शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
3
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
4
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
5
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
6
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
7
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
8
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
9
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
10
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
12
कार्तिक आर्यनसोबत हेमांगी कवी शेअर करणार स्क्रीन; 'चंदू चॅम्पियन'मध्ये साकारतेय महत्त्वाची भूमिका
13
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
14
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
15
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
16
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
17
खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक
18
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?
19
विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा
20
आता औषधे संशयाच्या भोवऱ्यात; दर्जाबाबत शंका आल्याने भारतीय कंपन्यांची उत्पादने परत पाठविली

धैर्य हा मानवाचा दागिना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 3:01 PM

ज्या मनुष्याने धैर्य, विवेक आणि विश्वास यांचा समन्वय साधला तर तो कोणालाच घाबरत नाही. तो भयाने व्याकूळ होत नाही. त्याचे मन वृद्ध होत नाही. तो आपल्या विश्वासाच्या बळावर कठीणातल्या कठीण प्रसंगांना तोंड देतो.

- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)ज्या मनुष्याने धैर्य, विवेक आणि विश्वास यांचा समन्वय साधला तर तो कोणालाच घाबरत नाही. तो भयाने व्याकूळ होत नाही. त्याचे मन वृद्ध होत नाही. तो आपल्या विश्वासाच्या बळावर कठीणातल्या कठीण प्रसंगांना तोंड देतो. धैर्याने तो आपल्यावर येणाऱ्या संकटांना हसत-खेळत सामोरे जातो. तो मनुष्य यशाची प्रदीर्घ प्रतीक्षा करतो व साधना करत राहातो. कुठल्याही प्रसंगी तो आपले धैर्य सोडत नाही. आपल्या कार्यापासून जराही विचलित होत नाही. कठीणातल्या कठीण प्रसंगी आपले धैर्य टिकवून ठेवतो. कारण त्याच्यातला आत्मविश्वास कायम असतो. ज्याचा आत्मविश्वास बळकट आहे तो आपल्या यशस्वी साम्राज्याची गुढी उभारतो. आत्मविश्वासाने पराजयाचे विजयात रूपांतर करतो. नि:संदेहपणे जगतो. आत्मविश्वासाच्या बळावर मनुष्य महान कार्य करतो. तो कधीच आपला आत्मविश्वास गमावत नाही.आपला विवेकरूपी तोल कधी ढळू देत नाही. जीवनात मान-अपमान, धर्म-अधर्म, जीवन-मरण, लाभ-हानी या सर्वांना तो ओळखून असतो. त्या मनुष्याला त्याची परिपूर्ण जाणीव असते. त्याच्या जीवनात कुटिल राजकारण नसते. आपल्याकडून कुठलेही वाईट कर्म घडणार नाही याची दक्षता घेतो. त्याच्या प्रत्येक कर्मात सरलता, सुबोधता आढळते. खोटेपणा, कृत्रिमता त्याच्या कार्यात नसते. तो मनुष्य साधनाशील असतो. जीवनमूल्यांचा प्रसार-प्रचार करतो. धर्माची प्रबलता वाढवतो. समाज, राष्ट्र घडविण्यात त्याचा सिंहाचा वाटा असतो. सदाचार, श्रेष्ठाचार त्याच्या अंगी बाळगतो. भ्रष्टाचार शब्द त्याच्या मनाच्या नोंदवहीतसुद्धा सापडत नाही. तो मनुष्य नेहमी संयम-सदाचार याचा परिपाठ लोकांना सांगतो किंवा आपल्या आचरणातून दाखवतो. तो मनुष्य धैर्य-विवेक व आत्मविश्वासाच्या समन्वयातून आकाशात उडण्याचा प्रयत्न करेल किंवा उडेलही. म्हणून म्हणतो माणसाजवळ धैर्य-विवेक व आत्मविश्वास नसेल तर तो मनुष्य तरुण असूनही वृद्ध आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक