शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

चुलीच्या धुरामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2020 6:00 AM

लाखांदुर तालुक्यातील बोटावर मोजण्या इतक्या शाळांमध्ये गॅस पोहोचला आहे. त्यामुळे अन्य शाळांतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे शासनाच्या वतीने स्वयंपाक करताना घरातील धुरांपासून माहिलांची सुटका व्हावी यासाठी शासनाने उज्ज्वला गॅस योजना सुरू केली.

ठळक मुद्देयोजना असूनही लाभ मिळेना । शाळांमधील पोषण आहार अजूनही चुलीवरच

रविंद्र चन्नेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कबारव्हा : लाखांदुर तालुक्यातील बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार म्हणून दिली जाणारी खिचडी अजुनही चुलीवरच शिजत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना धुराचा त्रास सहन करत शिक्षण घ्यावे लागत असल्याने त्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.लाखांदुर तालुक्यातील बोटावर मोजण्या इतक्या शाळांमध्ये गॅस पोहोचला आहे. त्यामुळे अन्य शाळांतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे शासनाच्या वतीने स्वयंपाक करताना घरातील धुरांपासून माहिलांची सुटका व्हावी यासाठी शासनाने उज्ज्वला गॅस योजना सुरू केली. तसेच दारिर्द्य रेषेखालील तसेच गरीब कुटुंबांना मोफत घरगुती गॅसजोडणी देणे हा या योजनेचा उद्देश आहे. मात्र शाळांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून खिचडी चुलीवर शिजवली जात आहे. यावरून शासनाने सुरू केलेली ही योजना सरकारच्या शाळांमध्ये वापरली जात नसल्याचे दिसून येत आहे.ग्रामीण भागात सरपणाच्या साहाय्याने स्वयंपाक केला जात असल्याने झाडांची मोठ्या प्रमाणात तोड केली जात होती. केंद्र शासनाने २०१६ मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली. यात महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांच्या आरोग्याची निगा राखणे स्वयंपाकासाठी लाकडी सरपण वापरल्यामुळे लहान बालके व महिलांना होणारे श्वसनाच्या तक्रारी दुर करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.परंतु तालुक्यातील शाळांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून खिचडी चुलीवर शिजत आहे. शालेय पोषण आहार तयार करण्यासाठी महिलांची नेमणूक केली जाते. त्यांना महिन्याला मानधन दिले जाते, मात्र खिचडी करताना त्यांना धुरांचा सामनाही करावा लागतो.धुरमुक्त शाळा करण्यासाठी शासनाने गॅस सिलिंडरची व्यवस्था केली आहे. मात्र याचा लाभ तालुक्यातील बहुतांश शाळांना मिळालेला नाही. परिणामी धूरमुक्तीची कल्पना कागदावरच मिरविली जात असल्याचे दिसून येते.

टॅग्स :Studentविद्यार्थी