शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

भंडारा स्थानिक स्वराज्य संस्था आरक्षणही अडकू शकते वादात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:37 IST

मुखरू बागडे पालांदूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडीची सर्वांना प्रतीक्षा लागली असताना सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या टक्केवारीवरून दिलेल्या ...

मुखरू बागडे

पालांदूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडीची सर्वांना प्रतीक्षा लागली असताना सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या टक्केवारीवरून दिलेल्या निर्णयाने जिल्ह्यातील इच्छुकांची चिंता वाढली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे आरक्षण यापूर्वीच घोषित झाले आहे. ५२ जागांपैकी २६ जागा महिलांना आरक्षित आहेत. यात जातनिहाय आरक्षण करण्यात आले आहे. सदर आरक्षण ५० टक्केच्या वर जात असल्याने स्थानिक स्वराज्य संस्था आरक्षणही वादात अडकण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाने धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, नागपूर व पालघर या सहा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील आरक्षणाचे चित्र डोळ्यासमोर ठेवून नागरिकांच्या मागास प्रवर्गात ५० टक्केच्या वर आरक्षण केल्याचे दिसून आले. त्यामुळे येथील निवडणूक पुन्हा घेण्याचे सुचविले आहे. त्यामुळे उमेदवारासह प्रशासनसुद्धा अडचणीत सापडले आहेत. हीच परिस्थिती भंडारा जिल्ह्यात येऊ नये यासाठी आरक्षणात असलेला घोळ निवडणुकीपूर्वी निकालात काढून निश्चित असलेल्या आरक्षणाच्या आधारे निवडणूक घ्यावी अशी चर्चा आहे.

२०१० ते २०१५ या वर्षात महिलांना ३३ टक्के आरक्षण होते. २०१५ ते २०२० या वर्षात शासकीय नियमानुसार महिलांना ५० टक्के आरक्षण लागू करण्यात आले. या आरक्षणानुसार भंडारा जिल्ह्यात ५२ जिल्हा परिषद गटांपैकी जातनिहाय आरक्षणानुसार २६ जागांवर महिलांना आरक्षण दिले. त्यामध्ये गत आरक्षित २६ महिला गटात पुन्हा महिलांना आरक्षण न देता फिरत्या चक्रानुसार ते गट खुल्या प्रवर्गासाठी देण्यात यावे अशी सर्वसाधारण मतदारांची मागणी आहे. मात्र यात २०१५-२० या वर्षात आता जे ते महिलांना आरक्षण देण्यात आले होते त्यात जिल्हा परिषद गटात सुमारे १३ महिलांना पुन्हा आरक्षण दिल्याची माहिती आहे. त्यामुळे आरक्षणाचा गुंता वाढण्याची शक्यता आहे. आरक्षणाची सरासरी ५१.५० टक्के जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकाही वादात अडकण्याची शक्यता आहे.

बाॅक्स

इच्छुक लागले कामाला

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा केव्हाही होऊ शकते. त्यासाठी निवडणुक इच्छुक उमेदवार आणि राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. अनेकांनी जनसंपर्क वाढविला असून कोरोना संक्रमण काळात गावोगावी फिरून जनजागृतीच्या माध्यमातून मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न होत आहे. पंचायत समितीसाठीही अनेकजण इच्छुक असून ग्रामपंचायत निवडणुकीनंतर गणित आखले जात आहेत.

कोट

जिल्हा परिषदेच्या ५२ जागांपैकी अर्ध्या जागा महिलांसाठी सोडलेल्या आहेत. यात फिरत्या चक्रानुसार ज्या ठिकाणी महिला होत्या त्या ठिकाणी सर्वसाधारणसाठी जागा सोडून तिढा सोडवावा. कोणत्याही प्रवर्गाला ५० टक्केच्या वर जागा जाणार नाही याचा अभ्यास करुन निर्णय घ्यावा. जेणेकरून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा मान ठेवून निवडणूक लढली जाईल.

- भरत खंडाईत, माजी सदस्य जिल्हा परिषद भंडारा.