शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्कन्द पुराण सांगते, नरकाचे तोंड बघायचे नसेल तर 'या' पाच वृक्षांची लागवड अवश्य करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 13:09 IST

या पुण्यकर्माने जिवंतपणी तर नाहीच पण मरणोत्तरही नरकाचे तोंड बघावे लागणार नाही अशी स्कंद पुराणाने हमी दिली आहे!

'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' असे म्हणत आपल्या संतांनी थेट वृक्ष वेलींशीं सोयरीक जोडली आहे. आपण त्यांचे अभंग म्हणतो परंतु त्यांनी दिलेला संदेश लक्षात घेत नाही. वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन यावर भर देत नाही मग अंगाची काहिली झाली, सावली मिळाली नाही, पाऊस वेळेत पडला नाही की रडत बसतो. म्हणूनच संत वचनाला स्कंद पुराणाची जोड देत वृक्ष लागवडीचे महत्त्व समजून घेऊ. 

सध्या आपण पाहतो, की रस्त्याच्या दुतर्फा परदेशी झाडांनी देशी झाडांची जागा व्यापून टाकली आहे. त्या झाडांचा ना सरणाला उपयोग ना सावलीला. केवळ पाला पाचोळा नि कचरा. त्यापेक्षा आपल्या पूर्वजांनी नेहमी आंबा, वड, पिंपळ यांच्या लागवडीवर भर दिला. त्याला अध्यात्मिक तसेच शास्त्रीय आधार सुद्धा आहे. कसा ते जाणून घेऊ...   स्कन्द पुराणात एक अद्भुत श्लोक आहे:

अश्वत्थमेकम् पिचुमन्दमेकम्न्यग्रोधमेकम्  दश चिञ्चिणीकान् ।कपित्थबिल्वाऽऽमलकत्रयञ्च. पञ्चाऽऽम्रमुप्त्वा नरकन्न पश्येत्।।

अश्वत्थः = पिपंळ,  पिचुमन्दः = कडूनिंब,  न्यग्रोधः = वट वृक्ष,  चिञ्चिणी = चिंच,  कपित्थः = कवठ,  बिल्वः = बेल, आमलकः = आवळा, आम्रः = आंबा (उप्ति = झाडे  लावणे) 

जो कोणी या झाडांची लागवड करेल ,त्यांची निगा राखेल त्याला नरकाचे दर्शन होत नाही. असा या श्लोकाचा अर्थ आहे. यावरून आपल्याला वरील झाडांचे अध्यात्मिक महत्त्व तर कळलेच. शिवाय त्याचे भौगोलिक महत्त्व देखील समजून घेऊ. 

गुलमोहर, निलगिरी, सुबाभूळ ही झाडे आपल्या देशातील पर्यावरणाला घातक आहेत. तरी पाश्चात्यांचे अंधानुकरण करून अगदी पर्यावरणाच्या बाबतीत देखील ज्या चुका घडल्या त्या वड, पिंपळ,आंबा चिंच आदी झाडे लावून पुढच्या पिढीला निरोगी आणि सुजलां सुफलां पर्यावरण देण्याचा प्रयत्न करू. 

दुष्काळाचे खरे कारण 

पिंपळ, वड आणि लिंब हि झाडे लावणे बंद केल्याने दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. हे वाचुन आपल्याला विचित्र वाटेल, परंतु हे सत्य आहे. पिंपळ कार्बन डाय ऑक्साइड १००% शोषून घेतो, तर वड  ८०% आणि कडुलिंब ७५% शोषतो आणि ही झाडे परिसराला गारवा निर्माण करतात तसेच प्राणवायू देऊन नैसर्गिक ताजेतवाने करण्याचे काम करतात. 

काही वर्षांपूर्वी यूकेलिप्टसची (नीलगिरी) झाडे लावण्यास सुरुवात झाली. यूकेलिप्टस फार पटकन वाढते. दलदलीची जमीन कोरडी करण्यासाठी हे झाड लावले जाते. ज्यामुळे जमीन जलविहीन होते.गेल्या ४० वर्षांपासून हे वृक्ष सर्वमहामार्गांवर दुतर्फा लावले गेली आहेत. त्यामुळे उष्णता वाढून वेगाने पाण्याची वाफ होत आहे. 

पिंपळाला झाडांचा राजा म्हणतात. त्याच्या स्तुती मध्ये एक श्लोक आहे -

मूले ब्रह्मा त्वचा विष्णु शाखा शंकरमेवच!!पत्रे पत्रे सर्वदेवायाम् वृक्ष राज्ञो नमोस्तुते!!

पिंपळाच्या मुळामध्ये ब्रह्मदेव, खोडामध्ये भगवान विष्णू, शाखांमध्ये महादेव यांचे वास्तव्य असते तर सर्व पानापानांमध्ये अन्य देवतांचे वास्तव्य असते. म्हणून पिंपळाला अध्यात्मिक दृष्ट्या खूप महत्त्व आहे. त्याची पूजादेखील केली जाते. विशेषतः हे झाड पक्ष्यांच्या विष्ठेमार्फत बीजारोपण होऊन रुजले जाते. पण काही लोक तेही खुडून टाकतात आणि पर्यावरणाला हानी पोहोचवतात. त्यांना रोखले पाहिजे आणि पिंपळाची सळसळ, चैतन्य वातावरणात रुजवली पाहिजे. 

आपण जितकी जास्त वड, पिंपळ, आंबा, कडुलिंब यांची झाडे लावू, तेवढा आगामी पिढीला त्याचा फायदा होणार आहे. देश प्रदूषण मुक्त होईल. पुढची पिढी आपले आभार मानेल. त्यासाठी पावसाळ्यापूर्वीच या वृक्षाची लागवड सुरू करा. या पुण्यकर्माने जिवंतपणी तर नाहीच पण मरणोत्तरही नरकाचे तोंड बघावे लागणार नाही अशी स्कंद पुराणाने हमी दिली आहे!

टॅग्स :Healthआरोग्यenvironmentपर्यावरण