शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

Vastu Shastra: नवीन वर्षात एकही संकल्प न करण्याचा संकल्प करा, त्याऐवजी 'या' गोष्टींकडे विशेष लक्ष द्या, फायदा होईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 17:57 IST

Vastu Tips: नववर्षात दिनदर्शिका बदलण्याबरोबर आणखीही अनेक बदल करणे गरजेचे आणि आपल्या हिताचे आहेत, कोणते ते जाणून घ्या!

>>अस्मिता दीक्षित 

आपण आपल्या मनाला सतत कशात तरी अडकून पडायची जणू सवयच लावलेली आहे . सहज काहीच सुटत नाही आणि आपली सोडायची मानसिकता सुद्धा नसते. आपण सगळे जमा करून ठेवतो मग त्या घरातील अनेक वस्तू, कपडे असोत कि मनातील आठवणी आणि नको नको ती माणसे सुद्धा. वास्तू शास्त्र सांगते कि ६ महिने एखादी गोष्ट वापरली नाही तर टाकून द्या, घरात अडगळ करून ठेवू नका जसे जुनी न चालणारी घड्याळे, कपडे, दोऱ्या, पेपरची , दुधाच्या पिशव्यांची रद्दी ,द्या सगळे टाकून ....अशाच अवस्थेत एखादी वस्तू दुसऱ्याला द्या कि समोरचा अजून ६ महिने ती वस्तू वापरू शकला पाहिजे. पण नाही सगळे उराशी कवटाळून बसायचे. 

घरात चार घड्याळे असतात आणि प्रत्येक घड्याळात वेगवेगळे वाजलेले असतात मग घरातील चार लोकांची मते सुद्धा चार वेगवेगळीच असणार कि नाही . असो तर सांगायचे असे की मनाला आता ह्यात सगळ्यात अडकवून ठेवू नका, मागचे मागे सोडून जा आणि पुढे चालत राहा, पुढे मोकळे आकाश आपल्याला गवसणी घालू पाहते आहे, खूप नवीन अनुभव अजून घ्यायचे आहेत , खूप खूप लोक भेटायची आहेत ,नवीन बंध जुळायचे आहेत, पुढचे आयुष्य तुमची पुढील वळणावर आतुरतेने वाट पाहत आहे. पण आपण हा नाही बोलत तो नाही बोलत ह्याने असे केले आणि त्याने असे केले ह्यातून बाहेरच नाही पडत ...सोडून द्या. जो आपला असेल तो आपल्यासोबत असणारच आहे इतरांची पर्वा आपण का करायची. कारण आज माणसे कामापुरती वापरण्याची फ्याशन आहे.  जुने जाईल तेव्हाच नवीन येईल. 

पाणी जेव्हा वाहते असते तेव्हाच ते पिण्याजोगे असते नाहीतर त्याचे डबके होते . जुना ड्रेस द्या आणि नवीन आणा . सगळे जुने टाकून द्या आणि नवीन गोष्टीनी घर सजवा. जुन्या आठवणी क्लेशदायक असतात किती दिवस तिथेच अडकून पडणार आपण , शेवटी ज्याचे त्याचे कर्म आपल्यासोबत . किती आणि कायकाय मनाला लावून घ्यायचे आणि कश्यासाठी , लोक मजेत आनंदात जगत आहेत मग आपणच हा मनाला दुक्ख देत देत जगायचे.  वरचा बसला आहे आणि तो सगळ्याचा हिशोब वेळ आली कि करतोच आणि तो त्याचाच अधिकार आहे ह्यावर माझा विश्वास आहे .

आज समुपदेशन करताना लक्षात येते कि लोक त्याची मनाची शांतता घालवून बसली आहेत ,त्याच त्याच पाशात अडकली आहेत त्यामुळे आयुष्य जगायचेच विसरून गेली आहेत . तुम्ही कितीही चांगले वागा हा समाज तुम्हाला जगू देत नाही हे सत्य आहे . कुणालाही कुणाचे चांगले झालेले पाहवत नाही मग अशी लोक कश्याला हवी तुमच्या मित्र यादीत ? काय संबंध ? अचानक बोलणे बंद करणे अचानक आपल्या आयुष्यातून निघून जाणारी माणसे आपल्या मनाचा क्षणभर सुद्धा विचार करत नाहीत मग आपण सुद्धा त्यांचा का विचार करायचा? ती आपली कधीच नव्हती . आपण आपले मुक्त नक्कीच जगू शकतो का नाही? प्रयत्न करून बघा नक्कीच यशस्वी व्हाल. आज रोजच्या जीवनात प्रत्येक क्षणी मोठमोठाली आव्हाने आहेत. 

आजची तरुण पिढी प्रचंड स्ट्रेस मध्ये जगत आहे , मुला मुलींची लग्नाची वये खूप पुढे गेली आहेत . काही मुले तर इतरांचे अनुभव ऐकून लग्न नकोच म्हणतात . आज लग्न संस्था मोडकळीला आलेली आहे कारण जबाबदारी कुणाला नको आणि आपण एकटे जगू शकतो हा पराकोटीचा अहंकार .पण हा विचार अजून १० वर्षांनी टिकणारा नाही तेव्हा वय निघून गेलेलें असेल. असो . 

आपल्याला देवाने दिलेले २४ तास खूप काही करायला पुरेसे आहेत . स्वतःला आनंदी ठेवणे हा आजचा मोठा चालेंज आहे ,पटतंय का? कारण अर्ध आयुष्य दुसऱ्याला काय वाटेल ह्यातच व्यतीत झालय आपले. आयुष्यभर साडी नेसणाऱ्या काकू नी खरच एकदातरी  ड्रेस घालून बघावा , मग बघा त्या बदलेल्या वस्त्राबरोबर त्यांना किती मोकळे ढाकळे वाटेल. अशीच मनावर असंख्य वर्ष चढलेली नको नको त्या आठवणींची  पुटे,  जळमटे सुद्धा दूर करा , मनाची साफसफाई करतच पुढील आयुष्याचा प्रवास करुया. नाहीतर जगातील सगळे आजार होतील. माणसाचे मन आजारी पडते आणि मग शरीर म्हणूनच मनाला आनंदी ठेवण्याचा ध्यास घ्या .

नवीन वर्षात कुठलेही संकल्प करू नका कारण ते २४ सुद्धा टिकत नाहीत. चालायला जायचे आहे ना? शुभस्य शीघ्रम .उठा आणि चालायला जा ठरवू बिरवू काही नका just do it. आपल स्वतंत्र व्यक्तिमत्व जपा , आपल्या मताला सर्वप्रथम आपणच किंमत द्यायची असते तरच इतर देतील. केलेल्या चुका मोठ्या मनाने स्वीकारा तरच मन शांत होयील आणि काहीतरी मार्ग मिळेल. दुसर्याला दोष देत बसू नका ,खूप झाले ते आता . कायम दुसर्यावर अवलंबून रहायची सवय सोडून दिली पाहिजे. स्पष्ट बोलणे आणि फटकळ बोलणे ह्यात फरक आहे जो कित्येकांना समजत नाही कारण तितकी कुवत नसते . पण आपण आपली मते ठामपणे मांडायला शिकले पाहिजे .  आपण एकटे येतो आणि एकटेच जाणार आहोत आणि हेच अंतिम सत्य आहे जे बदलणार नाही त्यामुळे स्वतःचे छंद जोपासा. कशाला कायम सतत कुणीतरी हवे बरोबर . आज जितकी कमी माणसे आपल्यासोबत आणि जितक्या कमीतकमी बातम्या तितके आपण सुखी . आज घरात कुणी विचारत नाहीत म्हणून फेसबुकवर गर्दी करणारे अनेक आहेत ,सतत कुणालातरी शोधात राहणारे ,सगळेच नाहीत पण आहेत . 

अहो प्रत्येकाला दुःख आहे फक्त त्याचे स्वरूप वेगळे आहे , म्हंटलेच आहे ना जगी सर्व सुखी असा कोण आहे ? जीवन जगून खूप झाले पण आपल्या स्वतःच्या मनात त्याच्या अंतरंगात डोकवायचे राहूनच गेले. मला काय हवे आहे ? मला काय वाटते हे सगळ्यात महत्वाचे आहे. स्वतःच्या अस्तित्वाची ओळख आणि आपल्या ह्या जन्माचे प्रयोजन अति महत्वाचे आहे. ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे उपासना , साधना आणि ध्यानातून नक्कीच मिळतील निदान तसा प्रयत्न तरी केला पाहिजे. आपल्याला जे करायचे ते आपण बरोबर करतो आणि जे करायचे नाही त्यासाठी १०० कारणे सांगतो. बघा विचार करा . 

आपल्या मनाचा कल कुठे आहे ते आपल्याला माहित असते , वाचन , लेखन ह्यांनी सैरावैरा पळणारे मन  नक्कीच शांत होईल. आपली विचारधारा पक्की असणे , नियत साफ असणे आवश्यक आहे . देवाने सगळ्यांना संधी दिली आहे पण आपण त्याचा उपयोग किती करतो ते आपल्या हातात आहे . आज कुठलाही विषय किंवा क्षेत्र घ्या अत्यंत वाईट स्पर्धा , दुसर्याला खाली खेचण्याची मनोवृत्ती सर्व आहेच पण ह्यातूनही आपल्याला आपला प्रवास आनंदी करायचा आहे हे आव्हान आहे . यशाचे  शिवधनुष्य पेलण्याची जिद्द आपण ठेवायचीच आहे कारण आपले सद्गुरू अनंत हाताने आपल्या मागे उभे आहेत .

संपर्क : 8104639230 

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र