शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

याच सरोवरावर युधिष्ठिराला विचारले होते यक्षप्रश्न; पाकिस्तानातील हिंदूंचे तीर्थक्षेत्र कोणत्या भागात स्थित आहे ते वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 5:50 PM

लोककथेनुसार हे प्रार्थनास्थळ हजारो वर्षे जुने आहे. येथे असलेल्या मंदिराबद्दल असे मानले जाते की ते श्रीकृष्णाने बांधून घेतले होते आणि येथे असलेल्या शिवलिंगाची स्थापनाही त्यांनी केली होती.

कटास राज हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या उत्तरेकडील चकवाल जिल्ह्यातील पोतोहर पठारातील नमक कोह पर्वत रांगेत असलेले हिंदूंचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे पुरातन शिवमंदिर आहे. या मंदिराशिवाय इतरही मंदिरं आहेत. ही सर्व मंदिरे दहाव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. माता पार्वती जेव्हा सती झाली तेव्हा भगवान शंकराच्या डोळ्यांतून ओघळणाऱ्या अश्रूंमुळे सरोवर तयार झाले असे पौराणिक कथेत सांगितले जाते. अलीकडेच पाकिस्तानी कोर्टाने कोरड्या पडणाऱ्या सरोवरांबद्दल चिंता व्यक्त केल्याने हे ठिकाण चर्चेत आले. 

या ठिकाणाला ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व आहे

लोककथेनुसार हे प्रार्थनास्थळ हजारो वर्षे जुने आहे. येथे असलेल्या मंदिराबद्दल असे मानले जाते की ते श्रीकृष्णाने बांधून घेतले होते आणि येथे असलेल्या शिवलिंगाची स्थापनाही त्यांनी केली होती. मौर्य सम्राट अशोकानेही या ठिकाणी स्तूप बांधला होता, त्याचप्रमाणे चौथ्या शतकात भारताला भेट देणारा चिनी प्रवासी फाहिन यानेही आपल्या प्रवासवर्णनात या ठिकाणाचा उल्लेख केला आहे. हे ठिकाण शीख गुरू नानक देवजी यांनाही अतिशय प्रिय असल्याचे म्हटले जाते. त्याच्या आजूबाजूला उत्खनन करताना, सहा ते सात इसवीसनपूर्व काळातील संस्कृतींचे अवशेष सापडले आहेत.

येथे यक्षाने युधिष्ठिराला प्रश्न विचारला 

असे म्हणतात की महाभारत काळात पांडव वनवासाच्या काळात या डोंगरांवर आले होते आणि हा तो तलाव आहे जिथे पांडव तहानलेले असताना पाण्याच्या शोधात पोहोचले होते. तलावावर यक्षाचा अधिकार होता. जेव्हा नकुल, सहदेव, भीम आणि अर्जुन असे चार भाऊ पाण्याच्या शोधात या तलावावर आले तेव्हा यक्षाने त्यांना बोलावून सांगितले की, या पाण्यावर आपला अधिकार आहे, जर त्याला पाणी घ्यायचे असेल तर त्याच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. पांडवांपैकी  युधिष्ठिर वगळता कोणीही त्याच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकला नाही आणि जेव्हा त्यांनी पाणी पिण्याचा प्रयत्न केला तेव्हा यक्षाने त्यांना बेशुद्ध केले. शेवटी चार भावांचा शोध घेत युधिष्ठिर तिथे पोहोचला आणि चारही भावांना बेशुद्ध पडलेले पाहून विचारले की हे कोणी केले, तेव्हा यक्षाने सर्व प्रकार सांगितला, तेव्हा युधिष्ठिर म्हणाला की ते उत्तर द्यायला तयार आहेत. तेव्हा यक्षाने त्याला प्रसिद्ध प्रश्न विचारले आणि युधिष्ठिराने अचूक उत्तर दिल्यावर यक्षाने चार भावांना शुद्धीवर आणले आणि त्या सरोवराला धर्मराजाचे नाव दिले.