शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
2
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
3
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
4
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
5
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
6
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
7
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
8
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
9
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
10
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
11
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
12
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
13
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
14
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
15
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
16
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
17
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
18
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
19
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
20
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे' या ओळींची आठवण करून देणारी भगवान बुद्धांची कथा.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 11:59 IST

माणसाने भूतकाळातील चुकांचा विचार न करता भविष्यात कोणत्या चूका टाळता येतील, याचा विचार केला पाहिजे आणि कायम वर्तमानात जगले पाहिजे.

एकदा भगवान बुद्ध विहार करण्यासाठी निघाले. त्यांच्यापाठोपाठ त्यांचा शिष्यवर्ग जायला निघाला. भगवान म्हणाले, `मी मोठ्या परिक्रमेसाठी जात आहे, तुम्ही सर्वांनी येऊ नका, इथेच मठात राहून इथली व्यवस्था पहा. मी काही दिवसात परत येतो.'

भगवानांनी केलेल्या सूचनेनुसार शिष्यगण मठात राहिले आणि भगवान एकटेच भ्रमंतीसाठी निघाले. भगवानांना ओळखणारा अनुयायी वर्ग मोठ्या प्रमाणात गावोगावी होता. काही जण त्यांना प्रत्यक्ष ओळखत होते, तर काही जणांनी त्यांची केवळ ख्याती ऐकली होती. 

लोकांचे अभिवादन स्वीकारत भगवान जात होते. एका सकाळी एका गावातून जात असताना दारु प्यायलेला एक माणूस स्वत:च्याच घरासमोर उभा राहून घरच्यांना शिवीगाळ करत होता. भगवान तिथून जात होते. त्या व्यक्तीने भगवानांना पाहिले. हा कोण गोसावी भिक्षा मागायला आला, अशा विचाराने तो त्यांच्याशी उद्धटपणे बोलू लागला. त्याने भगवानांना बरेच काही सुनावले. गाव गोळा झाले. भगवानांनी शांतपणे ऐकून घेतले व ते निघाले.

सायंकाळी त्याची नशा उतरल्यावर गावातल्या बुजूर्ग व्यक्तीने त्या व्यक्तीला चूक निदर्शनास आणून दिली. तो म्हणाला, `पण मी ज्याला बोल सुनावले ते भगवान बुद्ध नव्हतेच, ते कायम आपल्या शिष्यांबरोबर असतात.' बुजूर्ग व्यक्ती म्हणाली, `यंदा, भगवान एकटेच निघाले होते, पण तू नशेत असल्यामुळे तू त्यांना ओळखू शकला नाहीस. तुझ्याकडून मोठे पाप घडले आहे. तू त्यांची क्षमा मागितली पाहिजे.'

दारुड्या माणसाला त्याची चूक उमगली. भविष्यात दारूला स्पर्शही करायचा नाही असा त्याने पण केला आणि भगवान बुद्धांचा शोध घेत तो निघाला. वाटेत लोकांना विचारत विचारत दुसऱ्या दिवशी तो जवळच्या गावात पोहोचला, तिथे एका वटवृक्षाखाली भगवान ध्यानस्थ बसले होते. ते समाधीतून बाहेर यायची वाट बघत तो मनुष्य जमीनिवर बसून राहीला.

भगवान बुद्धांनी डोळे उघडले. ते पुढच्या प्रवासाला जायला निघाले, तो समोर असलेला मनुष्य त्यांचे पाय धरत गयावया करू लागला. भगवान म्हणाले, `तू का रडतोस? कसली क्षमा मागतोस?'

तो म्हणाला, `काल सकाळी मी तुम्हाला नशेच्या भरात वाटेल ते बोललो. मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. माझी चूक लक्षात घेऊन यापुढे नशा करणार नाही, असा पण मी केला आहे. पण माझ्या हातून घडलेल्या चुकीबद्दल मला माफ करा.'

भगवान बुद्धांनी त्याला उठून उभे केले आणि म्हणाले, `तू नशा सोडलीस हे चांगलेच झाले, परंतु तू सांगत असलेला प्रसंग मला आठवतही नाही. मी विसरलो, तसा तूही विसरून जा. चांगले आयुष्य जग. माणसाने भूतकाळातील चुकांचा विचार न करता भविष्यात कोणत्या चूका टाळता येतील, याचा विचार केला पाहिजे आणि कायम वर्तमानात जगले पाहिजे.'