शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

Shiv Jayanti 2024: प्रत्येक शिवप्रेमीला 'ही' शिवस्तुती पाठ असायलाच हवी, तरच ती खरी शिववंदना!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 10:47 AM

Shiv Jayanti 2024: कवी भूषण यांनी केलेली शिवस्तुती प्रत्येक शिवप्रेमीला अर्थासह तोंडपाठ असलीच पाहिजे; तरच शिवरायांचे मावळे घडत राहतील!

आज फाल्गुन वद्य तृतीया, तिथीनुसार शिवजयंती. आपल्या पराक्रमाने दाहीदिशा उजळून टाकणाऱ्या आणि हिंदुधर्म रक्षिणाऱ्या महापराक्रमी शिवसूर्याची आज जयंती. महाराजांसारखा युगपुरुष जन्माला येणे हे तर भारत भूमीचे सौभाग्य. महाराजांनी आपल्या कृतीतून, उक्तीतून, व्यक्तिमत्त्वातून भारत मातेचा सुपुत्र कसा असावा याचा आदर्श घालून दिला. त्याची उजळणी म्हणून शिवजयंतीचे औचीत्त्य! केवळ शिवाजी महाराज की जय म्हणून शिवजयंती साजरी होणार नाही, त्यानिमित्ताने महाराजांच्या चरित्राची वारंवार उजळणी होणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी कवी भूषण यांनी चारोळीत केलेली शिवस्तुती आपण तोंडपाठ करायला हवी आणि मुलांकडून पाठ करून घ्यायला हवी. अजय-अतुल यांनी त्याला सुंदर चाल दिली आहे, शिवाय लता दीदींच्या आवाजातही ही शिवस्तुती ऐकता येते. पण ती ऐकण्याबरोबर तोंडपाठ असेल तरच त्या शब्दांचे चैतन्य अनुभवता येईल. 

इंद्र जिम जंभ पर बाड़व ज्यौं अंभ पर रावन सदंभ पर रघुकुलराज है। 

पौन बारिबाह पर संभु रतिनाह पर ज्यौं सहस्रबाहु पर राम द्विजराज है। 

दावा द्रुमदंड पर चीता मृगझुँड पर भूषन बितुंड पर जैसे मृगराज है। 

तेज तम-अंस पर कान्ह जिम कंस पर यौं मलेच्छ-बंस पर सेर सिवराज है॥ 

अर्थ : भूषण कवी म्हणतो, की ज्या प्रकारे इंद्राने जंभासुर राक्षसावर हल्ला करून त्याचा वध केला होता आणि ज्याप्रकारे अग्नी समुद्राच्या पाण्याला जाळून शोषून घेतो, त्याप्रमाणे श्रीरामांनी गर्विष्ठ व कपटी रावणावर हल्ला केला होता. ढगांवर वाऱ्याचा जसा प्रभाव असतो तसा त्यांचा प्रभाव होता. परशुरामाने ज्याप्रमाणे सहस्रबाहू (कार्त्तवीर्य) राजावर हल्ला करून वध केला, त्याचप्रमाणे भगवान शिवाने रतीचा पती कामदेव याला जाळून टाकले होते. ज्याप्रमाणे जंगलातील आग झाडांवर आपला क्रोध दाखवते आणि ज्याप्रमाणे वनराज सिंहाची हरणांच्या कळपाला दहशत असते किंवा मृगराज सिंह बलाढ्य हत्तीवर नियंत्रण मिळवतो,  सूर्यकिरणांनी अंधार नाहीसा होतो, दुष्ट कंसाचा श्रीकृष्ण वध करतो. अशाच सिंहाप्रमाणे शौर्य आणि पराक्रम असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघल राजवटीवर दहशत निर्माण केली. मुघलांना कडाडून विरोध केला आणि त्यांच्यावर शौर्याने, पराक्रमाने हल्ला करून त्यांचा सर्वनाश केला, अशी सिंहगर्जना करणारे शिवराय शत्रूसाठी कायम कर्दनकाळ ठरले. 

ही केवळ शिवस्तुती नाही, तर पराक्रम कसा गाजवायचा याचा वस्तूपाठ आहे. आपल्या क्षेत्रात आपले स्थान कसे निर्माण करायचे, आपल्या व्यक्तीत्त्वाची छाप कशी पाडायची याचा धडा आहे. त्यामुळे आपण ज्याप्रमाणे रोज देवाचे श्लोक म्हणतो तसे हे स्तोत्र समजून नित्य पठन करावे. जेणेकरून नैराश्य, मरगळ दूर होईल आणि चैतन्य निर्माण होऊन स्वत:ला सिद्ध करण्याची जिद्द निर्माण होईल आणि शिवरायांप्रमाणे आपले विचार, कृती, आचरण शुद्ध होऊन आपणही नैतिकतेने विजय प्राप्त करू. जय भवानी, जय शिवाजी!

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज