शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

एकीच्या अध्यात्माने मोठं संकटसुद्धा जमिनीत गाडता येते

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 04:05 IST

एकीने जबर शत्रूलाही हरवू शकतो याचा गावकऱ्यांना विश्वास होता.

- विजयराज बोधनकरगावातल्या ‘त्या’ वाड्यात जायला गावकऱ्यांना एकप्रकारचं भय वाटायचे. हा तीन पिढ्यांचा प्रवास आहे. बाप गेल्यानंतर वारसाने मिळालेल्या इस्टेटीवर एकुलता एक मुलगा अधिराज्य व हुकुमशाही गाजवत होता. बापाने गरिबांवर सोडलेले हुकूम आणि बळजबरीचा अत्याचारच लहानपणापासून अनुभवले होता, त्याच संस्कारात तो वाढला होता. विषाच्या बाटलीतून काही अमृत बाहेर येणार नव्हते हे गावाला माहीत होते. पण भूतकाळात कधीकाळी अमृताच्या बाटलीचे रूपांतर विषाच्या बाटलीत झाल्याचे सा-या गावाने अनुभविले होते. या एकुलत्या एक नातवाचे आजोबा फार सद्गुणी होते, वारकरी होते. पण त्याची आजी मात्र फार कपटी आणि लोभी मनाची होती. तिच्या कपटी संस्कारातच पोटचा पोरगा लाडावला आणि मग नातू बिघडला. नातवाला इतरांचे तारूण्यही नासविण्याचे व्यसन लागले होते. घरात काम करणा-या गरीब भोळ्या स्त्रियांना फसवून तो अत्याचार करू लागला. कारण त्याला दौलतीने दंश केला होता. हळूहळू गावात त्याची धग जाणवू लागली. लोकांच्या मनात हळूहळू एक चीड निर्माण झाली होती. दौलतीने नातवाने रग्गड माणसे दावणीला बांधली असली तरी गावात एकीचे अध्यात्म विश्वासाचे होते. या एकीने जबर शत्रूलाही हरवू शकतो याचा गावकऱ्यांना विश्वास होता.गावातले पाप समूळ नष्ट करण्याचा गावाने विडा उचलला. एकीचे बळ खूप मोठे असते हे गावकरी जाणून होते. जुलुमाने हैवानाचे रूप घेतले आणि एक दिवस एका पीडित स्त्रीने बंड पुकारले. तिच्यामागे पूर्ण गाव उभा राहिला आणि त्या अत्याचारी नातवाच्या विरोधात गावाने पोलीस दरबारी रिपोर्ट केला. त्या निर्मळ स्त्रीवर झालेला बळजबरीच्या अत्याचाराच्या अर्जावर अर्ध्या गावाच्या सह्या केल्या गेल्या आणि या एकीमुळेच गाव सशक्त बनला. शापित संपत्ती शेवटी हरली. नातवाला तुरूंगाची हवा खावी लागली. तात्पर्य हेच की एकीच्या अध्यात्माने मोठं संकटसुद्धा जमिनीत गाडता येते.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक