शहरं
Join us  
Trending Stories
1
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
2
Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
3
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
4
टीम इंडिया ९३ धावांवर 'ऑलआउट', दुसरीकडे करुण नायरने एकट्याने केल्या त्यापेक्षा जास्त धावा
5
पुण्यातील या नगर परिषदेत ठाकरे आणि शिंदे गट एकत्र, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा
6
पाक विरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघासाठी कसे असेल Asia Cup स्पर्धेतील सेमीच समीकरण?
7
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
8
भ्रष्टाचाराचं Live प्रेझेंटेशन... तरुणाचा महापौरांसमोरच कॉल, अधिकाऱ्यांच्या 'रेट लिस्ट'चा पर्दाफाश
9
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
10
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
11
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
12
Stock Market: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; सेन्सेक्समध्ये १०० अंकांची तेजी, निफ्टी २५,९०० च्या वर
13
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
14
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
15
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
16
GenZ च्या आंदोलनामुळे हादरलेल्या नेपाळमध्ये अखेर निवडणुकांची घोषणा, मार्च महिन्यात मतदान
17
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
18
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
19
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
20
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

Swami Samartha: आज स्वामी समर्थांना नैवेद्य अर्पण केल्यावर विडा द्यायला विसरू नका; जाणून घ्या महत्त्व!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 12:02 IST

Swami Samartha: देवाला विडा अर्पण करण्याचे अनेक लाभ आहेत, ते जाणून घेत त्यामागील आध्यात्मिक भावदेखील जाणून घ्या.

कोणत्याही पूजेमध्ये विड्याचे पान वापरणे खूप शुभ मानले जाते. हिंदू धर्मात विड्याचे पान अत्यंत पवित्र मानले जाते. असे मानले जाते की समुद्रमंथनाच्या वेळी देवतांनी भगवान विष्णूची विड्याच्या पानांनी पूजा केली. तेव्हापासून पूजेत विड्याच्या वापर केला जातो. या पानांमध्ये देवी-देवता वास करतात असे मानले जाते. आज स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन (Swami Samartha Prakat din 2025) आहे, त्यानिमित्त स्वामींना नैवेद्य दाखवून झाल्यावर विडा द्यायला विसरू नका. 

ज्योतिषशास्त्रात विड्याच्या पानांशी संबंधित उपाय आणि युक्त्या खूप प्रभावी मानल्या गेल्या आहेत. विड्याची पाने केवळ कामात यश मिळवून देत नाहीत तर आपल्या कामातील अडथळेही दूर होतात. 

इच्छापूर्तीसाठी विड्याच्या पानाचे उपाय

>> इच्छापूर्तीसाठी दर मंगळवारी किंवा शनिवारी स्नान करून मंदिरात जावे. बजरंगबलीला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून विडा अर्पण करावा. 

>> विड्याच्या पानांमध्ये सकारात्मक ऊर्जा असते. ही पाने नकारात्मक शक्तींना शोषून घेतात. म्हणून वास्तुशास्त्राने घरात नागवेलीच्या पानांचा अर्थात विड्याच्या पानांचा वेल लावावा असे सांगितले आहे. 

>> स्वामी समर्थांना आपण विडा अर्पण करतो तसा दर गुरुवारी दत्त गुरूंना स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवून विडा अर्पण करावा. त्यामुळे प्रापंचिक कलह दूर होऊन कौटुंबिक नाते सुधारते. 

>> व्यवसाय वाढीसाठी किंवा लक्ष्मीप्राप्तीसाठी मंगळवारी किंवा शुक्रवारी एखाद्या सुवासिनीची ओटी भरून, जेवू घालून विडा द्यावा. तिने संतुष्ट होऊन आशीर्वाद दिले असता व्यवसाय वृद्धी होते तसेच लक्ष्मी प्रसन्न होते.  गुढी पाडव्याला चैत्र नवरात्र(Chaitra Navratri 2025) सुरू झाली आहे, त्यानिमित्ताने देवीलाही विडा अर्पण करा. 

आज स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त स्वामींना विडा अर्पण करताना पुढील कवन म्हणा आणि त्याचा भावार्थही समजून घ्या. 

विडा घ्या हो स्वामिराया l भक्तवत्सल करुणालया llदेतो हात जोडोनियां ll भावें वंदुनिया पायां ll धृ llज्ञानदृष्टी पुगिफळ ll तुमच्या कृपेचे हे बळ llमूळ आधार सोज्वळ ll पापी पतित ताराया ll १ llभक्तीदळ नागवल्ली ll पाने शुद्धही काढिली llनामबळे निर्मळ केली ll सिद्ध झालो जी अर्पाया ll २ llरंगी रंगला हा कात ll प्रेमभावाच्या सहित llत्याने केले माझे हित ll देह लावियला पायां ll ३ llचुना शांती निर्मळ ll त्वांचि दिले भक्तीबळ llकरुनी मनासी कोमळ ll चरणी घातली ही काया ll ४ llवेलची ज्ञानज्योत ll सर्व भूतांच्या विरहित llठेवुनी तुमच्या पायी हेत ll लागे मनासी वळवाया ll ५ llलवंग जाणां तिखट खरी ll घेउनी बुद्धीच्या चतुरी llक्रोध दवडीयला दूरी ll तूची समर्थ ताराया ll ६ llवैराग्याचे जायफळ ll तुम्ही दिले भावबळ llकरुनी विरक्त निर्मळ ll शिरी ठेवियेली छाया ll ७ llपत्री क्षमेची या परी ll बापा मिळविली बरी llसदा राहोनी अंतरी ll सुखे सुखविते देहा ll ८ llकाय बदामाची मात ll फोडुनि द्वैताचा हा हेत llवाढावया भक्तिपंथ ll सिद्ध केला करुणालया ll ९ llआत्महिताहित कस्तुरी ll घेउनी ज्ञानभक्तीपरी llधन्य हिची थोरी ll भविभवात ताराया ll १० llआनंद म्हणे केशर सत्य ll तुमचे पायी माझा हेत llपूर्ण केले मनोरथ ll कृतीकर्मासी वाराया ll ११ ll

कवनाचे शब्द लक्षात घेतले तर हा केवळ प्रापंचिक विडा नाही तर पारमार्थिक विडा असल्याचे लक्षात येईल. हा विडा अर्पण देवाला करायचा आणि त्यामुळे चढणारा भक्तिरंग भक्ताने अनुभवायचा हा त्यामागचा मूळ भावार्थ! त्यामुळे केवळ स्वामींनाच नाही तर दत्ताला, हनुमंताला, रामरायाला, विठुरायाला, साईनाथाला अशा अनेक देवांना विडा अर्पण केल्याची सुमधुर कवने आपल्याला आढळतील. हा झाला पारमार्थिक उद्धार, आता प्रापंचिक उद्धार कसा होतो तेही जाणून घेऊ

टॅग्स :shree swami samarthश्री स्वामी समर्थfoodअन्नPuja Vidhiपूजा विधी