शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

कामात यश मिळत नाहीये? मग कामाचे स्वरूप बदलून पहा, यश नक्की मिळेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 6:17 PM

कामात सातत्य, मेहनत, चिकाटी आणि जिद्द मनुष्याला यशस्वी बनवते.

अभिनेत्री मुक्ता बर्वे एका चित्रपटात म्हणते, 'आयुष्यात काहीतरी बाप केले पाहिजे.' पण नक्की काय, हे आपल्याला कळत नाही. प्रत्येकाला वाटते, आपण यशस्वी व्हावे, प्रसिद्ध व्हावे. यासाठी सगळे जण मेहनतदेखील करतात. परंतु कोणाला यश येते, तर कोणाला अपशय! अशा वेळी नवनवे काम शोधण्यापेक्षा कामाचे नवनवे मार्ग शोधले, तर यशाचे दार उघडू शकते. यशस्वी लोक  वेगळे काही करत नसतात, फक्त त्यांची कार्यपद्धती आपल्यापेक्षा वेगळी असते. ती कशी, हे आपण या कथेतून पाहुया.

दोन समवयस्क तरुण. एक मुका असतो, दुसरा अंध. मुका तरुण एका नामांकित कॉर्पोरेट कंपनीत नोकरी करत असतो, तर अंध तरुण त्याच कंपनीच्या पायरीशी बसून भीक मागत असतो. जन्मत: अपंगत्व दोघांना आलेले असूनही एकाने त्यावर मात केलेली असते, तर दुसरा दैवावर हवाला टाकून बसलेला असतो. 

मुका तरुण आपल्या अपंगत्त्वावर मात करत महिन्याला लाखो रुपये कमावतो. ऐषोआरामी जीवन जगतो. आलिशान गाडीतून ये जा करतो. हे सारे काही त्याने आपल्या मेहनतीने, प्रयत्नाने कमावलेले असते. परंतु त्याच्याच वयाचा तरुण दुसऱ्यांसमोर हात पसरण्यात आपली धन्यता मानतो. 

अंध तरुणाने मिळकत वाढावी म्हणून एक पाटी आणून त्यावर कोणाकडून लिहून घेतलेले असते, `मी अंध आहे, मला मदत करा.' ती पाटी वाचून काही जण मदत करतात, तर काही जण करत नाहीत. मुका तरुण रोजच्या वेळेत ऑफिसला येतो. येताना त्या तरुणाला पाहतो आणि त्याची पाटीही वाचतो. तो त्याच्या जवळ जातो. पाटीवरचा मजकूर बदलतो आणि त्याच्या कटोरीत पैसे टाकून जातो. अंध तरुणाला हे लक्षात येते. पण तो काही बोलणार त्याच्या आत मुका तरुण निघून जातो. 

सायंकाळी ऑफिसमधून निघताना मुका तरुण अंध तरुणाकडे डोकावतो, तर त्याच्या पाटीजवळ बरीच माया गोळा झालेली असते. तो आनंदाने तिथे जातो आणि त्याच्या पाठीवर हात ठेवत आणखी काही पैशांची भर टाकतो. अंध तरुण लगेच ओळखतो आणि त्या तरुणाला थांबवून म्हणतो, `तुम्ही तेच आहात ना, ज्यांनी सकाळी माझ्या पाटीवर काहीतरी लिहिले. त्यामुळे काय जादू झाली माहित नाही, लोक थांबून थांबून पैसे देऊ लागले. तुम्ही काय लिहिलेत हे जाणून घेण्याची मला उत्सुकता आहे.'

मुका तरुण आपल्या सहकाNयाला बोलावून आपण केलेला बदल वाचायला सांगतो. त्याने पाटीवर लिहिलेले असते, `हे जग सुंदर आहे, आजचा दिवस सुंदर आहे, परंतु मी अंध असल्याने तो पाहू शकत नाही.'

अशा भावनिक संदेशामुळे लोकांना त्याची दया येते शिवाय देवाने आपल्याला ही सृष्टी दिसावी म्हणून ही दृृष्टी दिली, याची जाणीव होते. 

वाक्यातील या छोट्याशा बदलामुळे मोठा परिणाम साधला जातो. एवढी साधी गोष्ट आपल्याला सुचली नाही, याचे अंध तरुणाला वाईट वाटते आणि जाणीव होते, की आपण चुकीच्या मार्गाने प्रयत्न करत होतो आपण आपला मार्ग बदलला पाहिजे. अंध तरुण दुसऱ्या तरुणाच्या मदतीने त्या कंपनीत सफाई कामगार म्हणून नोकरी पत्करतो आणि हळू हळू आत्मनिर्भर होतो. 

हे दोन तरुण अपंगत्वावर मात करून यशस्वी होऊ शकतात, तर आपण धडधाकट असूनही यशस्वी का होऊ शकत नाही? त्यामुळे काम बदलू नका, कामाचे स्वरूप बदला. यश नक्की मिळेल.