्या वर गेली आहे. दिवसांगणिक यात वाढ होत आहे. पाइपलाइनची कामे अजूनही व्हायची आहेत. दूषित व गंजलेली पाइपलाइन केव्हा काढणार?, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. वाढीव पाणीपुरवठा योजनेनंतरही दूषित पाणी मिळणार का? असा सवाल आहे.

कुणी कुणी धुतले हात?■ सात वर्षापूर्वी या योजनेची किंमत ६८ कोटी इतकी होती, मात्र सुरुवातीला फक्त ५० लाख रुपये मंजूर झाले होते. पुन्हा नव्या दमाने योजनेचा प्रस्ताव पाठविण्यात आला. तब्बल ६५ कोटींनी या वाढीव पाणीपुरवठा योजनेची किमत वाढली. आजघडीला या प्रकल्पाची किंमत वाढतच आहे. यातच सत्ताधाऱ्यांनी व संबंधित कंत्राटदार कंपनीने चांगले हात धुतल्याची ओरड होत आहे. सुरुवातीला हाती काम घेतलेल्या 'त्या' कंपनीने येथून पोबाराही केला. बिलांचे वाटपही झाले. कोरोनात योजना माघारली. कामे ठप्प पडली. जनतेचा कोट्यवधी रुपया पाण्यात वाया गेला.

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater pollutionजल प्रदूषणwater transportजलवाहतूक