शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

दृष्ट काढणे हा केवळ परंपरेचा भाग नाही, तर वास्तुशास्त्रानेही त्याला दुजोरा दिला आहे; कसा ते बघा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 09:32 IST

दृष्ट काढण्याच्या पद्धती बऱ्याच आहेत. मीठ-मोहरीने, फुला-पानांनी, पोळी किंवा भाकरीच्या तुकड्याने, पाण्याने, केरसुणीने, चपलेने, पैशाने आणि आणखीही बऱ्याच तऱ्हेने. पद्धती निरनिराळ्या असल्या, तरी त्यामागील हेतू अजिबात वाईट नाही.  

चांगल्या गोष्टी चटकन कोणाच्याही नजरेस येतात, नजरेत भरतात. पाहणाऱ्याला त्याबद्दल असूया वाटते, मत्सर वाटतो आणि त्याच्या नकारात्मक लहरी सकारात्मक व्यक्तीला त्रासदायक ठरू शकतात. यालाच दृष्ट लागणे असे म्हणतात. यावर उतारा म्हणून, आपल्याकडे दृष्ट काढण्याची परंपरा आहे. 

वास्तुशास्त्रानुसार मीठ नकारात्मक लहरी शोषून घेते. म्हणून घरातही कानाकोपऱ्यात मीठ ठेवण्याचा सल्ला दिला जातो. दृष्ट काढतानाही मीठाचा वापर केला जातो. तसेच, फोडणीपात्रात मोहरी पडल्यावर चटचटा तडकायला सुुरुवात करते.  या दोहोंचा एकत्रित आवाज ऐकल्याने, मीठ-मोहरी जळल्याच्या  वासाने दृष्ट जळली, असा निष्कर्ष काढला जातो. 

दृष्ट काढण्याच्या पद्धती बऱ्याच आहेत. मीठ-मोहरीने, फुला-पानांनी, पोळी किंवा भाकरीच्या तुकड्याने, पाण्याने, केरसुणीने, चपलेने, पैशाने आणि आणखीही बऱ्याच तऱ्हेने. पद्धती निरनिराळ्या असल्या, तरी त्यामागील हेतू अजिबात वाईट नाही.  

खुद्द माऊलींनी पसायदान मागताना, 'जे खळांची व्यंकटी सांडो' असे म्हटले आहे. याचाच अर्थ, जे वाईट वृत्तीचे लोक आहेत, त्यांच्यातील वाईट वृत्ती नष्ट होवो, म्हणजे उरेल ती व्यक्ती चांगलीच असणार आहे. त्याचप्रमाणे दुष्ट-दुर्जनांची वाईट दृष्टी जळली, की अन्य कोणाचेही वाईट होणार नाही. म्हणून तर, लहान बाळ असो, नाहीतर वर-वधू त्यांना काजळाची तीट लावली जाते. त्यांच्या सुखाला कोणाची दृष्ट लागू नये, हीच त्यामागची सद्भावना. मात्र या सद्भावनेपलीकडे जाऊन दुसऱ्याचे वाईट होवो, या विचाराने प्रेरित होऊन केलेले मंत्र-तंत्र अंधश्रद्धेला पूरक ठरतात. त्यामुळे आपण केवळ सद्भावना जपावी. 

'आल्या-गेल्याची, वाटसरूची, पशू-पक्ष्यांची, गुरा-ढोरांची, भुता-खेतांची, मांत्रिकांची आणि या विश्वातील कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्तींची दृष्ट लागली असेल, तर ती निघून जाऊ दे’, असे म्हणत आपल्या घरातील ज्येष्ठ  बायका मुलांची, सुनांची, जावयाची मंगल प्रसंगी, वाढदिवशी, समारंभाच्या दिवशी दृष्ट काढतात. आजारी व्यक्तीचीही दृष्ट काढली जाते. त्या मानसिक आधाराने आजारी व्यक्तीलाही बरे वाटते.

ज्याने सर्वांना दृष्टी दिली, त्या परमेश्वराचीही आज्या-पणज्या फुला-पाण्याने दृष्ट काढतात. आता सांगा, देवाला का कोणाची दृष्ट लागणार आहे? तरीदेखील, उत्सवप्रसंगी देवाची दृष्ट काढण्याची प्रथा काळानुकाळ चालत आलेली आहे. असेच एक, संत जनाबाईचे काव्य वानगीदाखल-

कोणाची झाली दृष्ट माझ्या पंढरीराया,उतरीते लिंब लोण, कोमेजली काया।कर लेवुनि कटेवरी, उभा भिवरेच्या तिरी,भक्तांना भेटावया, माझा पंढरीराया।नाना परीचे लेणे लेशी गवळणी, आली राधिका पहाया, माझ्या पंढरीराया।साधू-संत येती जाती, दृष्ट तुजला लावीताती,निरसली मोहमाया, माझ्या पंढरीराया।हाती घेऊनी मोहऱ्या मीठ, जनाबाई काढी दृष्ट, लावीते गाल बोट, माझ्या पंढरीराया।

अशी आपुलकीची भावना जिथे असते, तिथे कोणाची दृष्ट लागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण दुर्दैव, आता ना आपुलकीची माणसं राहिली, ना दृष्ट काढून कानशीलावर बोट मोडणारे हात! संस्कृती-परंपरेलाच दृष्ट लागली वाटतं...!

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र