शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 15:35 IST

Swami Vivekananda Spiritual Experience: गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या कृपेने स्वामी विवेकानंदांना महाकालीचे दर्शन झाले तेव्हा त्यांनी काय मागितले आणि त्यांना ते कसे मिळाले, ते त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या!

आपण देवाकडे सतत काही ना काही मागत असतो, पण देव खरच प्रगट झाला आणि माग म्हणाला, तर त्या क्षणी नेमके काय मागायला हवे ते स्वामी विवेकानंद यांच्याकडून शिकायला हवे. आज त्यांची पुण्यतिथि, त्यानिमित्त त्याच्या चरित्र भागातील हा संदर्भ आपल्यासमोर आदर्श राहण्यासाठी!

भगवान ज्यांना ज्यांना आजपर्यंत भेटले म्हणजे ज्यांना त्यांनी दर्शन दिले आहे, त्या सर्व भक्तांचे लक्षण हे आहे, की ते स्वत: परमेश्वराची उपासना करत राहिले. उदा. रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण परमहंसांशी प्रत्यक्ष जगदंबा बोलत होती. म्हणून काही त्यांनी मूर्तीपूजा सोडली नाही. तसेच त्या मूर्तीला मान देणे सोडले नाही. उलट ती जगदंबा त्या मूर्तीतून प्रगट होत होती हे जेव्हा रामकृष्णांच्या लक्षात आले, तेव्हा ते जगदंबेच्या त्या मूर्तीची अधिक भक्ती भावाने पूजा करू लागले.  ते कधी जगदंबा, जगदंबा तर कधी आई आई म्हणून ओरडत असत. रडत असत. यावरून भगवंताच्या मूर्ती किती श्रेष्ठ असतात, हे त्यांनी विवेकानंदांनाही पटवून दिले. 

स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!

एकदा स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंसांकडे गेले होते. गेल्यानंतर समोर बसले आणि त्यांनी विचारले, `तुम्ही देव पाहिला का हो?' ते म्हणाले `हो.' त्यावर स्वामींचा प्रतिप्रश्न, `देव कसा दिसतो?' परमहंस म्हणाले, `ते तुला सांगता यायचे नाही. पण तुला देव पहायचा असेल, तर मी तुला दाखवतो. मी देव पाहिलेला आहे. ज्यातून मी देव पाहिलेला आहे त्या देवाकडे तू जातोस का?' 

असे म्हणत परमहंसांनी स्वामींना आतल्या खोलीच्या दिशेने बोट करत म्हटले, `जा आत, तिथे जगदंबा बसली आहे. दर्शन घेऊन ये. विवेकानंद उठले, आत गेले व बऱ्याच वेळाने बाहेर आले. परमहंसांनी उत्सुकतेने विचारले, `दिसली का देवी? देवीकडे काय मागितले? विवेकानंद म्हणाले, `मी देवीकडे ज्ञान, तेज आणि वैराग्य मागितले.'

परमहंस म्हणाले, `कधी नव्हे ते देवीने दर्शन दिले आणि तू तिच्याकडे वैराग्य मागून आलास? परत जा आणि देवीकडे धन, संपत्ती, वैभव, प्रसिद्धी मागून घे.'विवेकानंद पुन्हा आत गेले आणि आशीर्वाद घेऊन बाहेर आले. या खेपेतही आपण आधीसारखेच मागितले. या घटनेवरून विवेकानंदांनी अनुमान काढले व परमहंसांना म्हणाले, `मूर्ती दिसायला साधी असली, तरी त्यात देवीचे वास्तव्य आहे. हे वास्तव्य प्रत्येक मूर्तीत असते. परंतु ते जाणवण्यासाठी सत्संग घडावा लागतो आणि देवाला पाहण्यासाठी गुरुकृपा व्हावी लागते. म्हणून संत म्हणत असत, 

देव देखिला देखिला, गुरुकृपे ओळखिला!

टॅग्स :Swami Vivekanandaस्वामी विवेकानंदDeathमृत्यूspiritualअध्यात्मिक