शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

Vastu Shastra: उन्हाळ्यात चुकवू नका जलदानाची संधी; वापरा मातीची भांडी, होईल अपार लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 12:29 PM

Vastu Tips: वास्तू शास्त्रानुसार घरात मातीच्या भांड्यांचा वापर जेवढा जास्त तेवढी सुख समृद्धी नांदते; उन्हाळ्यात आपणही त्याचा आवर्जून वापर करायला हवा!

पूर्वी घरोघरी बारमाही माठातले पाणी पिण्याची सवय होती. कालांतराने फ्रिज आला. लोक बाटलीतून पाणी पिऊ लागले. अलीकडच्या काळात वॉटर प्युरिफायर आले, लोक थेट त्याच्या नळाने पाणी पिऊ लागले. परंतु आजही पाण्याची खरी तहान भागते, ती माठातल्या पाण्यानी. म्हणून उन्हाळा येताच घरोघरीचे अडगळीत ठेवलेले माठ स्वयंपाकघरात स्थानापान्न होतात आणि थंड पाण्याचा स्रोत बनतात. पण याचा संबंध वास्तुशात्रज्ञांनी वास्तूच्या भरभराटीशीदेखील जोडला आहे. कसा तो पहा- 

>>वास्तुशास्त्रानुसार घरात वापरात असलेला पाण्याचा भरलेला माठ घरातील समस्यांचे निराकरण करतो. 

>>जलदान हे श्रेष्ठ दान आहे. विशेषत: उन्हाळ्यात थंड पाणी ही सर्वांचीच गरज असते. म्हणून अनेक धार्मिक स्थळांबाहेर तसेच चौकाचौकांमध्ये पाण्याचे मोठाले माठ भरून ठेवले जातात. तसेच पशु पक्ष्यांसाठी पाण्याचा कृत्रिम हौद, तलाव बांधले जातात. घराघरातील खिडक्यांमध्येही चिमणी पाखरांसाठी आवर्जून दाणा पाणी ठेवले जाते. हे पाणी मातीच्या भांड्यातून ठेवले असता त्यांनाही थंडगार पाण्याचा लाभ मिळतो. 

>> उत्तर दिशा ही जलदेवतेची दिशा आहे. म्हणून वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तरेस माठ ठेवला पाहिजे. 

>> घरात कोणाला मानसिक ताणतणाव असेल,तर त्यांना माठातील पाण्याने कोणत्याही झाडाला, रोपाला सलग काही दिवस पाणी द्यायला सांगा. मानसिक तणाव  नक्की दूर होईल. 

>>मातीचा माठच नाही, तर मातीची मूर्तीदेखील डोळ्यांना अतिशय आनंद देते. 

>>घरात शोभेसाठीदेखील मातीच्या कलात्मक माठांमध्ये दिवा प्रज्वलित केल्यास घराचे वातावरण सत्मविक होते. त्यातून सकारात्मक ऊर्जा मिळते. 

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र