शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

रोज झोपण्याआधी 'हा' श्लोक म्हणा; तुमची सर्व काळजी मिटेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 11:51 IST

दिवसाची चांगली सुरुवात जेवढी महत्त्वाची तेवढाच दिवसाचा शेवटही महत्त्वाचा, त्यासाठी ही प्रार्थना!

आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते, यावर सबंध दिवस अवलंबून असतो. त्याचप्रमाणे दिवसाचा शेवट कसा होतो, यावर पुढचा दिवस अवलंबून असतो. दुर्दैवाने आपल्या दिवसाची सुरुवात आणि शेवट मोबाईलने होतो. त्यामुळे मोबाईलमधून आपण जे विचार पाहतो, ऐकतो, तेच आपल्या मनात रुजत असतात. मात्र, अध्यात्मिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या आणि वैद्यकीय दृष्ट्या ते योग्य नाही. मग, त्यावर उपाय काय? तर हा भग्वद्गीतेतील श्लोक - 

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते।तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।।

श्लोकाचा अर्थ : जो भक्त अनन्य भावाने मला शरण येतो, त्याचा रोजचा योगक्षेम मी वाहून नेतो. हे आश्वासन खुद्द भगवान श्रीकृष्ण यांनी केवळ अर्जुनाला नाही, तर समस्त मानव जातीला दिले आहे. 

म्हणून रोज चिंतेचे ओझे मानेवर आणि मनावर वाहत राहण्यापेक्षा आपण आपल्याकडून शंभर टक्के प्रयत्न करावे आणि बाकीचा भार भगवंतावर सोपवून निश्चिन्त राहावे. आपली काळजी घेणारे कोणी आहे, ही भावना अत्यंत दिलासादायक असते. म्हणून आज रात्रीपासूनच हा प्रयोग करून पहा. तना मनावरचा भार एकाएक हलका झाल्यासारखा वाटेल आणि दिवसाची सुरुवात आणि शेवट मंगलमयी होऊन नवीन दिवसाची आव्हाने स्वीकारण्यासाठी मन सज्ज होईल.