शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

Relationship Goals: नातं जिंकायचं असेल तर हार पत्करायला शिका, सांगताहेत गौर गोपाल दास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 17:36 IST

Realtionship Rules: सॉरी म्हणण्यात आपल्याला बरेचदा कमीपणा जाणवतो, अहंकार आडवा येतो, पण अशी हार पत्करणं का गरजेचं असतं, तेही वाचा!

एकदा एक लहान मुलगी आपल्या आजोबांशी धावण्याची स्पर्धा लावते, आजोबा हळू हळू धावतात, मुलगी जिंकते. ती आनंदाने येऊन बाबांना सांगते, 'मी आजोबांना हरवलं!' तेव्हा तिचे बाबा तिला समजावतात, 'बाळा, तीच स्पर्धा माझ्याशी लावलीस तर तू हरशील, पण आजोबांनी तुला जिंकण्याचा आनंद मिळावा म्हणून ते ही स्पर्धा हरले. तुझा आनंद त्यांना पाहता आला आणि ते जिंकले. त्यामुळे प्रत्येक वेळी जिंकल्यावरच आनंद होतो असं नाही, तर हरल्यावरही जिंकता येतं. 

गौर गोपाल दास सांगतात, 'बऱ्याचदा लग्नाळू मुलांना गमतीने सांगितलं जातं, कारण नसतानाही सॉरी म्हणायला शिक, तरच संसार सुखाचा होईल.' यात कमीपणा घेणं किंवा कमीपणा वाटणं ही बाब नाहीच, ज्यांना नातं जपायचं असतं ते भांडण ताणत बसत नाहीत. रबर दोन्ही बाजूंनी ताणलं तर तुटून जाईल, नात्याचंही तसंच आहे, जितकं ताणाल तेवढं ते तुटेल. म्हणून एकाला राग आलेला असताना दुसऱ्याने शांतपणे परिस्थिती हाताळणं गरजेचे आहे. त्याक्षणी पत्करलेली हार नात्याला जिंकवते. 

आपल्यापैकी प्रत्येकाला आपला मुद्दा खरा करण्याची खुमखुमी असते. मी म्हणेन तीच पूर्व, असाही हट्ट असतो. त्यामुळे वाद विकोपाला जातो आणि तणाव वाढतो. अशा भांडणात माघार घेण्याची तयारी कोणीच दाखवत नाही. अकारण इतर लोकही त्यात भरडले जातात. याउलट एकाने माघार घेतली तरी बाकीच्यांना होणारा त्रास टाळता येऊ शकतो. त्यामुळे दर वेळी जिंकणं हे उद्दिष्ट न ठेवता, वेळ, काळ, पैसा आणि महत्त्वाचं म्हणजे नातं जपायचे असेल तर माघार घ्यायला शिका, कायम जिंकत राहाल!

व्हॅलेंटाईन वीक येतोय, या काळात प्रेमाला बहर येईल, पण प्रेम कायमस्वरूपी टिकवून ठेवायचे असेल आणि केवळ नवरा बायकोचे नाते नाही तर आई, वडील, भाऊ, बहीण, मित्र, मैत्रीण, सहकारी, बॉस, शेजारी या सगळ्याच टप्पयावर ठराविक मर्यादेनंतर भांडणातून माघार घ्यायला शिका!

टॅग्स :relationshipरिलेशनशिपRelationship Tipsरिलेशनशिप