शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

Swami Samartha: आज स्वामी समर्थांना नैवेद्य अर्पण केल्यावर विडा द्यायला विसरू नका; जाणून घ्या महत्त्व!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 12:02 IST

Swami Samartha: देवाला विडा अर्पण करण्याचे अनेक लाभ आहेत, ते जाणून घेत त्यामागील आध्यात्मिक भावदेखील जाणून घ्या.

कोणत्याही पूजेमध्ये विड्याचे पान वापरणे खूप शुभ मानले जाते. हिंदू धर्मात विड्याचे पान अत्यंत पवित्र मानले जाते. असे मानले जाते की समुद्रमंथनाच्या वेळी देवतांनी भगवान विष्णूची विड्याच्या पानांनी पूजा केली. तेव्हापासून पूजेत विड्याच्या वापर केला जातो. या पानांमध्ये देवी-देवता वास करतात असे मानले जाते. आज स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन (Swami Samartha Prakat din 2025) आहे, त्यानिमित्त स्वामींना नैवेद्य दाखवून झाल्यावर विडा द्यायला विसरू नका. 

ज्योतिषशास्त्रात विड्याच्या पानांशी संबंधित उपाय आणि युक्त्या खूप प्रभावी मानल्या गेल्या आहेत. विड्याची पाने केवळ कामात यश मिळवून देत नाहीत तर आपल्या कामातील अडथळेही दूर होतात. 

इच्छापूर्तीसाठी विड्याच्या पानाचे उपाय

>> इच्छापूर्तीसाठी दर मंगळवारी किंवा शनिवारी स्नान करून मंदिरात जावे. बजरंगबलीला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून विडा अर्पण करावा. 

>> विड्याच्या पानांमध्ये सकारात्मक ऊर्जा असते. ही पाने नकारात्मक शक्तींना शोषून घेतात. म्हणून वास्तुशास्त्राने घरात नागवेलीच्या पानांचा अर्थात विड्याच्या पानांचा वेल लावावा असे सांगितले आहे. 

>> स्वामी समर्थांना आपण विडा अर्पण करतो तसा दर गुरुवारी दत्त गुरूंना स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवून विडा अर्पण करावा. त्यामुळे प्रापंचिक कलह दूर होऊन कौटुंबिक नाते सुधारते. 

>> व्यवसाय वाढीसाठी किंवा लक्ष्मीप्राप्तीसाठी मंगळवारी किंवा शुक्रवारी एखाद्या सुवासिनीची ओटी भरून, जेवू घालून विडा द्यावा. तिने संतुष्ट होऊन आशीर्वाद दिले असता व्यवसाय वृद्धी होते तसेच लक्ष्मी प्रसन्न होते.  गुढी पाडव्याला चैत्र नवरात्र(Chaitra Navratri 2025) सुरू झाली आहे, त्यानिमित्ताने देवीलाही विडा अर्पण करा. 

आज स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त स्वामींना विडा अर्पण करताना पुढील कवन म्हणा आणि त्याचा भावार्थही समजून घ्या. 

विडा घ्या हो स्वामिराया l भक्तवत्सल करुणालया llदेतो हात जोडोनियां ll भावें वंदुनिया पायां ll धृ llज्ञानदृष्टी पुगिफळ ll तुमच्या कृपेचे हे बळ llमूळ आधार सोज्वळ ll पापी पतित ताराया ll १ llभक्तीदळ नागवल्ली ll पाने शुद्धही काढिली llनामबळे निर्मळ केली ll सिद्ध झालो जी अर्पाया ll २ llरंगी रंगला हा कात ll प्रेमभावाच्या सहित llत्याने केले माझे हित ll देह लावियला पायां ll ३ llचुना शांती निर्मळ ll त्वांचि दिले भक्तीबळ llकरुनी मनासी कोमळ ll चरणी घातली ही काया ll ४ llवेलची ज्ञानज्योत ll सर्व भूतांच्या विरहित llठेवुनी तुमच्या पायी हेत ll लागे मनासी वळवाया ll ५ llलवंग जाणां तिखट खरी ll घेउनी बुद्धीच्या चतुरी llक्रोध दवडीयला दूरी ll तूची समर्थ ताराया ll ६ llवैराग्याचे जायफळ ll तुम्ही दिले भावबळ llकरुनी विरक्त निर्मळ ll शिरी ठेवियेली छाया ll ७ llपत्री क्षमेची या परी ll बापा मिळविली बरी llसदा राहोनी अंतरी ll सुखे सुखविते देहा ll ८ llकाय बदामाची मात ll फोडुनि द्वैताचा हा हेत llवाढावया भक्तिपंथ ll सिद्ध केला करुणालया ll ९ llआत्महिताहित कस्तुरी ll घेउनी ज्ञानभक्तीपरी llधन्य हिची थोरी ll भविभवात ताराया ll १० llआनंद म्हणे केशर सत्य ll तुमचे पायी माझा हेत llपूर्ण केले मनोरथ ll कृतीकर्मासी वाराया ll ११ ll

कवनाचे शब्द लक्षात घेतले तर हा केवळ प्रापंचिक विडा नाही तर पारमार्थिक विडा असल्याचे लक्षात येईल. हा विडा अर्पण देवाला करायचा आणि त्यामुळे चढणारा भक्तिरंग भक्ताने अनुभवायचा हा त्यामागचा मूळ भावार्थ! त्यामुळे केवळ स्वामींनाच नाही तर दत्ताला, हनुमंताला, रामरायाला, विठुरायाला, साईनाथाला अशा अनेक देवांना विडा अर्पण केल्याची सुमधुर कवने आपल्याला आढळतील. हा झाला पारमार्थिक उद्धार, आता प्रापंचिक उद्धार कसा होतो तेही जाणून घेऊ

टॅग्स :shree swami samarthश्री स्वामी समर्थfoodअन्नPuja Vidhiपूजा विधी