शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

पुढच्या वर्षाचे नाही, तर पुढच्या पाच वर्षांचे संकल्प आखा आणि त्यावर काम सुरू करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 14:42 IST

प्रत्येक बाबतील दूरदृष्टी हवी. 'पुढे काय?' या प्रश्नाचे उत्तर आपल्याला माहीत असेल तर आपण बेसावध कधीच राहत नाही.

नवीन वर्ष येताच आपल्याला पहिली गोष्ट आठवते, ती म्हणजे संकल्पांची! गेल्या वर्षीचे संकल्प बारगळलेले असतातच, तरीदेखील आपले मन पुढच्या वर्षाच्या संकल्पाची यादी आपल्यासमोर ठेवते. परंतु, तुम्ही जर सुज्ञ असाल, हुशार असाल, तर केवळ पुढच्या वर्षीचा नाही, तर पुढच्या पाच वर्षांच्या संकल्पाची आखणी कराल आणि त्यावर मेहनत सुरू कराल. जशी 'या' राजाने केली....

एका गावाचा नियम होता. त्या गावात जी व्यक्ती राजा म्हणून नियुक्त होईल, तिला सगळा राजेशाही थाटमाट, आदर, श्रीमंती उपभोगण्यास मिळत असे. परंतु राजपदाचा कार्यकाल केवळ पाच वर्षांचा असे. त्यानंतर गावकरी स्वत: त्या राजाची मिरवणुक काढत नदीपलीकडच्या जंगलात सोडून येत असत. तिथे गेलेली व्यक्ती आजवर कधीच परतली नव्हती. त्यामुळे राजपदावर बसण्याच्या वेळी पुढच्या पाच वर्षांनंतरची मृत्यूची भीती राजाला अस्वस्थ करीत असे. 

त्या गावात एक विद्वान होता. गावकऱ्यांची इच्छा होती की यंदाच्या निवडणुकीत त्या विद्वानाने राज्यपदी बसावे. मात्र विद्वानाला नियम माहित असल्याने त्याने स्पष्ट नकार दिला. तरी गावकऱ्यांनी तगादा लावल्याने विद्वान राज्यपदावर बसायला तयार झाला. त्याआधी त्याने नदीपलीकडचे जंगल बघायचे ठरवले. व त्यानुसार जंगलाची पाहणी केली. तिथे त्याला यापूर्वीच्या राजांचे सापळे दिसले. कारण जंगली प्राण्यांनी त्यांना मारून त्यांचे मांस खाऊन टाकले होते. विद्वानाने दोन चार गावकऱ्यांना हाताशी घेऊन सर्व जंगलाची पाहणी केली व राज्याभिषेक झाल्यावर तो राज्य सांभाळू लागला. 

राज्याचे कामकाज करत असतानाच त्याने नदीकडून पलीकडचा परिसर यांना जोडणारा चांगला मार्ग बनवून घेतला. पुढच्या वर्षी त्याने प्राणिमित्रांना बोलावून जंगलातील हिंस्त्र श्वापदांचे आणखी घनदाट जंगलात स्थलांतर केले. त्यानंतर पलीकडची जागा शेतीसाठी अनुकूल करून घेतली. रोजगार उपलब्ध झाल्याने लोक तिथे वस्तीसाठी जाऊ लागले. अन्य लोकांचीही भीड चेपली. दोन्ही बाजूला येजा सुरू झाली.

असे कामकाज पूर्ण करून विद्वान राजा म्हणून निवृत्तीसाठी तयार झाला. त्याला पाहण्यासाठी गाव गोळा झाले. मात्र या आधीच्या राजांसारखे त्याच्या चेहऱ्यावर भय, पश्चात्ताप, चिंता काहीच दिसले नाही. लोकांनी त्याला निरोप दिला आणि त्याच्या आनंदाचे कारण विचारले, तेव्हा विद्वान म्हणाला, `आजवर लोकांना ज्या जागेची भीती वाटत होती, त्या परिसराचे आज नंदनवन झाले आहे. त्यामुळे मी निश्चिंत आहे. मला कसलीही भीती नाही. तिथे जावे लागणार हे माहित असल्याने मी पाच वर्षांच्या कार्यकालात राजपद सांभाळून पुढच्या आयुष्याची तजवीज केला आणि आता त्या नव्या गावात मला राजा होण्याची संधी परत चालून आली आहे. 

याला म्हणतात दूरदृष्टी! तिचा अभाव असून उपयोग नाही. आयुष्यातल्या प्रतिकूल प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी आधीपासून केलेली असते, तेव्हा भविष्याच्या काळजीने वर्तमान बिघडत नाही!

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी