शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

तणाव नियंत्रणावर सद्गुरुंनी प्रज्ञाननंदाला दिला होता 'हा' कानमंत्र ; तुम्हालाही पडेल उपयोगी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 19:46 IST

बुद्धिबळ हा बुद्धीवर ताण वाढवणारा खेळ, वरून स्पर्धा आणि अपेक्षांचंही ओझं, ते योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी सद्गुरूंनी दिला होता कानमंत्र!

२३ ऑगस्ट २०२३ रोजी इसरोच्या चांद्रयान तीनचे सॉफ्ट लँडिंग झाल्यावर आनंदून गेलेल्या भारतीयांचे डोळे लागले होते ते आणखी विश्वविक्रमाकडे! तो विश्वविक्रम अर्थात २४ ऑगस्ट रोजी बुद्धिबळपटू प्रज्ञाननंदा याची आंतराराष्ट्रीय स्पर्धेतली लढाई! कारण ही स्पर्धा जिंकली असता आंतरराष्ट्रीय पातळीवर बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरणार होता. मात्र निराशा पदरात आली. अटीतटीचा मुकाबला सुरू झाला. सर्वांच्या अपेक्षा वाढल्या होत्या, मात्र एका बेसावध क्षणी प्रतिस्पर्धी मॅग्नस कार्लसन याच्याकडून त्याला हार पत्करावी लागली. 

थोडक्यासाठी हुकलेली संधी, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी केलेला सराव, कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षा आणि विश्वविक्रमापासून काही क्षणांची दुरी असताना थांबावे लागणे यासाठी किती मनोधैर्य लागत असेल याचा नुसता विचारच केलेला बरा! पण असे कसलेले खेळाडू जशी यशाची तयारी करतात, तशी अपयशाला सामोरे जाण्याचीही तयारी ठेवतात. प्रज्ञाननंदा यानेही ती केली होती; नव्हे तर तशी करून घेतली होती, सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी!

एका कार्यक्रमाप्रसंगी सद्गुरू जग्गी वासुदेव विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रज्ञाननंदा याने त्याना प्रश्न विचारला, 'तणाव नियंत्रण कसे करावे?' यावेळेस सद्गुरूंनी केलेला उपदेश हा आपणा सर्वांना उपयोगी पडण्यासारखा आहे. कसा ते जाणून घेऊ. 

सद्गुरू म्हणाले, 'ज्याला तुम्ही टेन्शन, नैराश्य, स्ट्रेस, वेडेपणा म्हणता ते तुम्हीच तुमच्या विचारांचं वाहिलेलं अतिरिक्त ओझं असतं. टेन्शन येतं कारण तुम्ही अपेक्षांखाली दबलेले असता, बुद्धिबळाचा खेळ खेळताना कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षा, बक्षीस मिळेल की नाही याची काळजी, प्रतिस्पर्ध्याला हरवण्याची जबाबदारी या सगळ्या विचारांनी उर दडपला जातो. तसे होऊ देऊ नका. खेळाकडे खेळ म्हणून बघायला शिका. बाकी विचार सोडून द्या. दुसरा आपल्यापेक्षा सरस असू शकतो हे मान्य करा, मात्र स्वतःला समोरच्यापेक्षा किंवा स्वतःपेक्षा स्वतःलाच कमी लेखत असाल तर पाप करत आहात हे लक्षात ठेवा. 

एकावेळी एकाच कामावर लक्ष द्या, सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं ओझं मनावर बाळगू नका. अन्यथा इतर विचार करण्याच्या नादात तुम्ही छोटीशी चूक करून बसाल आणि तुमचा प्रतिस्पर्धी त्याच क्षणाची वाट बघत तुम्हाला नामोहरम करेल. ज्याप्रमाणे आत्मविश्वासाचा अभाव वाईट तसा अति आत्मविश्वासही वाईटच! लोक तुम्हाला जगतजेता म्हणू द्या, पण तुम्ही स्वतःला जगतजेता समजू नका, एकदा का त्या विचारात शिरलात तर आपोआप अपेक्षांचं ओझं मनावर येईल किंवा अति आत्मविश्वासाच्या भरात चूक घडेल. म्हणून वर्तमानात जगा. खेळाकडे तटस्थपणे बघा. यशाचे जसे स्वागत करता तसे अपयशाचेही स्वागत करा. तरच तणाव तुमच्या आसपासही फिरकणार नाही आणि आयुष्याचा आनंद घेऊ शकाल. 

सद्गुरूंनी हे जरी खेळाच्या बाबतीत सांगितले असले तरी हा कानमंत्र आपल्या सगळ्यांच्याच उपयोगी आहे. तो म्हणजे अति ताण न घेता आहे त्या परिस्थितीला सामोरे जावे आणि यश अपयशासह आयुष्याचा खेळ खेळावा!

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्य