शहरं
Join us  
Trending Stories
1
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
2
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; ९ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
3
दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
4
दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
5
Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
6
Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी
7
Vastu Tips: बुधवारी लावलेली 'ही' रोपं ठरतात लक्ष्मीप्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग!
8
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
9
दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
10
Shreyas Iyer Injury Update: अय्यरबाबत जोखीम नको! वनडे मालिकेपूर्वी तब्येतीसंदर्भात मोठा खुलासा
11
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
12
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
13
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
14
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
15
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
16
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
17
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
18
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
20
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला

सहा वर्षात ५७९ क्षयरुग्णांचा मृत्यू

By admin | Updated: March 29, 2016 00:26 IST

क्षयरोग हा शब्द किती मोठा व लवकर नियंत्रणात न येणारा आजार म्हणून ओळखल्या जातो.

८,७९८ रुग्णांचा शोध : ६,१९५ रुग्ण औषधोपचारानंतर बरेभंडारा : क्षयरोग हा शब्द किती मोठा व लवकर नियंत्रणात न येणारा आजार म्हणून ओळखल्या जातो. वैद्यकीय क्षेत्राने यात भरीव कामगिरी करून औषधोपचाराने त्यावर नियंत्रण मिळविले आहे, असे असले तरी मागील सहा वर्षात जिल्ह्यात ८,७९८ क्षयरुग्ण आढळून आले. त्यातील ५७९ रुग्णांना जीव गमवावे लागल्याचा प्रकार समोर आला आहे. वरील आकडेवारीवरून जिल्ह्यात क्षयरोगाची मोठ्या प्रमाणात लागण असल्याचे समोर आले आहे. ही आकडेवारी शासकीय रुग्णालयातील असून खासगी रुग्णालयात उपचार घेणारे व समाजात वावरत असताना भीतीपोटी उपचार न घेणाऱ्यांचा यात समावेश नाही. या दोन्ही बाबींचा यात समावेश झाल्यास आकडेवारी आणखी फुगू शकते. महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग जिल्हा परिषद अक्षया प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक क्षयरोग दिन गुरूवारला साजरा करण्यात आला. सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत अ‍ॅडव्होकेसी कॉम्युनिकेशन अ‍ॅड सोशल मोबिलायझेशन (एसीएसएम) प्रभाविपणे राबविण्यात येत आहे. यामध्ये संवाद प्रणाली जनजागृतीच्या कार्यक्षेत्रातील समस्या, अडथळे शोधून गरजेनुसार पर्याय उपलब्ध करून देण्यात येते. क्षयरोग हा शब्द मोठा व लवकर नियंत्रणात न येणारा असला तरी वैद्यकीय क्षेत्राने भरीव प्रगती केल्याने भयान वाटणारा क्षयरोगही आता नियंत्रणात आणण्यात यश येत आहे. सन २००९ ते डिसेंबर २०१५ पर्यंत जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयाकडे नोंद झालेल्या क्षयरुग्णांच्या आकडेवारीवरून रुग्णांचे माहिती उपलब्ध झाली. यात या सहा वर्षात ८,७९८ क्षयरुग्ण शोधण्यात आले. यापैकी ६,१९५ रुग्ण औषधोपचाराअंती बरे झाले. यातील ५७९ रुग्णांचा मृत्यू झाला. २००९ व २०१३ मध्ये १०० च्यावर क्षयरुग्णांचा मृत्यू झाला. (शहर प्रतिनिधी) एमडीआर व एक्सडीआर रुग्णजिल्ह्यात एमडीआर व एक्सडीआर या क्षयरोग आजाराचे रुग्ण आढळून आले आहे. सन २००७ पासून तर डिसेंबर २०१५ अखेर एमबीआर १०६ रुग्णांचे निदान करण्यात आले. त्यापैकी २५ रुग्ण बरे झाले व आठ रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले. यातील २१ रुग्णांचा मृत्यू झाला असून सद्यस्थितीत २१ रुग्णांवर औषधोपचार सुरू आहे. एक्सडीआर क्षयरुग्ण संख्या सात असल्याचे निदान झाले आहे. तीन रुग्णांवर औषधोपचार सुरू असून एकाचा मृत्यू झाला आहे. क्षयरोगाचे जंतू रुग्णांच्या खोकल्यातून हवेवाटे वातावरणात पसरतात. एका क्षयरुग्णापासून वर्षभरात १० ते १५ क्षयरुग्ण तयार होतात. वेळीच डॉट्स रूपी औषध घेणे गरजेचे आहे. - वाय.बी. कांबळेजिल्हा क्षयरोग अधिकारी,भंडारा