शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तुमची ग्रहदशा वाईट आहे? पण संस्कार उत्तम असतील तर तुम्हाला कसलीही भीती नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 08:00 IST

माणसाने केवळ आपल्या दैवावर भरवसा न ठेवता आपल्या कर्मावर भरवसा ठेवला तर तो कधीच निराश होऊ शकत नाही.

अनेकदा जन्मकुंडलीतील भविष्य वाचून लोक घाबरतात. परंतु, फलज्योतिष वाचून गांगरून न जाता, त्याचा वापर आपण मार्गदर्शनासाठी करून घेतला पाहिजे. तसेच त्यावर उपाय, पर्यायही शोधले पाहिजेत. जर आपले संस्कार चांगले असतील, तर ग्रहांची दशा कितीही वाईट असली, तरी आपल्याकडून वाईट कर्म घडणार नाही. काशीमध्ये विष्णुशर्मा नावाचा एक ज्योतिषी होता. त्याला उतारवयात एक मुलगा झाला. त्याचे नाव त्याने शिव असे ठेवले. मुलाच्या पत्रिकेत एकविसाव्या वर्षी तो चोरी करणार असे भविष्य त्याला आढळले. ती गोष्ट त्याच्या मनाला फार लागली. त्यामुळे तो दिवसेंदिवस खंगत चालला होता.

एके दिवशी वाटेने जात असता त्या ज्योतिषाला एका साधूची भेट झाली. त्याने त्याची खिन्न मुद्रा पाहून विचारपूस केली. तेव्हा ज्योतिषाने साधूपुडे आपले मनोगत व्यक्त केले. साधूने त्याला, `मुलाला थोडे कळू लागल्यावर धर्मग्रंथ वाचून त्यातील गोष्टी सांगत जा. चांगले संस्कार घालत जा. योग्य अयोग्य या गोष्टींची शिकवण देत जा. म्हणजे खचित प्रारब्धाचा जोर कमी होईल' असे सुचवले. त्याप्रमाणे ज्योतिषी करू लागला. साधूवरच्या विश्वासाने ज्योतिषी मुलाविषयी चिंता न करता निर्धास्त राहिला. 

पुढे ज्या दिवशी शिवशर्माला एकविसावे वर्ष लागले, त्या दिवशी रात्री सर्वत्र सामसूम झाल्यावर तो हळूच उठला आणि घरातून दबक्या पावलांनी बाहेर पडत राजवाड्यात गेला. विश्वशर्मा सर्वांच्या परिचयाचा आणि राजज्योतिषांचा मुलगा असल्याने इतक्या उशीरा येऊनही पहारेकऱ्यांनी त्याला राजवाड्यात जाताना अडवले नाही. तो एका विशिष्ट मन:स्थितीत राजवाड्यात शिरला आणि जिथे अमूल्य वस्तुंचे दालन होते, तिथे तो शिरला. 

तेथील प्रत्येक वस्तू नेहमीच्या पाहण्यातली होती, परंतु आजवर चोरण्याचा मोह कधीच झाला नव्हता. आज मात्र, एक तरी वस्तू घेऊन जावे, असे त्याला वाटू लागले. तो ज्या वस्तूच्या जवळ जाई, तिथे गेल्यावर त्याला वडिलांचा आठव होई. कारण, या प्रत्येक वस्तूचे मोल आणि ती चोरणाऱ्या व्यक्तीला होणारी शिक्षा याची वडिलांनी त्याला कल्पना देऊन ठेवली होती. त्यामुळे वस्तू चोरीची इच्छा असूनही घाबरून त्याने वस्तूंना स्पर्शदेखील केला नाही. तो तिथून बाहेर पडला. 

स्वयंपाक घरात शिरला. तिथे सगळी आवराआवर झालेली होती. तेवढ्यात त्याला तांदळाचा कोंडा ठेवलेला डबा दिसला. कोंड्याचा उपयोग काय, हे माहित नसतानाही त्याने तो थोडासा कोंडा चोरला आणि आपल्या उपरण्यात बांधला. उपरण्याला अनेक छिद्र असल्याने घराकडे येईपर्यंत कोंडा सांडून गेला. 

दुसऱ्या दिवशी राजाला ही हकिकत कळली. आपल्या प्रासादातल्या बहुमुल्य गोष्टी सोडून तांदळाचा कोंडा चोरण्याचा मोह शिवशर्माला का झाला असेल? या विचाराने राजाला अपराधीपणा वाटू लागला. त्याला वाटले, आपल्या राजज्योतिषांना पुरेसे वेतन दिले जात नाही की काय? जेणेकरून त्यांच्या मुलाला गरीबीमुळे हे वर्तन करावे वाटले? राजाने ज्योतिषाची भेट घेतली. तेव्हा ज्योतिषांनी प्रामाणिकपणे सत्य परिस्थिती कथन केली. 

यावर राजाला ज्योतिषांच्या भाकिताचे, त्यापेक्षाही जास्त त्यांच्या संस्काराचे महत्त्व जाणवले. राजा नतमस्तक झाला आणि त्याने शिवशर्माकडून अजाणतेपणी झालेल्या चुकीबद्दल अभय दिले. तेव्हा ज्योतिषांनी अनेक वर्षांपूर्वी मार्गदर्शन केलेल्या साधूंचे मनोमन आभार मानले. याच संस्कारांची कास धरून ज्योतिषांनी भविष्याबरोबर संस्कारांचे महत्त्व लोकांना सांगायला सुरुवात केली आणि त्यांच्या मनातून प्रारब्धाची भीती घालवली.