Vastu Tips: आर्थिक संकट असो वा जुना आजार; झोपण्यापूर्वी 'या' उपायाने मिळेल समाधान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 13:32 IST2025-06-11T13:31:49+5:302025-06-11T13:32:14+5:30

Vastu Tips: रोजच्या जगण्यात त्रासदायक ठरतात दोन गोष्टी- पैशांची अडचण आणि शारीरिक व्याधी, यावर वास्तू शास्त्रात एक सोपा तोडगा सांगितला आहे!

Vastu Tips: Be it financial crisis or chronic illness; this remedy before going to bed will give you relief! | Vastu Tips: आर्थिक संकट असो वा जुना आजार; झोपण्यापूर्वी 'या' उपायाने मिळेल समाधान!

Vastu Tips: आर्थिक संकट असो वा जुना आजार; झोपण्यापूर्वी 'या' उपायाने मिळेल समाधान!

आर्थिक संकट आणि असाध्य आजार कोणाचेही सुख आणि शांती हिरावून घेतात. कारण या दोन्ही गोष्टी मन:शांती हिरावून घेतात. जिथे मन शांत नसेल तिथे जगण्याचे समाधान तरी कसे मिळणार? हे चक्र गुंतागुंतीचे आहे. त्यावर समाधान म्हणून वास्तू शास्त्रात एक तोडगा सांगितला आहे. कोणता ते जाणून घेऊ. 

जीवनात सुख आणि दुःख हा मानवी जीवनाचा एक सामान्य भाग आहे. कधीकधी आपल्याला आयुष्यात खूप आनंद मिळतो, तर कधीकधी आपल्याला दुःखांशी झुंजावे लागते. वाईट काळातून बाहेर पडण्यासाठी आपण अनेक उपाय करतो आणि संकटातून बाहेर काढण्यासाठी देवाला प्रार्थना करतो. अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी वास्तुशास्त्र देखील उपाय सांगते. यापैकी एक उपाय रात्री झोपण्याशी संबंधित आहे. वास्तुशास्त्रानुसार, रात्री झोपण्यापूर्वी उशीखाली अशी एक वस्तू ठेवा, ज्यामुळे आर्थिक संकटापासून ते आजार, मानसिक ताणापर्यंत सर्व दोष दूर होण्यास मदत मिळते. चला जाणून घेऊया तो वास्तु उपाय काय आहे.

झोपताना उशीखाली ठेवा 'ही' गोष्ट :

वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्ही अनेक समस्यांनी वेढलेले असाल आणि त्यापासून मुक्ती मिळवू इच्छित असाल, तर रात्री झोपताना उशीखाली मिठाची छोटीशी पुडी ठेवा. मीठ नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे काम करते आणि मनाला शांती प्रदान करते. त्यात इतकी नैसर्गिक शक्ती आहे की ते आजूबाजूला असलेल्या नकारात्मक लहरी शोषून घेते. मिठाच्या या उपायामुळे रात्री भयानक स्वप्न पडत नाहीत, आर्थिक अडचणीतून मार्ग सापडतो, दीर्घकाळापासून सुरु असलेला आजार कमी होतो आणि मन शांत, समाधानी आणि प्रसन्न राहण्यास मदत मिळते. 

वास्तुदोषही दूर होतो :

हा उपाय केवळ नकारात्मक ऊर्जा नष्ट करत नाही, तर घरातील वास्तुदोष दूर करण्यास देखील मदत करतो. यासाठी शुक्रवारी रात्री उशीखाली मिठाची पुडी ठेवा आणि आठवड्याने पुढच्या शुक्रवारी नवीन पुडी ठेवा. सलग ११ शुक्रवारी हा उपाय केल्याने घरातील वातावरण सकारात्मक होऊ लागते आणि कुटुंबात एकता वाढते.

आर्थिक अडचणीतून मार्ग : 

रात्री उशीखाली मिठाची पुडी ठेवून झोपल्याने मुख्यतः मानसिक शांतता लाभते. विचारचक्र थांबते. आजरपण कमी होते. आर्थिक अडचणीतून नवनवे मार्ग सापडतात. शिवाय आर्थिक वृद्धी व्हावी म्हणून मिठाची पुडी उशीखाली ठेवण्याआधी 'ओम धनाय नम:' या मंत्राचा ११ वेळा जप केला असता या उपायाचा अधिक लाभ होतो. 

(सदर माहिती सामान्य गृहीतके आणि वास्तू शास्त्राच्या मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल.)

Web Title: Vastu Tips: Be it financial crisis or chronic illness; this remedy before going to bed will give you relief!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.