शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

जेवायला बसताना भारतीय बैठक सर्वार्थाने उचित का सांगितली जाते? वाचा शास्त्रीय आणि अध्यात्मिक कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 13:34 IST

टेबल खुर्ची आणि काटा चमचा घेऊन जेवायला बसणे ही आपली संस्कृती नाही, तरी ती आपल्या अंगवळणी पडली. तिचे दुष्परिणाम जाणून घ्या

आपल्या जुन्या संस्कृतीप्रमाणे भोजन करताना दोन प्रकारचे पाट वापरत असत. एक पाट बसण्यासाठी व दुसरा पाट ताट ठेवण्यासाठी. त्यातही ताट ठेवण्याचा पाट अधिक लांब रुंद व दोन बोटे उंच असे. त्यामागील शास्त्रीय भूमिका म्हणजे 'अन्न हे पूर्ण ब्रह्म' मानण्यात आले आहे. भोजन हे वास्तविक जेवण नसून यज्ञकर्म आहे. असे समजून अन्नग्रहण केल्यास त्या अन्नाविषयीचा व भोजन प्रक्रियेविषयीचा आदर वाढून त्यामागे एक आध्यात्मिक बैठक येते. 

अन्नाला आपण पूर्णब्रह्म मानतो, त्यामुळेया अन्न वाढलेले ताट आपल्या पायाच्या पातळीशी न ठेवता चौरंगावर ठेवणे उचित ठरते. लिंगायत समाजात आजही अन्नाचे ताट तिपाईवर ठेवून जेवण करतात असे दिसून येते. म्हणून आपल्या बैठकीपेक्षा थोड्या उंच बैठकीवर अन्नाचे ताट ठेवून भक्षण करणे हे यज्ञकर्म होईल. 

अन्नभक्षण करताना पाय पसरून, पालथी मांडी घालून वा पाय उंच करून बसण्यास निषेध सांगितला आहे. कारण पाय पसरून ताणला गेल्यास पोटातील आतडीही ताणली जातात, जठरावर ताण पडतो. पोटातील पचनक्रियेचे अवयव ताणलेल्या स्थितीत असताना अन्नग्रहण केल्यास अग्निमांद्य, अपचन, वायुप्रकोप (गॅसेस) असे उदरविकार निर्माण होतात. 

हल्ली टेबल खूर्ची घेऊन जेवायची पद्धत आहे. त्यामुळेही उदरविकारांचे प्रमाण वाढले आहे. टेबलावर अन्न ठेवून खुर्चीवर बसल्यामुळे पाय खाली सोडणे भाग पडते. त्यामुळे आपोआपच पचनेंद्रियावर ताण येतो. यासाठी टेबलावर भोजन टाळावे. व अत्यावश्यक असलयास निदान खुर्चीवर का होईना पण व्यवस्थित मांडी घालून मगच भोजन करावे. घराबाहेर तसे करणे शक्य नाही, पण निदान घरी जेवताना भारतीय बैठकीनुसार जमिनीवर बसून जेवण्याची सवय ठेवावी. कारण तिच उत्तम आरोग्याची किल्ली आहे. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न