शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

अटलजींना ऐकण्यासाठी उसळला होता जनसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 00:46 IST

आपल्या आमोघ वाणीने संपूर्ण देशवासीयांना मंत्रमुग्ध करणारे कवीहृदयाचे अटलबिहारी वाजपेयी यांना ऐकण्यासाठी भंडारा शहरातील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलावर जनसागर उसळला होता. २००४ च्या एप्रिल महिन्याच्या झालेली अटलजींची भंडारा येथील प्रचार सभा आजही अनेकांच्या स्मरणात आहे.

ठळक मुद्देअमोघ वाणीने श्रोते मंत्रमुग्ध : १४ वर्षांपूर्वी भंडारा येथे झालेल्या सभेतील आठवणींना उजाळा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आपल्या आमोघ वाणीने संपूर्ण देशवासीयांना मंत्रमुग्ध करणारे कवीहृदयाचे अटलबिहारी वाजपेयी यांना ऐकण्यासाठी भंडारा शहरातील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलावर जनसागर उसळला होता. २००४ च्या एप्रिल महिन्याच्या झालेली अटलजींची भंडारा येथील प्रचार सभा आजही अनेकांच्या स्मरणात आहे. जीवाचे कान करुन अटलजींचा एक-एक शब्द अनेकांनी आपल्या हृदयात साठवून ठेवला. गुरुवारी अटलजींच्या निधनाचे वृत्त धडकताच या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.लोकसभा निवडणूकीच्या प्रचार सभेच्या एप्रिल २००४ साली अटलजी भंडारा शहरात आले होते. भाजपाचे उमेदवार शिशुपाल पटले यांच्या प्रचारासाठी छत्रपती शिवाजी जिल्हा क्रीडा संकुलावर सभा आयोजित होती. गर्दीने खचाखच भरलेल्या या मैदानावर अटलजींचे सायंकाळच्या सुमारास निळ्या रंगाच्या कारमधून आगमन झाले. भंडाराच्या भूमीवर पाय ठेवताच त्यांना पाहण्यासाठी प्रत्येकजण आतुर झाला होता. अटलजींना जवळून पाहता यावे म्हणून प्रत्येकजण धडपडतांना दिसत होता. यानंतर अटलजींचे मंचावर आगमन झाले. आपल्या ओघवता शैलीने त्यानी भंडारेकरांच्या हृदयात हात घातला. त्यावेळी अटलजी म्हणाले होते ‘जनमत ही तय करेगा प्रधानमंत्री’. या प्रचार सभेनंतर भाजपाचे शिशुपाल पटले निवडणूक जिंकले. खरे श्रेय अटलजींच्या याच सभेला जाते, असे जुने जानते नागरिक सांगतात.अटलबिहारी वाजपेयी व भंडारा जिल्ह्याच्या ऋणानूबंध फार जुना आहे. गोंदिया जिल्ह्याचे विभाजन होण्यापुर्वी मार्च १९७२ साली ते भारतीय जनसंघाच्या कार्यक्रमासाठी ते गोंदियात आले होते. तर १९ फेब्रुवारी १९७८ रोजी तुमसर येथे विधानसभेच्या प्रचारसभेला त्यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी ते देशाचे विदेशमंत्री होते. १९८० साली लक्ष्मणराव मानकर यांच्या प्रचारासाठी त्यांची सभा शिवाजी स्टेडीयम (चिचबन मैदान) येथे झाली होती. या सभेने गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडले होते. ३० नोव्हेंबर १९८३ रोजी भंडारा जिल्हा परिषदेच्या भवनाचे उद्घाटन अटलबिहारी वाजपेयी यांच्याच हस्ते करण्यात आले. तर १० जानेवारी १९८६ रोजी साकोली येथे झालेल्या किसान संमेलनात त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्यासोबत शामरावबापू कापगते, राधेश्याम अग्रवाल (बाथड), महादेवराव शिवणकर, डॉ. खुशाल बोपचे उपस्थित होते. पालांदूर येथील गोविंद विद्यालयात १९८७ साली अटलजी आले होते. यावेळी त्यांच्यासोबत बापूसाहेब लाखनीकर होते. १९९० साली गांधी मैदानातील सभाही अनेकांच्या स्मरणात आहे. रामभाऊ आस्वले यांच्या निवडणूक प्रचारार्थ झालेली सभा सर्वांच्या स्मरणात आहे.भंडारा येथील १९८० च्या सभेतील आठवण सांगताना भाजपा जिल्हाध्यक्ष तारीक कुरैशी भावविभोर झाले. ते म्हणाले, अटलजींचा सभेतील एकुणएक शब्द आजही माझ्या कानात गुंजत आहे. ते म्हणाले होते, ‘राजनारायणजी बडे सहासी व्यक्तीमत्व के धनी है, वह बहुत बोलते है, लेकिन कहनेके लिए साहस की आवश्यकता होती है. लेकीन चुप रहना हो तो विवेक बडा जरुरी है.’ राजनारायण यांनी अटलजींची साथ सोडून चरणसिंग यांच्यासोबत लोकदलात प्रवेश केला होता. त्यावरुन अटलजींनी आपल्या भाषणातून अशी कोटी केली होती.करोडो देशवासीयांना आपल्या वाणीने मंत्रमुग्ध करणारा अमोघ वक्ता ऐकण्याचे भाग्य भंडारातील जुन्या जानत्या नागरिकांना लाभले.भंडारा जिल्ह्यासोबत अटलजींचे जवळचे नातेमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि भंडारा जिल्हा यांचे अगदी जवळचे नाते आहे. आपल्या प्रदिर्घ राजकीय जीवनात त्यांनी अनेकदा भंडारा जिल्ह्याचा दौरा केला. ज्या-ज्यावेळी अटलजींची सभा झाली. तेव्हा तेव्हा त्यांना ऐकण्यासाठी चाहत्यांची प्रचड गर्दी झाली होती. अटलजींची साधी राहणी अनेकांना प्रभावीत करीत होती. भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रकाश मालगावे यांनी अटलजींच्या भंडारा दौऱ्यांच्या आठवणींना उजाळा दिला. अजातशत्रु व्यक्तीमत्वाचे धनी असलेल्या अटलजींकडे बघताच राष्ट्रभक्तींचा प्रत्यय येत होता. त्यांना अगदी जवळून पाहण्याच्या व ऐकण्याचा योग आला हे माझे भाग्य समजतो असे ते म्हणाले.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीBJPभाजपा