शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

‘भिमलकसा’ला मिळणार ११६.०३ हेक्टर वनजमीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2017 00:14 IST

वडेगाव येथील जंगलाला लागून असलेल्या भिमलकसा प्रकल्पाकरीता अखेर ११६.०३ हेक्टर वनजमिन वळतेकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने केला आहे.

चार दशकांची प्रतीक्षा : ९३१ हेक्टर क्षेत्राला होणार सिंचन देवानंद नंदेश्वर/संजय साठवणे भंडारा/ साकोलीवडेगाव येथील जंगलाला लागून असलेल्या भिमलकसा प्रकल्पाकरीता अखेर ११६.०३ हेक्टर वनजमिन वळतेकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने केला आहे. त्यामुळे गत अनेक दशकापासून बंद असलेल्या या प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू होणार आहे. या निर्णयामुळे परिसरातील शेतीला सिंचनाची सोय होवनू हरीतक्रांती घडेल. हा प्रकल्प ४४ वर्षांपासून वनकायदा व शासनाची परवानगी यात रखडलेला होता. भिमलकसा लघु प्रकल्पाला ८ मे १९७३ अन्वये २४.९० लाख रूपयाची प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यानंतर याप्रकल्पाचे काम जानेवारी १९७५ मध्ये रोजगार हमी योजनेतून सुरू करण्यात आले होते. या प्रकल्पाची सिंचन क्षमता ९३१ हेक्टर असून त्यावेळी या धरणाचे मातीकाम घळभरणी वगळता पुर्ण करण्यात आले होते. या प्रकल्पाचे ७५ टक्के काम पुर्ण झाल्यानंतर १८ मे १९८६ ला वनकायदा अस्तित्वात आला व या प्रकल्पाचे काम थांबविण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी सन २००८-०९ ला या प्रकल्पाची वनकायद्यातून सुटका झाली. त्यानंतर काम थंडबस्त्यात राहिले. यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी बरेचदा लोकप्रतिनिधीची भेट घेतली. एकदा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कारही टाकला होता. मात्र त्याचा फायदा झाला नाही. वनकायद्यातून सुटका झाली तेव्हा वनजमिनीचे मालमत्ता मुख्य ११२९.५८८ लाख वनविभागास भरावयाची होती. कामाची किंमत १५१७.५५७ लाख असे एकूण २६४७.१४५ लाख रुपए शासनास मंजुर करावयाचे होते. तेव्हापासून ही फाईल कासवगतीने वनमंत्रालयात जमा होती. आमदार बाळा काशीवार यांनी या प्रकल्पाला मार्गी लावण्याचा निर्धार केला. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करून प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना साकडे घातले होते. यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, खासदार नाना पटोले यांनी पुढाकार घेतल्याने या प्रकल्पाला अंतिम मान्यता मिळाली. १८ फेब्रुवारीला भिमलकसा प्रकल्पासाठी ११६.०३ हेक्टर वनजमिन वळते करण्याचा निर्णय शासनाने घेतला. वळतीकरण भारत सरकारच्या २६ नोव्हेंबर २००८, १७ जुलै २०१५ व ७ जानेवारी २०१७ रोजीच्या पत्रांतील अटी व शर्तीच्या पूर्तता करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिंचनाचा लाभसदर प्रकल्प पूर्ण झाल्यास जमनापूर २३२ हेक्टर, पाथरी ९५ हेक्टर, वडेगाव १४४ हेक्टर, खांबा ३०१ हेक्टर, तुडमापुरी १५९ हेक्टर असे एकूण ९३१ हेक्टर शेतजमिनीला सिंचनाची सोय होणार आहे.