शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासन स्वच्छता अभियानाची दखल घेणार काय ?

By admin | Updated: November 18, 2014 22:51 IST

गावात स्वच्छता राहावी म्हणून संतानी आपल्या वाणीतून ग्रामस्थांना स्वच्छेतेचे महत्व सांगितले आहे. आता देशातील जनतेला स्वच्छता अभियानाचे महत्व विषद करण्यासाठी देशाचे

पालोरा (चौ) : गावात स्वच्छता राहावी म्हणून संतानी आपल्या वाणीतून ग्रामस्थांना स्वच्छेतेचे महत्व सांगितले आहे. आता देशातील जनतेला स्वच्छता अभियानाचे महत्व विषद करण्यासाठी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वत: हातात झाडू घेवून एक आदर्श समोर ठेवला आहे. पदाधिकाऱ्यांपासून विद्यार्थीही स्वच्छतेच्या कामाला लागले आहेत. मात्र आजही ग्रामीण भागातील जनतेला स्वच्छतेचे महत्व कळले नाही. गावागावात घाणच घाण पाहायला मिळत आहे. त्यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. तरीही स्वच्छतेबाबद कुणीही पुढाकार घेत नाही. मात्र पवनी तालुक्यातील मोखारा हा गाव जवळपास १,२०० लोकवस्तीचा आहे. हा गाव स्वच्छतेच्या बाबतीत तालुक्यात पुढे आहे. दररोज श्रम दानातून गावातील घाण स्वच्छ करणे हे त्यांचे नित्यक्रम झाले आहे. यात येथील लालचंद नखाते यांचा महत्वपूर्ण वाटा आहे. पूर्वी हा गाव व्यसनाधीन होता. गावात घाणच-घाण पाहायला मिळत होती. तेव्हा लालचंद नखाते यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने प्रथम गावात गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली. उच्च शिक्षित असून त्यांनी नोकरीच्या मागे न लागता गावाचा विकास करणे महत्वाचे ठरविले. स्वता हाता झाडू, पावळा, घमेला घेवून गाव स्वच्छतेला सुरुवात केली. जे नागरिक रस्त्यावर शौचालयाकरिता बसतात, कचरा रस्त्यावर टाकतात ते स्वच्छ करण्याचे काम सुरु केले. उन्हाळा पावसाळा, किंवा हिवाळा असो कशालाही न घाबरता लालचंद यांचे काम नित्यक्रमाचे ठरले होते. आजही पहाटेपासून संपुर्ण गावातील कचरा उचलण्याचे काम करित आहे. गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने दररोज सांयकाळी सामूहिक प्रार्थना केली जाते. आठवड्यातून एकदा संपूर्ण गावातील रस्ते पाण्याने स्वच्छ करुन प्रभात फेरी काढली जाते. संत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गावात वृक्षलागवड केली जाते. प्रशासनाच्या योजनेची वाट न पाहता प्रत्येकाने एक झाड लावून त्याची जोपासना करणे याबाबद गावकऱ्यांनी मोलाचा वाटा घेतला आहे. लालचंद मागील ३० वर्षापासून गावात स्वच्छता करीत आहे. वृक्षारोपण व स्वच्छतेबद्दल गावकऱ्यांना जागृत करण्यात यांचा मोलाचा वाटा आहे. आज हा गाव स्वच्छतेच्या बाबतील तालुक्यात अग्रेसर आहे. श्रमदानातून गावकरी गाव स्वच्छ करीत आहेत. गावातील बरेच नागरिक व्यसनापासून दूर झाले आहेत. गाव जरी लहान असला तरी शासनाच्या प्रत्येक योजना गावात सर्व मिळवून राबवीत असतात. लालचंदचा पुढाकार त्याचे कर्तव्य तालुक्यात चर्चचा विषय ठरत आहे. त्यांना प्रसिध्द आणि पद या पासून ते कोसोदूर आहेत. त्यांचे अनुकरण दुसऱ्यांनी करायला पाहिजे. मात्र या संदर्भात कुणालाही वेळ दिसत नाही. अनेकांचे टोमने येकून शुध्दा लालचंदचा हा नित्यक्रम आजही सुरु आहे. या बाबद संबंधित प्रशासनाचे याची दखल घ्यायला पाहिजे मात्र असे झाले नाही हि एक खंताची बाब म्हणावी लागेल. (वार्ताहर)