शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
6
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
7
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
8
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
9
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
10
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
11
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
12
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
13
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
14
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
15
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
16
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
17
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
18
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
19
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
20
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल

बाप्पा केवळ 'संकष्टीला' नाही तर 'संकटी'देखील धावून येतो म्हणून 'संकटी पावावे' असे समर्थ रामदास लिहितात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 11:57 IST

उद्या अर्थात २४ ऑक्टोबरला संकष्टी आहे. सायंकाळी बाप्पाची आरती म्हणून आपण उपास सोडूच, तेव्हा शब्दांकडे आणि अर्थाकडे डोळसपणे लक्ष देऊ.

समर्थ रामदासांनी लिहिलेली `सुखकर्ता दु:खहर्ता' ही गणपतीची आबालवृद्धांना तोंडपाठ आहे. फक्त आरती म्हणता म्हणता उत्साहाच्या भरात गाडी घसरते आणि संकटी पावावे ऐवजी `संकष्टी पावावे' असा निरोप बाप्पाला धाडला जातो. मात्र, समर्थांनी जे मागणे मागितले आहे, ते लक्षात घेतले, तर भविष्यात संकटीऐवजी संकष्टी असा उच्चार होणारच नाही. काय आहे त्यांचे मागणे?

श्रीगणेश हे महाराष्ट्राचे लाडके दैवत आणि आवडते दैवत. आपली सुखदु:खे आपण ज्याच्याजवळ विश्वासाने सांगू शकतो, तो आपला बाप्पा सुख देणारा आहे आणि दु:खाचे हरण करणारा म्हणजेच संकटांना पळवून लावणारादेखील आहे. म्हणून तर आपण त्याला `वार्ता विघ्नाची नुरवी' असे सांगतो. म्हणजे विघ्नेच काय तर त्याची वार्ता सुद्धा न उरवी, म्हणजे शिल्लक ठेवू नकोस, असे आपण सांगतो. मात्र, आरतीच्या ठेक्यात, लयीत गात असताना `नुरवी पुरवी प्रेम' असे म्हणत आपण स्वत:चीच गल्लत करतो. नुरवी पुरवी हे केवळ यमक जुळवले नसून, संकट उरवू नको पण प्रेम मात्र पुरव अशी प्रेमळ मागणी केली आहे. 

ही मागणी कोणाकडे? तर ज्याची आमच्यावर कृपा आहे, ज्याने सर्वांगाला शेंदुराची उटी लावली आहे आणि ज्याच्या गळ्यात मुक्ताफळांची म्हणजेच मोत्याची माळ आहे, अशा गणेशाला मोरया म्हणजे माझा नमस्कार असो. 

बाप्पाला समर्थांनी मंगलमूर्ती म्हटले आहे, कारण तो अमंगळाचा नाश करतो. त्याचे नुसते दर्शनही मंगलमयी आहे. त्याला बघूनही प्रसन्न वाटते. त्याची कृपादृष्टी आश्वासक वाटते. ती पाहता मनोकामना आपसुक पूर्ण होईल, असा दिलासा वाटतो.  यातही समर्थांच्या आरतीत केवळ मंगलमूर्ती असा उल्लेख आहे, परंतु भक्तांनी श्रीमंगलमूर्ती दिलेली जोडदेखील आता आरतीचाच एक भाग असल्यासारखी म्हटली जाते. 

पुढच्या दोन्ही कडव्यांमध्ये समर्थांनी गणपती बाप्पाचे वैभवसंपन्न रूप रेखाटले आहे. गणपती, गणनायक या शब्दांमध्ये नेतृत्व सामावलेले आहे. युद्धकलेत निपुण असलेला बाप्पा पाशांकुशधारी आहे. मात्र, समर्थांनी या आरतीमध्ये केवळ बाप्पाचे वैभव दाखवले आहे. त्याच्या हाती शस्रास्रे न देता, त्याचे हात या महाराष्ट्राला आशीर्वाद देण्यासाठी आणि मोदक अर्थात आनंद देण्यासाठी मुक्त असल्याचे वर्णन केले आहे. 

मात्र, आरती संपत असताना, श्रीगणेशाला आर्त साद देत विनंती केली आहे, `संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे' म्हणजेच देवा आमच्या संकटकाळात तर धावून येच, शिवाय आयुष्यात ज्या ज्या वेळी निर्वाणीचे म्हणजेच भावभावनांचा कडेलोट झाला, आणाीबाणीचा प्रसंग उभा ठाकला असे वाटेल, तेव्हा रक्षणार्थ धावून ये.' म्हणून हे मागणे केवळ `संकष्टी' पुरते न मागता दर संकटात त्याने धावून यावे, असे त्याला सांगावे. आणि आर्ततेने म्हणावे, `संकटी पावावे निर्वाणि रक्षावे.'

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीganpatiगणपती