शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानच्या उप पंतप्रधानांचे मोठे विधान
3
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
4
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
5
अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
6
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
7
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
8
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
9
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
10
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
12
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
13
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
14
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
15
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
16
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
17
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 
18
Narasimha Jayanti 2025: 'नृसिंह म्हणजे समाजातून सिंहासारखा उभा ठाकलेला वीर!'-प.पू.आठवले शास्त्री
19
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
20
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश

भारत पाकिस्तानची स्थिती पाहता मोदींच्या निर्णयाबाबत श्री.श्री. रविशंकर यांनी केले मोठे विधान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 14:49 IST

साधू, संत, गुरु परंपरेतले लोक मुख्यत्त्वे अहिंसेचा मार्ग निवडा असे सांगतात, मात्र सध्याची भारत पाक स्थिती पाहता रविशंकर आक्रमक होत म्हणाले... 

ऑपरेशन सिंदूरचा(Opreation Sindoor) पहिला टप्पा पार पडल्यानंतर पुढे काय हा प्रश्न प्रत्येक भारतीयांच्या मनात घोळत असतानाच भारतीय लष्कराने आक्रमक होत पाकिस्तानातील दहशतवादी तळ उध्वस्त केले आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक ते आपली मोहीम राबवत आहेत. पाकिस्तानतून त्यावर प्रत्युत्तर मिळत आहे. सोशल मीडियावर लोकांच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत, अनेक सेलिब्रेटीसुद्धा आपला पाठिंबा दर्शवत आहेत, सैन्याला प्रोत्साहन देत आहेत. अशातच अध्यात्मिक गुरु आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रमुख श्री. श्री. रविशंकर यांनीदेखील मोठे विधान केले आहे. 

श्री. श्री. रविशंकर म्हणाले, 'आतंकवाद मानवतेच्या विरोधी आहे. आतंकवाद समूळ नष्ट करण्यासाठी भारताने उचललेले पाऊल अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आपले देवी देवता सुद्धा सशस्त्र आहेत. कारण ज्यांना सरळ सांगून ज्या गोष्टी कळत नाहीत त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर द्यावे लागते. भारताने अतिशय विवेकपूर्ण पाऊल उचलत नागरी वस्तीवर हल्ला न करता दहशतवादी तळ उध्वस्त केले आहे. जे योग्य आहे. देश विदेशात राहणारे भारतीय लोक काळजीत आहेत, पण त्यांनी निर्धास्त राहावे. कारण पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय लष्कराने योग्य पाऊल उचलले आहे. ईश्वर आपल्या पाठीशी आहे, तो आपल्याला पूर्ण साथ देईल. तुम्हीदेखील प्रार्थना करा आणि निश्चिन्त व्हा.'

संत अहिंसेचा मार्ग सांगतात पण जशास तसे वागावे ही शिकवणही देतात. तुकोबा तर म्हणतात, 

विंचू देव्हाऱ्यासी आला, न लगे पूजा भक्ती त्याला,तेथे पैजाऱ्याचे काम, अधमासी तो अधम!

अर्थात विंचू देव्हाऱ्यात जाऊन बसला म्हणजे तो पूजनीय होत नाही. कारण डंख मारणं हा गुणधर्म तो सोडत नाही. त्याला वेळीच ठेचावे लागते. दहशतवादी वृत्ती सुद्धा अशाच विंचवासारखी आहे, सोडून दिली तर ती डंख मारत राहणार, म्हणून भारताने उचललेले पाऊल उचित आहे आणि त्याबद्दल श्री श्री रविशंकर यांनी मोदींचे अभिनंदन करत ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा दर्शवला आहे!

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरNarendra Modiनरेंद्र मोदी