शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

सहा वर्षात ५७९ क्षयरुग्णांचा मृत्यू

By admin | Updated: March 29, 2016 00:26 IST

क्षयरोग हा शब्द किती मोठा व लवकर नियंत्रणात न येणारा आजार म्हणून ओळखल्या जातो.

८,७९८ रुग्णांचा शोध : ६,१९५ रुग्ण औषधोपचारानंतर बरेभंडारा : क्षयरोग हा शब्द किती मोठा व लवकर नियंत्रणात न येणारा आजार म्हणून ओळखल्या जातो. वैद्यकीय क्षेत्राने यात भरीव कामगिरी करून औषधोपचाराने त्यावर नियंत्रण मिळविले आहे, असे असले तरी मागील सहा वर्षात जिल्ह्यात ८,७९८ क्षयरुग्ण आढळून आले. त्यातील ५७९ रुग्णांना जीव गमवावे लागल्याचा प्रकार समोर आला आहे. वरील आकडेवारीवरून जिल्ह्यात क्षयरोगाची मोठ्या प्रमाणात लागण असल्याचे समोर आले आहे. ही आकडेवारी शासकीय रुग्णालयातील असून खासगी रुग्णालयात उपचार घेणारे व समाजात वावरत असताना भीतीपोटी उपचार न घेणाऱ्यांचा यात समावेश नाही. या दोन्ही बाबींचा यात समावेश झाल्यास आकडेवारी आणखी फुगू शकते. महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग जिल्हा परिषद अक्षया प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक क्षयरोग दिन गुरूवारला साजरा करण्यात आला. सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत अ‍ॅडव्होकेसी कॉम्युनिकेशन अ‍ॅड सोशल मोबिलायझेशन (एसीएसएम) प्रभाविपणे राबविण्यात येत आहे. यामध्ये संवाद प्रणाली जनजागृतीच्या कार्यक्षेत्रातील समस्या, अडथळे शोधून गरजेनुसार पर्याय उपलब्ध करून देण्यात येते. क्षयरोग हा शब्द मोठा व लवकर नियंत्रणात न येणारा असला तरी वैद्यकीय क्षेत्राने भरीव प्रगती केल्याने भयान वाटणारा क्षयरोगही आता नियंत्रणात आणण्यात यश येत आहे. सन २००९ ते डिसेंबर २०१५ पर्यंत जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयाकडे नोंद झालेल्या क्षयरुग्णांच्या आकडेवारीवरून रुग्णांचे माहिती उपलब्ध झाली. यात या सहा वर्षात ८,७९८ क्षयरुग्ण शोधण्यात आले. यापैकी ६,१९५ रुग्ण औषधोपचाराअंती बरे झाले. यातील ५७९ रुग्णांचा मृत्यू झाला. २००९ व २०१३ मध्ये १०० च्यावर क्षयरुग्णांचा मृत्यू झाला. (शहर प्रतिनिधी) एमडीआर व एक्सडीआर रुग्णजिल्ह्यात एमडीआर व एक्सडीआर या क्षयरोग आजाराचे रुग्ण आढळून आले आहे. सन २००७ पासून तर डिसेंबर २०१५ अखेर एमबीआर १०६ रुग्णांचे निदान करण्यात आले. त्यापैकी २५ रुग्ण बरे झाले व आठ रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले. यातील २१ रुग्णांचा मृत्यू झाला असून सद्यस्थितीत २१ रुग्णांवर औषधोपचार सुरू आहे. एक्सडीआर क्षयरुग्ण संख्या सात असल्याचे निदान झाले आहे. तीन रुग्णांवर औषधोपचार सुरू असून एकाचा मृत्यू झाला आहे. क्षयरोगाचे जंतू रुग्णांच्या खोकल्यातून हवेवाटे वातावरणात पसरतात. एका क्षयरुग्णापासून वर्षभरात १० ते १५ क्षयरुग्ण तयार होतात. वेळीच डॉट्स रूपी औषध घेणे गरजेचे आहे. - वाय.बी. कांबळेजिल्हा क्षयरोग अधिकारी,भंडारा