शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

सावधान ! जिल्ह्यात वाढताहेत कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:00 IST

१ मार्च ते १२ मार्चच्या दरम्यान १९ हजार ६७१ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ५१९ जणांना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात भंडारा शहरातील ३२० रुग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे १ मार्च राेजी २६ रुग्णांची नोंद झाली होती. १० मार्चपर्यंत हा आकडा ५० च्या आत होता. परंतु गुरूवारपासून रुग्णांची संख्या वाढायला लागली. गुरूवारी जिल्ह्यात ६१ रुग्णांची नोंद झाली. तर शुक्रवारी तब्बल ७५ रुग्ण आढळून आले.

ठळक मुद्देमार्चमध्ये ५१९ रुग्णांची नोंद : सर्वाधिक ३२० रुग्ण भंडारा शहरात, शुक्रवारी ७५ पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यात सर्वत्र फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली असताना भंडरा जिल्ह्यात रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. मात्र आता मार्च महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढायला लागली. मार्चच्या अवघ्या बारा दिवसात जिल्ह्यात ५१९ रुग्ण आढळून आले असून त्यात एकट्या भंडारा तालुक्यातील ३२० रुग्णांचा समावेश आहे. शुक्रवारी तर अलीकडच्या काळातील सर्वाधिक ७५ रुग्णांची नोंद झाली. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना नागरिक मात्र कोणत्याही नियमांचे पालन करताना दिसत नाही. नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही तर भंडारा शहरातही लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.भंडारा जिल्ह्यात लॉकडाऊनच्या सुरूवातीपासून कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा अपवाद वगळला तर रुग्णांची संख्या वाढली नाही. जिल्ह्यात आतापर्यंत १४ हजार १९३ रुग्णांची नोंद झाली आहे. जानेवारी महिन्यापासून तर कोरोना रुग्णांची संख्या एकदम कमी झाली होती. त्यामुळे सर्व निर्बंध शिथील झाले. नागरिक बिनबोभाटपणे नियमांना पायदळी तुडवत शहरात भटकू लागले. नागपूरसह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली. ही भंडारा जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा होती. परंतु नागरिक त्यानंतरही नियम पाळताना दिसत नव्हते. परिणामी आता हळूहळू का होईना रुग्णांची संख्या वाढायला लागली आहे.१ मार्च ते १२ मार्चच्या दरम्यान १९ हजार ६७१ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ५१९ जणांना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात भंडारा शहरातील ३२० रुग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे १ मार्च राेजी २६ रुग्णांची नोंद झाली होती. १० मार्चपर्यंत हा आकडा ५० च्या आत होता. परंतु गुरूवारपासून रुग्णांची संख्या वाढायला लागली. गुरूवारी जिल्ह्यात ६१ रुग्णांची नोंद झाली. तर शुक्रवारी तब्बल ७५ रुग्ण आढळून आले. विशेष म्हणजे सुरूवातीला दीड हजाराच्या आसपास चाचण्या केल्यानंतर सरासरी ५० च्या आत रुग्ण आढळत होते. परंतु शुक्रवारी केवळ ६२१ रुग्णांच्या चाचण्या केल्या असता तब्बल ७५ रुग्ण आढळून आले. ही भंडारा जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा आहे. आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाने नागरिकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देत आहे. परंतु नागरिक त्या पायदळी तुडवत आहे.

ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या ४४६

जिल्ह्यात ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या शंभरच्या आत आली असताना गत बारा दिवसात ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या मात्र वेगाने वाढत आहे. सध्या जिल्ह्यात ४४६ ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. यापैकी कुणीही गंभीर आजारी नसले तरी ॲक्टीव्ह रुग्णांची वाढती संख्या धोक्याची घंटा ठरू पाहत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ॲक्टीव्ह रुग्ण भंडारा तालुक्यात २६९ आहेत. मोहाडीत १८, तुमसर ६१, पवनी २७, लाखनी ४१, साकोली २७ आणि लाखांदूरमध्ये अवघे तीन रुग्ण आहेत.

मार्च महिन्यात केवळ एक मृत्यू भंडारा जिल्ह्यात रुग्णांच्या मृत्यूचा दर सुरूवातीपासूनच अल्प आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३२८ रुग्णांचा मृत्यू झाला. मार्च महिन्यात केवळ भंडारा तालुक्यातील एका वृद्धेचा कोरोनाने मृत्यू झाला. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर २.३१ टक्के आहे तर रुग्ण बरे होण्याचा दर ९४.५५ टक्के आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या