शहरं
Join us  
Trending Stories
1
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
2
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
3
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
4
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
5
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
6
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
7
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
8
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
9
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
10
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
11
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
12
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
13
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
14
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
15
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
16
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
17
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
18
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
19
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
20
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."

एकीच्या अध्यात्माने मोठं संकटसुद्धा जमिनीत गाडता येते

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 04:05 IST

एकीने जबर शत्रूलाही हरवू शकतो याचा गावकऱ्यांना विश्वास होता.

- विजयराज बोधनकरगावातल्या ‘त्या’ वाड्यात जायला गावकऱ्यांना एकप्रकारचं भय वाटायचे. हा तीन पिढ्यांचा प्रवास आहे. बाप गेल्यानंतर वारसाने मिळालेल्या इस्टेटीवर एकुलता एक मुलगा अधिराज्य व हुकुमशाही गाजवत होता. बापाने गरिबांवर सोडलेले हुकूम आणि बळजबरीचा अत्याचारच लहानपणापासून अनुभवले होता, त्याच संस्कारात तो वाढला होता. विषाच्या बाटलीतून काही अमृत बाहेर येणार नव्हते हे गावाला माहीत होते. पण भूतकाळात कधीकाळी अमृताच्या बाटलीचे रूपांतर विषाच्या बाटलीत झाल्याचे सा-या गावाने अनुभविले होते. या एकुलत्या एक नातवाचे आजोबा फार सद्गुणी होते, वारकरी होते. पण त्याची आजी मात्र फार कपटी आणि लोभी मनाची होती. तिच्या कपटी संस्कारातच पोटचा पोरगा लाडावला आणि मग नातू बिघडला. नातवाला इतरांचे तारूण्यही नासविण्याचे व्यसन लागले होते. घरात काम करणा-या गरीब भोळ्या स्त्रियांना फसवून तो अत्याचार करू लागला. कारण त्याला दौलतीने दंश केला होता. हळूहळू गावात त्याची धग जाणवू लागली. लोकांच्या मनात हळूहळू एक चीड निर्माण झाली होती. दौलतीने नातवाने रग्गड माणसे दावणीला बांधली असली तरी गावात एकीचे अध्यात्म विश्वासाचे होते. या एकीने जबर शत्रूलाही हरवू शकतो याचा गावकऱ्यांना विश्वास होता.गावातले पाप समूळ नष्ट करण्याचा गावाने विडा उचलला. एकीचे बळ खूप मोठे असते हे गावकरी जाणून होते. जुलुमाने हैवानाचे रूप घेतले आणि एक दिवस एका पीडित स्त्रीने बंड पुकारले. तिच्यामागे पूर्ण गाव उभा राहिला आणि त्या अत्याचारी नातवाच्या विरोधात गावाने पोलीस दरबारी रिपोर्ट केला. त्या निर्मळ स्त्रीवर झालेला बळजबरीच्या अत्याचाराच्या अर्जावर अर्ध्या गावाच्या सह्या केल्या गेल्या आणि या एकीमुळेच गाव सशक्त बनला. शापित संपत्ती शेवटी हरली. नातवाला तुरूंगाची हवा खावी लागली. तात्पर्य हेच की एकीच्या अध्यात्माने मोठं संकटसुद्धा जमिनीत गाडता येते.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक