शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

Varuthini Ekadashi 2023: वरुथिनी एकादशीनिमित्त जाणून घ्या बांधवगडच्या उद्यानातील विष्णूंच्या भव्य मूर्तीबद्दल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 17:49 IST

Varuthini Ekadashi 2023: विष्णूंची ही मूर्ती अति प्राचीन असल्याचे सांगितले जाते, अनेक भाविक तिथे व्याघ्रप्रकल्प, किल्ला आणि विष्णूंची भव्य मूर्ती पाहण्यास जातात. 

बांधवगढ राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश राज्यातील उमरिया जिल्ह्यात आहे. १९६८ मध्ये याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला. हे मध्य प्रदेशातील एक असे राष्ट्रीय उद्यान आहे जे ३२ टेकड्यांनी वेढलेले आहे. या ठिकाणी अनेक फळांची व फुलांची झाडे आहेत, वाघाखेरीज अनेक प्राणीही आढळतात जे सहज पाहता येतात आणि इतर अनेक प्राणी व पक्षीही येथे आढळतात. त्याबरोबरच तेथील भव्य विष्णू मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेते. 

बांधवगड हे फक्त वाघांसाठी प्रसिद्ध असले तरी या ठिकाणी अनेक भाविक विष्णूमूर्तीच्या दर्शनासाठी देखील येतात. बाधवगड नॅशनल पार्कमधील डोंगरावर असलेले शेष शैय्या हे एकमेव ठिकाण आहे जिथे तुम्हाला पायी जावे लागते. येथे भगवान विष्णू निद्रावस्थेत पहुडले आहेत. या मूर्तीची रचना अतिशय प्राचीन आणि प्रसिद्ध आहे. शिवपुराण आणि नारद-पुराणातही त्याचा उल्लेख आहे.

शेष शय्या बांधवगढ:

बांधवगडच्या टेकडीवर २ हजार वर्षे जुना किल्ला बांधला आहे, या किल्ल्याचे नाव शिवपुराणात आढळते. गडाचे बांधकाम कोणी केले? आजही याबाबत शंका आहेत. येथे शेषशैया हे प्रसिद्ध ठिकाण आहे.भगवान विष्णूची महाकाय मूर्ती अतिशय आकर्षक आणि रहस्यमय आहे. भगवान विष्णूची ही मूर्ती ६५ फूट लांब आहे. 

आत्तापर्यंत तुम्ही भगवान विष्णूच्या अनेक मूर्ती पाहिल्या असतील. क्षीरसागरमध्ये विश्रांतीच्या मुद्रेत त्याचे रूप क्वचितच दिसते. भगवान विष्णू इथे सात फणा असलेल्या नागावर म्हणजेच शेष नागावर निद्रावस्थेत विराजमान आहेत. चरणगंगा ही येथील मुख्य नदी आहे जी उद्यानातून जाते. एका प्रसिद्ध आख्यायिकेनुसार चरणगंगा नदीचा उगम भगवान विष्णूच्या चरणकमलातून झाला. त्यामुळे या नदीचे पाणी अत्यंत पवित्र मानले जाते, हे पवित्र तीर्थक्षेत्र असल्याने दिवाळीनिमित्त येथे भाविकांची मोठी गर्दी होते.

बांधवगड शेषशैया येथे वर्षातून एकदा जन्माष्टमीच्या वेळी येथे भव्य जत्रा भरते. स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तिथे दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची इच्छा भगवान विष्णू पूर्ण करतात. वर्षातून एकदा भरणाऱ्या या जत्रेत हजारो लोक पोहोचतात. राष्ट्रीय उद्यानातील बांधवगड टेकडीवर असलेला बांधवगड किल्ला आणि शेषशैया हे या ठिकाणचे प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळ आहे. राजवाड्यातून आजूबाजूची झाडे, वनस्पती आणि प्राणी यांचे दृश्य तुम्हाला मंत्रमुग्ध करून सोडते. आता बांधवगड किल्ला आणि व्याघ्र प्रकल्प एकत्र आले असले तरी श्रद्धा आणि प्रेक्षणीय स्थळ यांचा अनोखा संगम इथे पाहायला मिळतो.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स