शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

डिसेंबरमध्ये जन्मलेले लोक असतात प्रेमळ, कुटुंबवत्सल, आळशी आणि हट्टीसुद्धा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2021 6:22 PM

या लोकांनी आपल्या भीतीवर मात करून आत्मविश्वासाने आपल्या करिअरमध्ये पाऊल टाकले तर त्यांना कोणीही अडवू शकणार नाही.

प्रत्येक व्यक्तिला आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल जाणून घेण्याची तीव्र इच्छा असते. ज्योतिषशास्त्राच्या आधारे डिसेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व समजून घेऊया. 

डिसेंबरमध्ये जन्माला आलेल्या व्यक्तींना वेगळ्याच प्रकारचा आत्मविश्वास असतो. मात्र हा आत्मविश्वास स्वयंप्रेरणेने आलेला नसून तो दुसऱ्यांच्या भरवशावर त्यांनी मिळवलेला असतो. याचे कारण, हे लोक फार आळशी असतात. स्वत: काही करो न करो, मात्र दुसऱ्यांकडून यांच्या ढीगभर अपेक्षा असतात. त्या अपेक्षा कधीच पूर्ण होत नाहीत आणि अपेक्षाभंगाचे दु:खं त्यांना झेलावे लागते. कुटुंबावर भरपूर प्रेम असूनही कुटुंबियांकडून यांना नेहमी तक्रारीचा सूर ऐकावा लागतो. त्याला कारणीभूत त्यांचा आळस असतो.

डिसेंबरच्या पहिल्या १५ दिवसांत जन्मलेले आळशी, हट्टी आणि गर्विष्ठ असतात, तर शेवटच्या १५ दिवसांत जन्मलेले अतिशय सृजनशील, कलाकार आणि हौशी असतात. 

या लोकांना कल्पनाविश्वात रमणे आवडते. वास्तव जगापासून ते कोसो दूर असतात. अशा दिवा स्वप्नांमुळे ते अनेक संधी गमावून बसतात. दुसऱ्याला कमी समजणे ही आणखी एक मेख त्यांच्या ठायी असते. या कारणामुळे ते आप्तस्वकीयांपासून दुरावतात.

आकर्षणाच्या बाबतीत म्हणाल, तर त्यांचे व्यक्तिमत्त्व समोरच्यावर छाप पाडणारे असते. त्यामुळे कर्तृत्त्वाची जोड असो वा नसो त्यांच्यावर अनेक जण पटकन भाळतात. त्यांच्यावर अनेकांचे प्रेम जडते तसेच हे अनेकांच्या प्रेमात पडतात, परंतु नाते स्वीकारले की ते एकनिष्ठपणे निभावतात. या लोकांमध्ये तरुणपणात पाय घसरण्याची दाट शक्यता असते. परंतु संस्कारांचा पगडा असेल, तर ते आयुष्य मार्गी लावू शकतात.

या महिन्यात जन्मलेल्या मुली मात्र अत्यंत चालाख असतात.  गोड बोलून समोरच्याकडून आपले काम कसे काढून घ्यायचे ही कला त्यांना चांगली अवगत असते. स्वभाव काहीसा अबोल असतो. त्यामुळे त्यांच्या मनात काय सुरू आहे याची समोरच्याला कल्पना येत नाही. 

ज्योतिषशास्त्रानुसार डिसेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्तींनी स्वभावात थोडा बदल केला, दैनंदिन सवयींमध्ये सुधारणा केली, तर ते लोकप्रिय व्यक्तीदेखील बनू शकतात. त्यांनी समोरच्याला मान दिला तर आपोआप त्यांनाही मान मिळू शकेल. त्यांना जशी स्वस्तुती आवडते, तशी त्यांनी इतरांचीही मुक्तकंठाने स्तुती केली पाहिजे. पैशांचे व्यवहार जपून केले पाहिजे. कुटुंबाबद्दल केवळ प्रेम बाळगून उपयोग नाही, ते योग्य प्रकारे व्यक्त केले, तरच त्यांनाही कुटुंबात तेवढाच मान आणि भरपूर प्रेम मिळू शकेल.

या लोकांनी आपल्या भीतीवर मात करून आत्मविश्वासाने आपल्या करिअरमध्ये पाऊल टाकले तर त्यांना कोणीही अडवू शकणार नाही. एकदा का यश मिळाले, तर ते त्यांच्या स्वभावानुसार दुसऱ्यांकडून सहज कामे करवून घेऊ शकतील. त्यांच्याकडे नेतृत्वाचे गुण असतात. फक्त त्यासाठी संवादकौशल्य विकसित केले पाहिजे. या लोकांना नोकरीपेक्षा व्यवसायात चांगले यश मिळू शकते. अर्थात त्यासाठी जाणकारांचा सल्ला घेऊन मगच कोणत्याही व्यवसायात पदार्पण करा. 

या महिन्यात जन्मलेल्या आणि प्रसिद्ध झालेल्या लोकांचाही आदर्श तुम्हाला ठेवता येईल. जसे की रतन टाटा, अटल बिहारी वाजपेयी, धिरूभाई अंबानी, शरद पवार, धमेंद्र, मोहम्मद रफी, सोनिया गांधी, युवराज सिंग, उदित नारायण, अरुण जेटली इ.      

टॅग्स :Astrologyफलज्योतिष