शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

सर्व निकष पूर्ण करणाऱ्या बालकांचे प्रवेश ‘वेटिंग’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 10:28 PM

मोफत व सक्तीचे शिक्षण योजनेंतर्गत सर्व निकष पूर्ण करणाºया बालकांचे प्रवेश वेटींगवर तर निकष पूर्ण न करणाऱ्यांना सवलत अशी अवस्था सध्या भंडारा जिल्ह्यात दिसत आहे. आरटीई प्रवेश प्रक्रिया सर्वांसाठी डोकेदुखी ठरत असून मोफत शिक्षण नव्हे बोगस शिक्षण प्रणाली असे म्हणण्याची वेळ आता पालकांवर आली आहे.

ठळक मुद्देआरटीई प्रवेश प्रक्रिया : मोफत शिक्षण नव्हे, बोगस शिक्षण प्रणाली

तथागत मेश्राम।लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : मोफत व सक्तीचे शिक्षण योजनेंतर्गत सर्व निकष पूर्ण करणाºया बालकांचे प्रवेश वेटींगवर तर निकष पूर्ण न करणाऱ्यांना सवलत अशी अवस्था सध्या भंडारा जिल्ह्यात दिसत आहे. आरटीई प्रवेश प्रक्रिया सर्वांसाठी डोकेदुखी ठरत असून मोफत शिक्षण नव्हे बोगस शिक्षण प्रणाली असे म्हणण्याची वेळ आता पालकांवर आली आहे.शिक्षण हक्क कायद्याने ६ ते १४ वर्ष वायोगटातील मुलांना मोफत शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाची आहे. यासाठी विशिष्ट घटकांना शिक्षण असे नसून सरसकट राज्यातील सर्व मुलांना शिक्षण असे आहे. शासनाने सुुरु केलेल्या व शासनाच्या अनुदानावर असलेल्या शाळा शिक्षण देण्याचे काम करतात. परंतु पालकांचा कल इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढला आहे. त्यामुळे मराठी माध्यमांच्या शाळा ओस पडू लागल्या आहेत. इंग्रजी शाळांकडे पालकांचा कल वाढत आहे. अशा इंग्रजी माध्यमांच्या शाळांना शासन कोणतेही अनुदान देत नाही. त्यामुळे मुलांच्या पालकांकडून शुल्क वसुल केले जाते. सर्वसामान्यांच्या मुलांनाही इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकता यावे यासाठी ही योजना सुरु करण्यात आली. आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. अर्ज दाखल करणाºयांची संख्या वाढली. अर्ज दाखल करणारे पात्र आहेत म्हणून अर्ज भरतात. मात्र केवळ २५ टक्के मुलांना प्रवेश देण्यात येतो. शिक्षणासाठी मोफत आणि सक्तीचा कायदा असताना २५ टक्के मुलांनाच का प्रवेश असा प्रश्न निर्माण होतो. एकंदरीत ही प्रवेश प्रक्रिया सर्वांसाठी डोकेदुखी ठरत आहे.अंतराच्या निकषाचा घोळनामवंत शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी दिवसेंदिवस नवीन शक्कल लढविली जाते. जिल्ह्यातील अनेक शाळा लोकवस्तींपासून लांब अंतरावर आहे. अनेक शाळेत मुलांना एक किमीच्या आत अंतराचा निकष प्रवेशासाठी आहे. त्याचबरोबर शाळेपासून लांब वास्तव्य असलेल्या अनेक मुलांना एक किमी अंतराच्या निकषावर प्रवेश मिळाला. याला आरटीई अंतर्गत राबविण्यात येणारी सदोष प्रवेश प्रक्रिया असल्याचे बोलले जात आहे.अधिकारशाही वाढलीआरटीई अंतर्गत प्रवेश घेणाºया बालकांच्या शुल्क प्रतिपूर्तीच्या स्वरुपात शाळांना देण्यात येते. शाळांना मिळणारा हा पैसा शिक्षण विभागाच्या डोळ्यात भरत आहे. शिक्षण देण्याच्या मोबदल्यात मिळणारा पैसा मिळविण्यासाठी शाळांना त्रास सहन करावा लागतो. प्रतिपूर्ती म्हणून देण्यात येणाºया रकमेवर आता अधिकारशाहीचा डोळा आहे. ऐनकेन कारणाने त्यांना वेठीस धरले जात आहे.

टॅग्स :Educationशिक्षण