शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दृष्ट काढणे हा केवळ परंपरेचा भाग नाही, तर वास्तुशास्त्रानेही त्याला दुजोरा दिला आहे; कसा ते बघा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 09:32 IST

दृष्ट काढण्याच्या पद्धती बऱ्याच आहेत. मीठ-मोहरीने, फुला-पानांनी, पोळी किंवा भाकरीच्या तुकड्याने, पाण्याने, केरसुणीने, चपलेने, पैशाने आणि आणखीही बऱ्याच तऱ्हेने. पद्धती निरनिराळ्या असल्या, तरी त्यामागील हेतू अजिबात वाईट नाही.  

चांगल्या गोष्टी चटकन कोणाच्याही नजरेस येतात, नजरेत भरतात. पाहणाऱ्याला त्याबद्दल असूया वाटते, मत्सर वाटतो आणि त्याच्या नकारात्मक लहरी सकारात्मक व्यक्तीला त्रासदायक ठरू शकतात. यालाच दृष्ट लागणे असे म्हणतात. यावर उतारा म्हणून, आपल्याकडे दृष्ट काढण्याची परंपरा आहे. 

वास्तुशास्त्रानुसार मीठ नकारात्मक लहरी शोषून घेते. म्हणून घरातही कानाकोपऱ्यात मीठ ठेवण्याचा सल्ला दिला जातो. दृष्ट काढतानाही मीठाचा वापर केला जातो. तसेच, फोडणीपात्रात मोहरी पडल्यावर चटचटा तडकायला सुुरुवात करते.  या दोहोंचा एकत्रित आवाज ऐकल्याने, मीठ-मोहरी जळल्याच्या  वासाने दृष्ट जळली, असा निष्कर्ष काढला जातो. 

दृष्ट काढण्याच्या पद्धती बऱ्याच आहेत. मीठ-मोहरीने, फुला-पानांनी, पोळी किंवा भाकरीच्या तुकड्याने, पाण्याने, केरसुणीने, चपलेने, पैशाने आणि आणखीही बऱ्याच तऱ्हेने. पद्धती निरनिराळ्या असल्या, तरी त्यामागील हेतू अजिबात वाईट नाही.  

खुद्द माऊलींनी पसायदान मागताना, 'जे खळांची व्यंकटी सांडो' असे म्हटले आहे. याचाच अर्थ, जे वाईट वृत्तीचे लोक आहेत, त्यांच्यातील वाईट वृत्ती नष्ट होवो, म्हणजे उरेल ती व्यक्ती चांगलीच असणार आहे. त्याचप्रमाणे दुष्ट-दुर्जनांची वाईट दृष्टी जळली, की अन्य कोणाचेही वाईट होणार नाही. म्हणून तर, लहान बाळ असो, नाहीतर वर-वधू त्यांना काजळाची तीट लावली जाते. त्यांच्या सुखाला कोणाची दृष्ट लागू नये, हीच त्यामागची सद्भावना. मात्र या सद्भावनेपलीकडे जाऊन दुसऱ्याचे वाईट होवो, या विचाराने प्रेरित होऊन केलेले मंत्र-तंत्र अंधश्रद्धेला पूरक ठरतात. त्यामुळे आपण केवळ सद्भावना जपावी. 

'आल्या-गेल्याची, वाटसरूची, पशू-पक्ष्यांची, गुरा-ढोरांची, भुता-खेतांची, मांत्रिकांची आणि या विश्वातील कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्तींची दृष्ट लागली असेल, तर ती निघून जाऊ दे’, असे म्हणत आपल्या घरातील ज्येष्ठ  बायका मुलांची, सुनांची, जावयाची मंगल प्रसंगी, वाढदिवशी, समारंभाच्या दिवशी दृष्ट काढतात. आजारी व्यक्तीचीही दृष्ट काढली जाते. त्या मानसिक आधाराने आजारी व्यक्तीलाही बरे वाटते.

ज्याने सर्वांना दृष्टी दिली, त्या परमेश्वराचीही आज्या-पणज्या फुला-पाण्याने दृष्ट काढतात. आता सांगा, देवाला का कोणाची दृष्ट लागणार आहे? तरीदेखील, उत्सवप्रसंगी देवाची दृष्ट काढण्याची प्रथा काळानुकाळ चालत आलेली आहे. असेच एक, संत जनाबाईचे काव्य वानगीदाखल-

कोणाची झाली दृष्ट माझ्या पंढरीराया,उतरीते लिंब लोण, कोमेजली काया।कर लेवुनि कटेवरी, उभा भिवरेच्या तिरी,भक्तांना भेटावया, माझा पंढरीराया।नाना परीचे लेणे लेशी गवळणी, आली राधिका पहाया, माझ्या पंढरीराया।साधू-संत येती जाती, दृष्ट तुजला लावीताती,निरसली मोहमाया, माझ्या पंढरीराया।हाती घेऊनी मोहऱ्या मीठ, जनाबाई काढी दृष्ट, लावीते गाल बोट, माझ्या पंढरीराया।

अशी आपुलकीची भावना जिथे असते, तिथे कोणाची दृष्ट लागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण दुर्दैव, आता ना आपुलकीची माणसं राहिली, ना दृष्ट काढून कानशीलावर बोट मोडणारे हात! संस्कृती-परंपरेलाच दृष्ट लागली वाटतं...!

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र