शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

जयंती विशेष: ‘तारक शिरोमणी’! दत्तावतार नृसिंह सरस्वती महाराजांची ‘ही’ प्रार्थना अवश्य म्हणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 08:40 IST

Shree Nrusimha Saraswati Maharaj Jayanti 2025: सन २०२५ची सुरुवात दत्तगुरुंचा द्वितीय अवतार असलेल्या श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या जयंती दिनाने व्हावी, यासारखे दुसरे भाग्य नाही. नृसिंह सरस्वतींची प्रार्थना करा अन् अपार पुण्य मिळवा, असे सांगितले जाते.

Shree Nrusimha Saraswati Maharaj Jayanti 2025:दत्तगुरुंचे द्वितीय अवतार तसेच श्रीपाद श्रीवल्लभ यांचा उत्तरावतार म्हणजे श्री नृसिंह सरस्वती महाराज. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या लाखो लीलांपैकी काही अद्भुत लीला श्रीगुरुचरित्रात वर्णन केलेल्या असून, श्रीदत्तसंप्रदायात या ग्रंथराजाला वेदतुल्य मानून याची उपासना केली जाते. महाराजांचा जन्मकाळ दुपारी १२ वाजता, जन्म स्थान: कारंजा, कारंजा येथील नृसिंह स्वामींचे जन्मस्थान, "काळे वाडा". पौष शुक्लपक्ष द्वितीयाला श्री जगद्गुरू अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री श्रीगुरू नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांचा जन्म करंज नगरीत झाला. सन २०२५ च्या पहिल्याच दिवशी म्हणजेच ०१ जानेवारी २०२५ रोजी नृसिंह जयंती साजरी होत आहे. 

वर्षाची सुरुवात दत्तगुरुंच्या शुभाशिर्वादाने व्हावी आणि वर्षभर दत्तगुरुंची कृपा लाभावी, अशी नववर्षाची सुरुवात होणे, यासारखे दुसरे भाग्य नाही, असे सांगितले जाते. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज वयाची पहिली ८-१० वर्षे कारंज्याला राहिले. तेथे त्यांनी अलौकिक बाललीला केल्या. मौंजीबंधन होईपर्यंत ते फक्त ॐ एवढाच उच्चार करीत असत. त्यांच्या आई-वडिलांना वाटले की, बालक मुके आहे की काय? पण त्यांनी मुंजीच्या भिक्षावळीत चारही वेदांचे पठण करून मौन सोडले. नंतर काशी येथे जाऊन त्यांनी श्रीमत् कृष्ण सरस्वती स्वामी यांच्याकडून संन्यासदीक्षा घेतली. पुढील तीस वर्षे उत्तरेत व उर्वरित भारतात जगदोद्धारार्थ भ्रमण करून पुन्हा कारंज्याला आले. मग गोदावरीच्या तीराने भ्रमण करीत करीत ते वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे राहिले. कृष्णामाईच्या तीराने भ्रमण करीत औदुंबर क्षेत्री आले. तेथे एक चातुर्मास्य राहिले. तेथे 'विमल पादुका' स्थापन करण्यात आल्या आहेत. औदुंबरहून पुढे ते श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे आले. तेथे त्यांचे बारा वर्षे वास्तव्य झाले. तेथे श्रींनी आपल्या 'मनोहर पादुका' व अन्नपूर्णामातेची स्थापन केली. मग ते गाणगापूर क्षेत्री आले. तेथे त्यांचे चोवीस वर्षे वास्तव्य झाले. त्यानंतर अंदाजे वयाच्या ऐंशीव्या वर्षी, गाणगापुरात  'निर्गुण पादुका' स्थापून ते श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथे जाऊन योगमार्गाने मल्लिकार्जुनाच्या लिंगात अदृश्य झाले. त्यांनी लौकिक अर्थाने देहत्याग केलेला नाही.

श्री क्षेत्र नृसिहवाडी येथे साजरा होणारा जन्मोत्सव

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत दुपारी बारा वाजता ‘श्री नृसिंहसरस्वती स्वामी’ महाराजांचा जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होतो . सात दिवस चालू असलेल्या या जन्मोत्सव सोहळ्यात येथील दत्त देव संस्थानचे वतीने अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. येथील कृष्णा-पंचगंगा नदीच्या संगमावर श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी बारा वर्षे तपश्चर्या करून ‘मनोहर पादुकांची’ स्थापना केलेने त्यांच्या या तपसाधनेनेच या गावाला नृसिंहवाडी हे नाव मिळाले असलेने सदर जन्मोत्सवास येथे अनन्य साधारण महत्व आहे. श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या जयंतीनिमित्त श्री नृसिंह सरस्वती प्रार्थना अवश्य म्हणावी, असे म्हटले जाते. यामुळे पुण्यलाभ प्राप्ती होऊ शकते, असे सांगितले जाते. 

श्री नृसिंह सरस्वती प्रार्थना 

अनसूयात्मज हे जगपालका । तुजविणा कुणि ना जगि बालका ।                             तरि कथी स्मरूं मी कवणाप्रति । शरण मी नरसिंहसरस्वती ।। १ ।। मग मला गमला पथ हा बरा । तव पदींच असो नित्य आसरा । पुरती हेतू कधीं मम हे कथीं । करि दया नरासिंहसरस्वती ।। २ ।। मज कडोनिच घेऊनी चाकरी । मगहि देशिल योग्य न ते जरी । शिशुस मोबदला कुणि मागती । कथि बरे नरसिंहसरस्वती ।। ३ ।।नति तुझ्या पदीं अर्पिति किंकर । अभय दे शिरि ठेवि गुरो कर ।स्थिरमती रमती नित्य प्रार्थिती । करि दया नरसिंहसरस्वती ।। ४ ।। मदीय लोचन सार्थक जाहले । सगुण सद्गुरू सद्रुप पाहिले । बघ मना रूप मंगल हे किती । करि दया नरसिंहसरस्वती ।। ५ ।।तव कृपेविण जीवचि घाबरे । अभय दे श्िरि ठेवचि हस्त रे । तव पथा गुरू वासचि पाहती । करि दया नरसिंहसरस्वती ।। ६ ।। बहुत भोगियल्या गुरू आपदा । चुकवि दावि अता तुझिया पदा ।द्रुतगती अजि धावचि संकटी । करि दया नरसिंहसरस्वती ।। ७ ।।कितीतरी अळवू तुज श्रीगुरू । बहुत ही श्रमलें भवि लेकरूं ।कशि दया तुजला लव ये न गा । अनसूयात्मज भो मज पाव गा ।। ९ ।। तुज समक्ष अरी मज गांजिती । लवभरी तुजला कशी ना क्षिती । उगिच कां त्रिशुला धरिलें अगा । अनसूयात्मज भो मज पाव गा ।। ९ ।।मदीय प्राण हरीलाचि काळ तो । मग तुझा उपयोगचि काय तो । म्हणुनि मी पुसतो कधिं येशि गा । अनसूयात्मज भो मज पाव गा ।। १० ।।सदयता हृदयीं लव तूं धरी । भजनि मंडळी हे गुरू उध्दरी । स्वकिय आप्त रिपू आणि निंदका । अनसूयात्मज भो मज पाव गा ।। ११ ।। अदयता धरिली अशि कां बरे । भवपुरी बुडतो जिव घाबरे । पुरवि हेतु न मी गुरू दास गा । अनसूयात्मज भो मज पाव गा ।। १२ ।।

।। दत्त दिंगबरा... श्रीपाद वल्लभ दिगंबरा... नृसिंह सरस्वती दिगंबरा ।।

।। अवधूतचिंतन श्रीगुरूदेव दत्त ।। 

टॅग्स :shree datta guruदत्तगुरुspiritualअध्यात्मिक