शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

जो जो जयाचा घेतला गुण, तो तो गुरु म्या केला जाण- दत्तगुरुंचे चोवीस गुरु; लेखमाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 15:05 IST

दत्तगुरूंनी तसे तर अगणित गुरु केले. ते म्हणतात, ज्याचा गुण मी घेतला, तो माझा गुरु झाला, परंतु ज्यांच्यातील दोष पाहून मी त्या दोषाचा त्याग केला तो देखील माझा गुरु झाला. पैकी मुख्यत्वे गुरु कोणकोणते ते लेखमालेत पाहू. 

गुरुंचे गुरु परात्पर गुरु म्हणजे दत्तगुरु, त्यांनीही कलियुगात अवतरून गुरु केले. एक दोन नाही तर चोविस गुरु. त्या गुरुंकडून ते काय शिकले, ते जाणून घेत आपणही देवदत्त परुळेकर यांच्या एका जनार्दनी कथामालेतून चोविस गुरुंचा आजपासून थोडा थोडा परिचय करून घेऊया. जेणेकरून आपल्यालाही पदोपदी जेव्हा गुरुंची उणीव भासेल, त्यावेळेस दत्तगुरुंची गुरुभक्ती आठवून आपल्यालाही गुरुंचा शोध घेता येईल. 

हेही वाचा : वासुदेव फडके जयंती विशेषः प्रखर दत्तभक्त आणि धर्म-राष्ट्राची उपासना 'बळवंत' असणारे आद्य क्रांतिकारक

तू ब्रह्मवेत्ता ब्राह्मण, निजानंदे परिपूर्णत्या आनंदाचे कारण, विशद करून सांगावे।तू देही वर्तसी विदेहस्थिती, तुज विषय आतळू न शक्ती,हे अलिप्तपणाची प्राप्ती, कवण्या रीती तुज झाली।तुज नाही रायाची भीड, न करीसी धनवंताची चाड,दीनवचन मानिसी गोड, पुरविसी कोड निजबोधे।ऐसा केवळ तू कृपाळू, आर्तबंधू दीनदयाळू,निजात्मभावे तू केवळु, भक्तवत्सलु भावार्थे।

हे अवधूता, तू ब्रह्मवेत्ता असून आत्मानंदाने परिपूर्ण आहेस. त्या आनंदाचे कारण काय? तू देहात असून विदेहास्थितीने वागतोस. दृष्यविषय तुला स्पर्शसुद्धा करू शकत नाहीत. धनवंताची चाड नाही. दीनांचे भाषण मात्र तू गोड मानतोस आणि आत्मज्ञान देऊन तू त्यांचे मनोरथ पूर्ण करतोस. तू आर्तबंधू व दीनदयाळ आहेस. ज्यांचा भाव शुद्ध असतो, त्यांना भक्तवत्सल आहेस. म्हणून आत्मज्ञानाचे गूढ मला समजावून सांग.

अवधूताने राजाच्या प्रश्नांना उत्तर देताना सबंध विश्वाला गुरुरुपाने पहावे असा अत्यंत महत्वाचा सिद्धांत सांगितला. हे विश्व भगवंताचेच व्यक्तस्वरूप आहे. त्यातील प्रत्येक वस्तूमध्ये तो गुणरुपाने विलसत आहे. तो गुण शोधून त्याला गुरु बनवा. अशी स्वत:मध्ये व जगामध्ये असार टावूâन सार शोधून काढणारी बुद्धी तिला सद्बुद्धी म्हणातात.

अवधूताचा हा उपदेश केवळ पारमार्थिक साधकालाच नव्हे तर प्रत्येकालाच उपयुक्त आहे. आज सर्व शिक्षणतज्ञ बीन भिंतीच्या उघड्या शाळेचा आग्रह धरतातेत. शिक्षण शाळेतून बाहेर यायला हवे. बाहेरच्या खुल्या जगात उघड्या डोळ्यांनी आणि मोकळ्या मनाने बुद्धीने पाहिले तर खूप काही शिकता येण्यासारखे आहे. 

जो जो जयाचा घेतला गुण, तो तो गुरु म्या केला जाणगुरुसी आले अपारपण, जण संपूर्ण गुरु दिसेज्याचा गुण घेतला, तो सहजे गुरुत्वा आलाज्याचा गुण त्यागरूपे घेतला, तोही गुरु झाला अहितत्यागे

दत्तगुरूंनी तसे तर अगणित गुरु केले. ते म्हणतात, ज्याचा गुण मी घेतला, तो माझा गुरु झाला, परंतु ज्यांच्यातील दोष पाहून मी त्या दोषाचा त्याग केला तो देखील माझा गुरु झाला. पैकी मुख्यत्वे गुरु कोणकोणते ते लेखमालेत पाहू. 

हेही वाचा : ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा बहुमूल्य विचार!