शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

तणाव नियंत्रणावर सद्गुरुंनी प्रज्ञाननंदाला दिला होता 'हा' कानमंत्र ; तुम्हालाही पडेल उपयोगी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 19:46 IST

बुद्धिबळ हा बुद्धीवर ताण वाढवणारा खेळ, वरून स्पर्धा आणि अपेक्षांचंही ओझं, ते योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी सद्गुरूंनी दिला होता कानमंत्र!

२३ ऑगस्ट २०२३ रोजी इसरोच्या चांद्रयान तीनचे सॉफ्ट लँडिंग झाल्यावर आनंदून गेलेल्या भारतीयांचे डोळे लागले होते ते आणखी विश्वविक्रमाकडे! तो विश्वविक्रम अर्थात २४ ऑगस्ट रोजी बुद्धिबळपटू प्रज्ञाननंदा याची आंतराराष्ट्रीय स्पर्धेतली लढाई! कारण ही स्पर्धा जिंकली असता आंतरराष्ट्रीय पातळीवर बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरणार होता. मात्र निराशा पदरात आली. अटीतटीचा मुकाबला सुरू झाला. सर्वांच्या अपेक्षा वाढल्या होत्या, मात्र एका बेसावध क्षणी प्रतिस्पर्धी मॅग्नस कार्लसन याच्याकडून त्याला हार पत्करावी लागली. 

थोडक्यासाठी हुकलेली संधी, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी केलेला सराव, कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षा आणि विश्वविक्रमापासून काही क्षणांची दुरी असताना थांबावे लागणे यासाठी किती मनोधैर्य लागत असेल याचा नुसता विचारच केलेला बरा! पण असे कसलेले खेळाडू जशी यशाची तयारी करतात, तशी अपयशाला सामोरे जाण्याचीही तयारी ठेवतात. प्रज्ञाननंदा यानेही ती केली होती; नव्हे तर तशी करून घेतली होती, सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी!

एका कार्यक्रमाप्रसंगी सद्गुरू जग्गी वासुदेव विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रज्ञाननंदा याने त्याना प्रश्न विचारला, 'तणाव नियंत्रण कसे करावे?' यावेळेस सद्गुरूंनी केलेला उपदेश हा आपणा सर्वांना उपयोगी पडण्यासारखा आहे. कसा ते जाणून घेऊ. 

सद्गुरू म्हणाले, 'ज्याला तुम्ही टेन्शन, नैराश्य, स्ट्रेस, वेडेपणा म्हणता ते तुम्हीच तुमच्या विचारांचं वाहिलेलं अतिरिक्त ओझं असतं. टेन्शन येतं कारण तुम्ही अपेक्षांखाली दबलेले असता, बुद्धिबळाचा खेळ खेळताना कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षा, बक्षीस मिळेल की नाही याची काळजी, प्रतिस्पर्ध्याला हरवण्याची जबाबदारी या सगळ्या विचारांनी उर दडपला जातो. तसे होऊ देऊ नका. खेळाकडे खेळ म्हणून बघायला शिका. बाकी विचार सोडून द्या. दुसरा आपल्यापेक्षा सरस असू शकतो हे मान्य करा, मात्र स्वतःला समोरच्यापेक्षा किंवा स्वतःपेक्षा स्वतःलाच कमी लेखत असाल तर पाप करत आहात हे लक्षात ठेवा. 

एकावेळी एकाच कामावर लक्ष द्या, सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं ओझं मनावर बाळगू नका. अन्यथा इतर विचार करण्याच्या नादात तुम्ही छोटीशी चूक करून बसाल आणि तुमचा प्रतिस्पर्धी त्याच क्षणाची वाट बघत तुम्हाला नामोहरम करेल. ज्याप्रमाणे आत्मविश्वासाचा अभाव वाईट तसा अति आत्मविश्वासही वाईटच! लोक तुम्हाला जगतजेता म्हणू द्या, पण तुम्ही स्वतःला जगतजेता समजू नका, एकदा का त्या विचारात शिरलात तर आपोआप अपेक्षांचं ओझं मनावर येईल किंवा अति आत्मविश्वासाच्या भरात चूक घडेल. म्हणून वर्तमानात जगा. खेळाकडे तटस्थपणे बघा. यशाचे जसे स्वागत करता तसे अपयशाचेही स्वागत करा. तरच तणाव तुमच्या आसपासही फिरकणार नाही आणि आयुष्याचा आनंद घेऊ शकाल. 

सद्गुरूंनी हे जरी खेळाच्या बाबतीत सांगितले असले तरी हा कानमंत्र आपल्या सगळ्यांच्याच उपयोगी आहे. तो म्हणजे अति ताण न घेता आहे त्या परिस्थितीला सामोरे जावे आणि यश अपयशासह आयुष्याचा खेळ खेळावा!

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्य