शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

४२ गावांची मदार २० पोलीसदादांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 6:00 AM

यातही दहा पोलीस कर्मचारी ठाण्याच्या रेकॉर्डवर असून काही पोलीस कर्मचारी लोकप्रतिनिधींचे सुरक्षारक्षक म्हणून तर काही उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात कर्तव्य बजावत आहेत, तर काही खेळ विभागात आहेत. यातच काहींनी निवृत्तीसाठी अर्ज केला आहे. त्यामुळे अपुºया कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करून कर्तव्य बजावावे लागते.

ठळक मुद्देगुन्हेगारीचा वाढतोय आलेख : कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : स्थानिक पोलीस ठाण्याअंतर्गत एकूण ४२ गावे येतात. पवनी, शिरूड, धोत्रा, एकुर्ली, कानगाव, अलमडोह, येरणवाडी, टाकळी, नांदगाव, भगवा व अन्य गावांचा समावेश आहे. ठाण्याकरिता तीस कर्मचारी मंजूर असताना केवळ वीस पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत.यातही दहा पोलीस कर्मचारी ठाण्याच्या रेकॉर्डवर असून काही पोलीस कर्मचारी लोकप्रतिनिधींचे सुरक्षारक्षक म्हणून तर काही उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात कर्तव्य बजावत आहेत, तर काही खेळ विभागात आहेत. यातच काहींनी निवृत्तीसाठी अर्ज केला आहे. त्यामुळे अपुºया कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करून कर्तव्य बजावावे लागते. कामाच्या ताणामुळे त्यांची प्रचंड दमछाक होत असून याचाच परिणाम गावासह परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीने डोके वर काढले आहे. महिला, तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.अल्लीपूर पोलीस ठाण्याअंतर्गत एकूण तीन बीट आहेत. तळेगाव, कानगाव, अल्लीपूर ही मोठी गावे असून जमादारांना त्या-त्या बीटची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे तीन गावांकरिता केवळ सहा पोलीस कर्मचारी आहेत.गावासह परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढ आहे. मात्र, अपुºया असलेल्या कर्मचाºयांना याकडे लक्ष देणे शक्य होत नाही. रात्रीच्या वेळी केवळ एक ते दोन कर्मचारी गस्तीवर असतात. मोठी घटना घडली तर परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे या कर्मचाºयांना शक्य नाही. याकरिता ठाण्यात पुरेसा कर्मचारीवर्ग गरजेचा आहे. अल्लीपूर हिंगणघाट तालुक्यातील सर्वांत मोठे गाव असुन संवेदनशील म्हणून या गावाची पोलीस विभागात नोंद आहे. याकरिता येथे पुरेसे पोलीस कर्मचारी देण्यात यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.कामाच्या ताणामुळे कौटुंबिक सोहळ्यातही अनुपस्थितीकायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस विभागावर आहे. याकरिता हा विभाग मनुष्यबळाने परिपूर्ण असे गरजेचे आहे. मात्र, अनेक ठाण्यात अपुरा पोलीस कर्मचारीवर्ग आहे. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण येतो. यामुळे पोलिसांना कौटुंबिक सोहळ्यातही सहभागी होता येत नाही. पुरेसा पोलीस कर्मचारी वर्ग देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.अल्लीपूर आणि परिसराची लोकसंख्या मोठी आहे. मात्र, ठाण्यात अपुरा कर्मचारीवर्ग आहे. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण येतो. वरिष्ठांना याबाबत कळविले असून पोलीस कर्मचाºयांची मागणी केली आहे.- योगेश कामाले, ठाणेदार अल्लीपूर

टॅग्स :Policeपोलिस