घरातून निघताना अपघाताचे विचार मनात आले तर काय कराल? प्रेमानंद महाराजांनी सांगितला उपाय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 20:14 IST2025-01-29T20:13:11+5:302025-01-29T20:14:08+5:30

Premanand Maharaj Accident Speech: आजकाल अशी परिस्थिती आहे की रस्ते खड्डेमय आहेत, खड्डे चुकविताना दुसऱ्याच वाहनाच्या चाकाखाली जायची भीती आहे. वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. अशा वातावरणात अपघाताचे विचार डोकावतात...

What should you do if thoughts of an accident come to mind while leaving home? Premanand Maharaj gave the solution... | घरातून निघताना अपघाताचे विचार मनात आले तर काय कराल? प्रेमानंद महाराजांनी सांगितला उपाय...

घरातून निघताना अपघाताचे विचार मनात आले तर काय कराल? प्रेमानंद महाराजांनी सांगितला उपाय...

अनेकदा घरातून निघताना अपघात होण्याचे विचार मनात डोकावत असतात. आजकाल अशी परिस्थिती आहे की रस्ते खड्डेमय आहेत, खड्डे चुकविताना दुसऱ्याच वाहनाच्या चाकाखाली जायची भीती आहे. वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. कोणीही कसाही आडवा येतो आणि अपघात होतात. स्पीडब्रेकर तर अशा प्रकारे बनविले जातात की परदेशातल्या लोकांनी इथे येऊन इंजिनिअरिंगची पीएचडी करावी. अशा वातावरणातून गाडी चालवत ऑफिस किंवा कामाचे ठिकाण गाठत असताना आपल्याला काही होणार तर नाही ना, गाडीचा अपघात झाला तर असे विचार मनात हळूच डोकावतात आणि चिंता वाढवितात. अशा वेळी काय करावे असा प्रश्न वृंदावनचे प्रसिद्ध कथाकार प्रेमानंद महाराज यांना विचारण्यात आला. 

वृंदावनचे प्रसिद्ध कथाकार प्रेमानंद महाराज जी यांचे प्रवचन ऐकण्यासाठी लोक दूरदूरून येतात. त्यांच्या सत्संगाचे व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही व्हायरल होत राहतात. अलीकडेच त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्यांनी घराबाहेर पडताना अपघाताची भीती वाटत असेल तर काय करावे हे सांगितले आहे.

यावर प्रेमानंद महाराजांनी देवाचे नामस्मरण करावे, येणारी सर्व संकटे दूर होतात असे सांगितले आहे. यासाठी त्यांनी एक उदाहरणही दिले आहे, जे त्यांच्या भक्तांसोबत घडले आहे. अपघात होतानाही देव आपल्याला वाचवेल, असे त्यांनी म्हटले आहे. 

आपले काही लोक गिरीराजची परिक्रमा करून रात्री उशिरा येत होते. आणि ड्रायव्हर झोपला. रात्रीचे दीड-दोन वाजले होते. गाडी डिव्हायडरवर चढली. आतल्या लोकांनी मोठ्याने राधे श्याम असे नामस्मरण केले. मागून बराच वेळ गाडी आली नाही. गाडी पलटलीही नाही. या काळात मागून गाडी आली असती, ठोकून गेली असती. ड्रायव्हर उतरला, माफी मागू लागला, असे महाराजांनी सांगितले. 

देवाचे नाव घ्या, आजपर्यंत कोणाला दगाफटका झाला नाही. देवावर विश्वास ठेवू पहा. पण त्या वेळी देवाची आठवण येत नाही. अभ्यास नसतो ना. तेव्हा संसाराची आठवण येते. अंतर्मनातून आवाज द्या, आम्ही तर आयुष्यभर तेच करत आलो आहोत, असा सल्ला महाराजांनी दिला आहे. 
 

Web Title: What should you do if thoughts of an accident come to mind while leaving home? Premanand Maharaj gave the solution...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात