शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

साडेचार लाख कोटींचा एनपीए दडवला, अरुण जेटली यांनी केली यूपीए सरकारवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 1:04 AM

भांडवलदार व उद्योजकांच्या कर्जवाटपातील तब्बल साडेचार लाख कोटी रुपयांचा एनपीए आतापर्यंत दडवून ठेवण्यात आला होता. मोदी सरकारने नव्याने बँकांना ताळेबंद तयार करण्यास सांगितल्यानंतर तो बाहेर आला.

मुंबई : भांडवलदार व उद्योजकांच्या कर्जवाटपातील तब्बल साडेचार लाख कोटी रुपयांचा एनपीए आतापर्यंत दडवून ठेवण्यात आला होता. मोदी सरकारने नव्याने बँकांना ताळेबंद तयार करण्यास सांगितल्यानंतर तो बाहेर आला. यामुळेच हे सरकार भांडवलदारांना कर्जमाफी देते, ही केवळ कल्पना आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले आहे. या विषयावरून त्यांनी ब्लॉगवरून यूपीए सरकारवर अप्रत्यक्षरीत्या सडकून टीका केली.बुडीत कर्जाच्या डोंगरामुळे संकटात असलेल्या राष्टÑीयीकृत बँकांना केंद्र सरकारकडून भरघोस निधी दिला जात आहे. त्यामुळे हे सरकार भांडवलदारांची कर्जे माफ करीत असल्याची टीका होत आहे. याच कारणाने जेटली यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.सर्व राष्टÑीयीकृत बँकांना २०१५ मध्ये नव्याने ताळेबंद तयार करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर जून २०१७ मध्ये या बँकांचा आधीचा २.७८ लाख कोटी रुपयांचा एनपीए (बुडीत कर्जे) ७.३३ लाख कोटी रुपयांवर गेल्याचे बाहेर आले. तब्बल ४ लाख ५४ हजार ४६६ कोटी रुपयांचा एनपीए दहा वर्षांपासून दडवून ठेवण्यात आला होता. सन २००८ ते २०१४ या काळात या बँकांकडून होणाºया कर्जवाटपात ३४ हजार कोटी रुपयांची बेमालूम वाढ झाली.आता पारदर्शक ताळेबंद तयार करण्यात आल्याने हा एनपीए बाहेर आला. मागील दहा वर्षांतील बँकांचे हे नुकसान भरून काढण्यासाठीच केंद्राने त्यांना ७० हजार कोटी रुपये निधी पुरविण्याचा निर्णय घेतला. त्यापैकीच २.११ लाख कोटी रुपये येत्या दोन वित्तीय वर्षांत उभे केले जातील, असे जेटली यांनी स्पष्ट केले आहे.दिवाळखोरी नियमावलीबँकांकडून कर्ज घेऊन बुडविणा-यांविरुद्ध कारवाईसाठी केंद्र सरकारने नव्याने दिवाळखोरी नियमावली लागू केली. त्याअंतर्गत राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद स्थापन करून १२ मोठ्या कर्ज बुडव्यांकडून सहा ते नऊ महिन्यांत १.७५ लाख कोटी रुपये वसुलीची कारवाईसुद्धा सुरू झाली आहे, असेही जेटलींनी ब्लॉगवर स्पष्ट केले.

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीbankबँकGovernmentसरकार