शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
2
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
3
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
4
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
5
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
6
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
7
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
8
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
9
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
10
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
11
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
12
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
13
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
14
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
15
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
16
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
17
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
18
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
19
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
20
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप

सहा वर्षात ५७९ क्षयरुग्णांचा मृत्यू

By admin | Updated: March 29, 2016 00:26 IST

क्षयरोग हा शब्द किती मोठा व लवकर नियंत्रणात न येणारा आजार म्हणून ओळखल्या जातो.

८,७९८ रुग्णांचा शोध : ६,१९५ रुग्ण औषधोपचारानंतर बरेभंडारा : क्षयरोग हा शब्द किती मोठा व लवकर नियंत्रणात न येणारा आजार म्हणून ओळखल्या जातो. वैद्यकीय क्षेत्राने यात भरीव कामगिरी करून औषधोपचाराने त्यावर नियंत्रण मिळविले आहे, असे असले तरी मागील सहा वर्षात जिल्ह्यात ८,७९८ क्षयरुग्ण आढळून आले. त्यातील ५७९ रुग्णांना जीव गमवावे लागल्याचा प्रकार समोर आला आहे. वरील आकडेवारीवरून जिल्ह्यात क्षयरोगाची मोठ्या प्रमाणात लागण असल्याचे समोर आले आहे. ही आकडेवारी शासकीय रुग्णालयातील असून खासगी रुग्णालयात उपचार घेणारे व समाजात वावरत असताना भीतीपोटी उपचार न घेणाऱ्यांचा यात समावेश नाही. या दोन्ही बाबींचा यात समावेश झाल्यास आकडेवारी आणखी फुगू शकते. महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग जिल्हा परिषद अक्षया प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक क्षयरोग दिन गुरूवारला साजरा करण्यात आला. सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत अ‍ॅडव्होकेसी कॉम्युनिकेशन अ‍ॅड सोशल मोबिलायझेशन (एसीएसएम) प्रभाविपणे राबविण्यात येत आहे. यामध्ये संवाद प्रणाली जनजागृतीच्या कार्यक्षेत्रातील समस्या, अडथळे शोधून गरजेनुसार पर्याय उपलब्ध करून देण्यात येते. क्षयरोग हा शब्द मोठा व लवकर नियंत्रणात न येणारा असला तरी वैद्यकीय क्षेत्राने भरीव प्रगती केल्याने भयान वाटणारा क्षयरोगही आता नियंत्रणात आणण्यात यश येत आहे. सन २००९ ते डिसेंबर २०१५ पर्यंत जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयाकडे नोंद झालेल्या क्षयरुग्णांच्या आकडेवारीवरून रुग्णांचे माहिती उपलब्ध झाली. यात या सहा वर्षात ८,७९८ क्षयरुग्ण शोधण्यात आले. यापैकी ६,१९५ रुग्ण औषधोपचाराअंती बरे झाले. यातील ५७९ रुग्णांचा मृत्यू झाला. २००९ व २०१३ मध्ये १०० च्यावर क्षयरुग्णांचा मृत्यू झाला. (शहर प्रतिनिधी) एमडीआर व एक्सडीआर रुग्णजिल्ह्यात एमडीआर व एक्सडीआर या क्षयरोग आजाराचे रुग्ण आढळून आले आहे. सन २००७ पासून तर डिसेंबर २०१५ अखेर एमबीआर १०६ रुग्णांचे निदान करण्यात आले. त्यापैकी २५ रुग्ण बरे झाले व आठ रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले. यातील २१ रुग्णांचा मृत्यू झाला असून सद्यस्थितीत २१ रुग्णांवर औषधोपचार सुरू आहे. एक्सडीआर क्षयरुग्ण संख्या सात असल्याचे निदान झाले आहे. तीन रुग्णांवर औषधोपचार सुरू असून एकाचा मृत्यू झाला आहे. क्षयरोगाचे जंतू रुग्णांच्या खोकल्यातून हवेवाटे वातावरणात पसरतात. एका क्षयरुग्णापासून वर्षभरात १० ते १५ क्षयरुग्ण तयार होतात. वेळीच डॉट्स रूपी औषध घेणे गरजेचे आहे. - वाय.बी. कांबळेजिल्हा क्षयरोग अधिकारी,भंडारा