शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

एका एकरात पिकविला ६० हजारांचा भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 22:19 IST

अपूरा पाऊस, सततचा दुष्काळ आणि त्यातून होणाऱ्या कमी उत्पन्नाने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत आहे.

ठळक मुद्देशेततळ्याची किमया : चिखलाबोडीच्या सुमन सार्वे यांचा बहूपीक प्रयोग

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अपूरा पाऊस, सततचा दुष्काळ आणि त्यातून होणाऱ्या कमी उत्पन्नाने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत आहे. अशा परिस्थितीतही लाखनी तालुक्याच्या चिखलाबोडी येथील सुमन वामन सार्वे या महिलेने शेततळ्यातील संरक्षीत सिंचनाच्या सोयीने भरघोष उत्पन्न घेतले. ३६ क्विंटल धान, एका एकरात ६० हजाराचा भाजीपाला आणि मत्स्य व्यवसायातून २५ हजाराचा नफा कमविण्याची किमया त्यांनी साधली.चिखलाबोडी येथे सुमन सार्वे यांची १.५८ हेक्टर शेतजमीन आहे. गतवर्षी पाऊस कमी झाल्याने आणि सिंचनाची सोय उपलब्ध नसल्याने सरासरी उत्पादकता फक्त २२ ते २३ क्विंटल प्रति हेक्टर एवढी झाली. अशातच त्यांनी मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत आपल्या शेतात शेततळे खोदले. पहिल्या पावसात शेततळे संपूर्ण भरल्याने शेतीची रोवणी योग्य वेळेवर करता आली.पारंपारिक पीक पध्दतीवर अवलंबून न राहता शेततळ्याच्या साथीने बहूपिक पध्दतीचा अवलंब केला. शेतात धान, तूर, भाजीपाला व शेततळ्यात मत्स्यपालनाचा निर्णय घेतला. याचा चांगला परिणाम आता दिसत असून त्यांचा वार्षिक उत्पन्नात वाढ अपेक्षीत आहे. सुमन सार्वे यांना गतवर्षी शेतीतून २० हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. पंरतु शेततळ्यातील सिंचनाने खर्च वजा जाता ४५ हजार रुपयांचा निव्वळ नफा अपेक्षीत आहे.यावर्षी त्यांना धानाचे ३६ क्विंटल हेक्टरी उत्पन्न झाले. तर एका एकरात ६० हजाराचे भाजीपाला उत्पादन घेण्यात आले. शेततळ्यामुळे सिंचनाची सोय झाल्याने त्यांनी कृषी विभागाकडून उपलब्ध झालेले सागाचे रोप व तूर पिकाची लागवड केली. शेततळ्यात वाघुर जातीचे मत्स्यबिज टाकले असून त्यातून २५ हजार रुपये नफा अपेक्षित आहे.लाखनी तालुक्यात १४१ शेततळेशेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी आणि तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त आहे. राज्यातील पावसावर आधारीत कोरडवाहू शेतीत जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे व संरक्षित श्वासत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मागेल त्याला शेततळे योजना राबविण्यात आली. या योजनेतून लाखनी तालुक्यात जून २०१८ पर्यंत १४१ शेततळ्यांची कामे पुर्ण झाली असून संरक्षित सिंचनाची उपलब्धता निर्माण झाली आहे.