शहरं
Join us  
Trending Stories
1
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
2
“मोदी सरकार काय लपवायचा प्रयत्न करत आहे?”; SIR वरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा सवाल
3
याला म्हणतात 'इंटरनॅशनल बेइज्जती'! रशियन तरुणींना कोणत्या देशाचे तरुण सर्वाधिक आवडतात? पाकिस्तानी ब्लॉगरचा VIDEO पाहून हसू आवरणार नाही!
4
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
5
SIR वरुन पश्चिम बंगालमध्ये तणाव वाढला; कोलकात्यात शेकडो BLO चे तीव्र आंदोलन...
6
“CM असताना अडीच तासांपेक्षा जास्त कधी झोपलो नाही, विरोधकांची झोप उडवली”: एकनाथ शिंदे
7
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
8
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
9
तीन स्मार्ट मैत्रिणी अन् महिन्याला लाखोंची कमाई ! ब्रम्होसची माहिती देत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांतला केवळ तीन वर्षांची शिक्षा
10
लैंगिक शोषणाच्या तक्रारींची भिती दाखवणाऱ्या प्राध्यापकाला इतकी सौम्य शिक्षा कशी? चार प्राध्यापकांची केली होती फसवणूक
11
IND vs SA: रोहित शर्मासोबत एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? विराट कोहलीही टक लावून बघतच बसला...
12
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
13
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
14
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
15
Video: Kiss घेण्याचा मोह...; प्रेमी जोडप्याचे मालगाडी खाली बसून 'नको ते' चाळे अन् अचानक... 
16
हृदयद्रावक! शेतीसाठी घेतलं १५ लाखांचं कर्ज पण पुराने पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
17
Travel : मुंबईजवळची 'ही' ठिकाणं पाहिल्यावर गोवाही विसराल! न्यू इअर सेलिब्रेशनसाठी बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन्स
18
मामला 'गंभीर' है...! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
19
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
20
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा स्थानिक स्वराज्य संस्था आरक्षणही अडकू शकते वादात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:37 IST

मुखरू बागडे पालांदूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडीची सर्वांना प्रतीक्षा लागली असताना सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या टक्केवारीवरून दिलेल्या ...

मुखरू बागडे

पालांदूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडीची सर्वांना प्रतीक्षा लागली असताना सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या टक्केवारीवरून दिलेल्या निर्णयाने जिल्ह्यातील इच्छुकांची चिंता वाढली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे आरक्षण यापूर्वीच घोषित झाले आहे. ५२ जागांपैकी २६ जागा महिलांना आरक्षित आहेत. यात जातनिहाय आरक्षण करण्यात आले आहे. सदर आरक्षण ५० टक्केच्या वर जात असल्याने स्थानिक स्वराज्य संस्था आरक्षणही वादात अडकण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाने धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, नागपूर व पालघर या सहा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील आरक्षणाचे चित्र डोळ्यासमोर ठेवून नागरिकांच्या मागास प्रवर्गात ५० टक्केच्या वर आरक्षण केल्याचे दिसून आले. त्यामुळे येथील निवडणूक पुन्हा घेण्याचे सुचविले आहे. त्यामुळे उमेदवारासह प्रशासनसुद्धा अडचणीत सापडले आहेत. हीच परिस्थिती भंडारा जिल्ह्यात येऊ नये यासाठी आरक्षणात असलेला घोळ निवडणुकीपूर्वी निकालात काढून निश्चित असलेल्या आरक्षणाच्या आधारे निवडणूक घ्यावी अशी चर्चा आहे.

२०१० ते २०१५ या वर्षात महिलांना ३३ टक्के आरक्षण होते. २०१५ ते २०२० या वर्षात शासकीय नियमानुसार महिलांना ५० टक्के आरक्षण लागू करण्यात आले. या आरक्षणानुसार भंडारा जिल्ह्यात ५२ जिल्हा परिषद गटांपैकी जातनिहाय आरक्षणानुसार २६ जागांवर महिलांना आरक्षण दिले. त्यामध्ये गत आरक्षित २६ महिला गटात पुन्हा महिलांना आरक्षण न देता फिरत्या चक्रानुसार ते गट खुल्या प्रवर्गासाठी देण्यात यावे अशी सर्वसाधारण मतदारांची मागणी आहे. मात्र यात २०१५-२० या वर्षात आता जे ते महिलांना आरक्षण देण्यात आले होते त्यात जिल्हा परिषद गटात सुमारे १३ महिलांना पुन्हा आरक्षण दिल्याची माहिती आहे. त्यामुळे आरक्षणाचा गुंता वाढण्याची शक्यता आहे. आरक्षणाची सरासरी ५१.५० टक्के जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकाही वादात अडकण्याची शक्यता आहे.

बाॅक्स

इच्छुक लागले कामाला

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा केव्हाही होऊ शकते. त्यासाठी निवडणुक इच्छुक उमेदवार आणि राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. अनेकांनी जनसंपर्क वाढविला असून कोरोना संक्रमण काळात गावोगावी फिरून जनजागृतीच्या माध्यमातून मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न होत आहे. पंचायत समितीसाठीही अनेकजण इच्छुक असून ग्रामपंचायत निवडणुकीनंतर गणित आखले जात आहेत.

कोट

जिल्हा परिषदेच्या ५२ जागांपैकी अर्ध्या जागा महिलांसाठी सोडलेल्या आहेत. यात फिरत्या चक्रानुसार ज्या ठिकाणी महिला होत्या त्या ठिकाणी सर्वसाधारणसाठी जागा सोडून तिढा सोडवावा. कोणत्याही प्रवर्गाला ५० टक्केच्या वर जागा जाणार नाही याचा अभ्यास करुन निर्णय घ्यावा. जेणेकरून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा मान ठेवून निवडणूक लढली जाईल.

- भरत खंडाईत, माजी सदस्य जिल्हा परिषद भंडारा.