शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

प्रत्येक कुटुंबाच्या तपासणीसाठी ५५६ पथक सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 5:00 AM

अलिकडे मृत्यूही वाढत आहेत. शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार जिल्हा आरोग्य यंत्रणेने या मोहिमेचे नियोजन केले आहे. मोहिमेदरम्यान पथकाद्वारे गृहभेटीत संशयीत कोरोना रुग्णांची तपासणी, अती जोखमीच्या व्यक्तीची ओळख पटवून त्यांना उपचार व प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण, सारी रुग्णांचे सर्वेक्षण तपासणी व उपचार केले जाणार आहे.

ठळक मुद्देमाझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम : जिल्ह्यात शहरी व ग्रामीण असे २ लाख ८७ हजार २ घरे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम सुरु केली असून जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून या मोहिमेसाठी जय्यत तयारी केली आहे. जिल्ह्यातील दोन लाख ८७ हजार दोन घरातील व्यक्तींच्या तपासणीसाठी ५५६ पथक तयार करण्यात आले आहेत. तीन कर्मचारी असलेले पथक दोन फेरीत ही मोहीम राबविणार आहेत.भंडारा जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अलिकडे मृत्यूही वाढत आहेत. शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार जिल्हा आरोग्य यंत्रणेने या मोहिमेचे नियोजन केले आहे. मोहिमेदरम्यान पथकाद्वारे गृहभेटीत संशयीत कोरोना रुग्णांची तपासणी, अती जोखमीच्या व्यक्तीची ओळख पटवून त्यांना उपचार व प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण, सारी रुग्णांचे सर्वेक्षण तपासणी व उपचार केले जाणार आहे.भंडारा जिल्ह्यात ही मोहीम दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. पहिली फेरी १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर आणि दुसरी फेरी १४ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या कालावधीत राबविली जाणार आहे. मोहीम जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, कटक मंडळात राबविण्यात येईल. जिल्ह्यातील शहरे, गावे, वाडी, वस्ती, तांडे येथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांची तपासणी केली जाणार आहे.या तपासणीसाठी जिल्ह्यात ५५६ पथक तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये एक आरोग्य कर्मचारी, दोन स्वयंसेवक त्यात एक पुरुष आणि एक स्त्री असे एकुण तीन कर्मचारी राहणार आहेत. सर्वेक्षणाचे काम अ‍ॅपद्वारे केले जाणार असल्याने टीम सदस्यांना सर्वेक्षणपूर्व प्रशिक्षण देण्यात आले आहे.माझे कुटुंब माझी जबाबदारी कोविड मुक्त महाराष्ट्र ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने प्रत्येक पाच ते दहा टीमच्या मागे स्थानिक स्तरावर पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. शिवाय मोहीमेची जिल्हा स्तरावरून सनियंत्रण व पर्यवेक्षणाकरिता जिल्हास्तरीय अधिकारी व पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आल आहे. जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या मार्गदर्शनात जिल्हा आरोग्य अधिकारी माधुरी माथुरकर आणि संपूर्ण आरोग्य यंत्रणा यासाठी प्रयत्न करीत आहेत. या मोहीमेंतर्गत आढळलेल्या रुग्णांवर योग्य उपचार केले जाणार असून त्या माध्यमातून कोरोना संसर्ग रोखण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या वतीने कळविण्यात आले आहे.जिल्ह्यात १२ लाख ५१ हजार लोकसंख्याजिल्ह्याची ग्रामीण लोकसंख्या ९ लाख ६८ हजार ९१३ आणि शहरी लोकसंख्या २ लाख ८२ हजार ९५ एवढी आहे. जिल्ह्याची एकुण लोकसंख्या १२ लाख ५१ हजार ८ आहे. जिल्ह्यात ग्रामीण व शहरी मिळून २ लाख ८७ हजार २ घरे आहेत. एवढ्या मोठ्या लोकसंख्येची आरोग्य तपासणी करण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच मोहीम असून कोरोनाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकांची तपासणी होणार आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या