शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
2
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
3
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट
4
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
5
करिअर, कुटुंब आणि आर्थिक व्यवस्थापन कसे करावे? सोप्या ६ टीप्स वापरा आणि टेन्शन फ्री व्हा
6
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
7
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
8
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
9
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
10
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
11
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
12
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
13
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
14
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
15
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
16
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
17
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
18
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
19
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
20
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!

कपाळाच्या मध्यभागी कुंकुम तिलक किंवा चंदनटिळा लावल्याने संपूर्ण शरीराला होणारे फायदे वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 16:55 IST

भूमध्य भाग नेत्रांच्या अत्यंत समीप असल्यामुळे उष्णताशामक चंदनाने नेत्रप्रांत शीतल राहते आणि उष्णताजन्य नेत्रदोष उद्भवत नाहीत. आज्ञाचक्रही सतत संवेदनशील राहते.

कोणतेही धर्मकृत्य करताना कपाळी गंध किंवा कुंकूमतिलक लावावा असा धर्मशास्त्राने सांगितलेला आचार आहे. चंदन हे जंतुघ्न आहे. त्याचप्रमाणे चंदन शीतल आणि उष्णता शामकही आहे. योगशास्त्रात प्रतिपादलेल्या षट चक्रांपैकी 'आज्ञाचक्र भूमध्याचे स्थानी' आहे. त्या भूमध्यावर चंदन लावल्याने आज्ञाचक्र शीतल राहते. तसेच भूमध्य भाग नेत्रांच्या अत्यंत समीप असल्यामुळे उष्णताशामक चंदनाने नेत्रप्रांत शीतल राहते आणि उष्णताजन्य नेत्रदोष उद्भवत नाहीत. आज्ञाचक्रही सतत संवेदनशील राहते.

'भृकुटीमाजी चंद्रामृताचे तळे' असा संतवाङमयात उल्लेख आहे. भृकुटी मध्यात आज्ञाचक्र ही एक अत्यंत संवेदनाक्षम ग्रंथी आहे. ही ग्रंथी ज्याची कमकुवत असते त्याच्यावर अन्य व्यक्तीच्या विचार, विकारांच लहरींचे आक्रमण होत़ या लहरी विद्युत स्वरूपाच्या असतात. त्यामुळे त्या सहज प्रविष्ट होतात. परंतु चंदन हे काष्ट आहे. वाळल्यावर त्या चंनतिलकाला काष्ठगुण प्राप्त होतात. काष्ठ म्हणजे लाकूड हे विद्युतप्रतिबंधक आहे. म्हणजे ते बॅड कंडक्टर आहे. त्यामुळे दुसऱ्यांचे विद्युत स्वरूपाचे आदळणारे विचार विकार यांना ते प्रतिबंध करते. तसेच दुष्ट दृष्टीदोषालाही प्रतिबंध करून संरक्षण करते. चंदन तिलक धारणेची ही वैज्ञानिक उपपत्ती आहे. 

कुंकूमतिलक लावण्याची उपपत्ति कुंकूमतिलकही भूमध्यस्थानीच लावतात. त्यामुळे वर चंदन तिलकधारणेचे जे लाभ सांगितले, तेच कुंकुमतिलक धारणेलाही लागू पडते.कुंकूसुद्धा जंतुघ्न शीतल आणि रक्तशुद्धीकारक आहे. नेत्राजवळच्या नसा, कपाळावरील नसा यांना त्या रक्तशुद्धी करून शिवाय आतील विषारी कीटाणूंचाही नाश करतात.