शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Relationship Goals: नातं जिंकायचं असेल तर हार पत्करायला शिका, सांगताहेत गौर गोपाल दास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 17:36 IST

Realtionship Rules: सॉरी म्हणण्यात आपल्याला बरेचदा कमीपणा जाणवतो, अहंकार आडवा येतो, पण अशी हार पत्करणं का गरजेचं असतं, तेही वाचा!

एकदा एक लहान मुलगी आपल्या आजोबांशी धावण्याची स्पर्धा लावते, आजोबा हळू हळू धावतात, मुलगी जिंकते. ती आनंदाने येऊन बाबांना सांगते, 'मी आजोबांना हरवलं!' तेव्हा तिचे बाबा तिला समजावतात, 'बाळा, तीच स्पर्धा माझ्याशी लावलीस तर तू हरशील, पण आजोबांनी तुला जिंकण्याचा आनंद मिळावा म्हणून ते ही स्पर्धा हरले. तुझा आनंद त्यांना पाहता आला आणि ते जिंकले. त्यामुळे प्रत्येक वेळी जिंकल्यावरच आनंद होतो असं नाही, तर हरल्यावरही जिंकता येतं. 

गौर गोपाल दास सांगतात, 'बऱ्याचदा लग्नाळू मुलांना गमतीने सांगितलं जातं, कारण नसतानाही सॉरी म्हणायला शिक, तरच संसार सुखाचा होईल.' यात कमीपणा घेणं किंवा कमीपणा वाटणं ही बाब नाहीच, ज्यांना नातं जपायचं असतं ते भांडण ताणत बसत नाहीत. रबर दोन्ही बाजूंनी ताणलं तर तुटून जाईल, नात्याचंही तसंच आहे, जितकं ताणाल तेवढं ते तुटेल. म्हणून एकाला राग आलेला असताना दुसऱ्याने शांतपणे परिस्थिती हाताळणं गरजेचे आहे. त्याक्षणी पत्करलेली हार नात्याला जिंकवते. 

आपल्यापैकी प्रत्येकाला आपला मुद्दा खरा करण्याची खुमखुमी असते. मी म्हणेन तीच पूर्व, असाही हट्ट असतो. त्यामुळे वाद विकोपाला जातो आणि तणाव वाढतो. अशा भांडणात माघार घेण्याची तयारी कोणीच दाखवत नाही. अकारण इतर लोकही त्यात भरडले जातात. याउलट एकाने माघार घेतली तरी बाकीच्यांना होणारा त्रास टाळता येऊ शकतो. त्यामुळे दर वेळी जिंकणं हे उद्दिष्ट न ठेवता, वेळ, काळ, पैसा आणि महत्त्वाचं म्हणजे नातं जपायचे असेल तर माघार घ्यायला शिका, कायम जिंकत राहाल!

व्हॅलेंटाईन वीक येतोय, या काळात प्रेमाला बहर येईल, पण प्रेम कायमस्वरूपी टिकवून ठेवायचे असेल आणि केवळ नवरा बायकोचे नाते नाही तर आई, वडील, भाऊ, बहीण, मित्र, मैत्रीण, सहकारी, बॉस, शेजारी या सगळ्याच टप्पयावर ठराविक मर्यादेनंतर भांडणातून माघार घ्यायला शिका!

टॅग्स :relationshipरिलेशनशिपRelationship Tipsरिलेशनशिप