शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यालयाला दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसणार चाप

By admin | Updated: February 9, 2015 23:06 IST

मुख्यालयात बोगस वास्तव्य दाखवून कर्मचारी शासकीय घरभाडे भत्त्याची चोरी करीत आहेत. यात घरमालक सहकार्य करीत असल्याने सिंदपुरी ग्रामपंचायतमध्ये ही चोरी थांबविण्यासाठी

रंजित चिंचखेडे - चुल्हाड (सिहोरा) मुख्यालयात बोगस वास्तव्य दाखवून कर्मचारी शासकीय घरभाडे भत्त्याची चोरी करीत आहेत. यात घरमालक सहकार्य करीत असल्याने सिंदपुरी ग्रामपंचायतमध्ये ही चोरी थांबविण्यासाठी ठराव पारीत करण्यात आला आहे. अशाप्रकारे ठराव घेणारी सिंदपुरी ग्रामपंचायत जिल्ह्यातील पाहिली ग्रामपंचयत ठरली आहे. ग्रामसभेत यासंदर्भात गावकऱ्यांनी निर्णय घेत गावात कार्यरत कर्मचाऱ्यांनी गावातच वास्तव्य करण्याचा ठराव पारित केला आहे. शासकीय कर्मचारी गावात अर्थात मुख्यालयी वास्तव्य न करता बाहेरगावाहून येतात. गावातील काही घरमालकांना आमिषाचा आधार घेत, हमीपत्र गोळा करीत आहेत. शासनाचे घरभाडे भत्त्याची उचल करण्यासाठी बोगस दस्तऐवजाचा आधार घेऊन निधी लाटतात. सामान्य नागरिकाने चोरी केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येते. परंतु कर्मचारी शिक्षित असतानासुद्धा शासकीय निधीचा खुलेआम अपव्यय होत आहे. यात घरमालक सहकार्य करीत आहेत. यामुळे कर्मचारी आणि घर मालकावर फौजदारी कारवाईकरिता पुढाकार घेण्यात येणार आहे. या आशयाचा ठराव ग्रामसभेत पारित करण्यात आला आहे. यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यात खळबळ उडाली आहे.तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरात ४७ गावे आहेत. या परिसरात शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, महसूल विभाग, पाटबंधारे विभाग, वनविभाग, कृषी विभाग, वीज वितरण कंपनी कार्यालय, पोलीस ठाणे, बँक तथा अन्य विभागाचे कार्यालय आहेत. या विभागाच्या सर्व कार्यालयात अंदाजे ६३० कर्मचारी कार्यरत आहेत. बोटावर मोजण्याइतपत कर्मचारी मुख्यालयात वास्तव्य करीत आहे. बहुतांश कर्मचारी गावात वास्तव्य करीत नसून सिहोरा, तुमसर आणि भंडारा या शहरात वास्तव्य करून अपडाऊन करीत आहे. हे कर्मचारी महिन्याकाठी १५०० रूपये घरभाडे भत्ता घेत आहेत. यामुळे महिन्याकाठी अंदाजे ९ लक्ष ४५ हजार रूपयाची उचल करण्यात येत आहेत. वर्षाला १ कोटी १३ लक्ष ४० हजार रूपयाला चुना लावण्यात येत आहेत. मुख्यालयात वास्तव्य करण्याचे कर्मचाऱ्यांना अनेक फर्माण देण्यात आले आहेत. परंतु खुद्द अधिकारी या आदेशाचे पालन करीत नसल्याने अधिनस्थ कर्मचारी ऐकत नाहीत. बोगस वास्तव्य दाखवून शासकीय तिजोरीची लुट करणारा आकडा चक्रावून सोडणारा आहे. या कर्मचाऱ्यावर कारवाईची धडक मोहिम आजवर राबविण्यात आली नाही. दरम्यान शासकीय कार्यालयात साहित्य चोरी झाल्यास पोलीस प्रशासन चोराला पिंजून काढत आहेत. परंतू मुख्यालयात वास्तव्य न करता कर्मचाऱ्यांना अभय मिळत आहे.