शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
2
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
3
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
4
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
5
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
6
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
7
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
8
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
9
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
10
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
11
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
12
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
13
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
14
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
15
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
16
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
17
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
18
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
19
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
20
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

पुढच्या वर्षाचे नाही, तर पुढच्या पाच वर्षांचे संकल्प आखा आणि त्यावर काम सुरू करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 14:42 IST

प्रत्येक बाबतील दूरदृष्टी हवी. 'पुढे काय?' या प्रश्नाचे उत्तर आपल्याला माहीत असेल तर आपण बेसावध कधीच राहत नाही.

नवीन वर्ष येताच आपल्याला पहिली गोष्ट आठवते, ती म्हणजे संकल्पांची! गेल्या वर्षीचे संकल्प बारगळलेले असतातच, तरीदेखील आपले मन पुढच्या वर्षाच्या संकल्पाची यादी आपल्यासमोर ठेवते. परंतु, तुम्ही जर सुज्ञ असाल, हुशार असाल, तर केवळ पुढच्या वर्षीचा नाही, तर पुढच्या पाच वर्षांच्या संकल्पाची आखणी कराल आणि त्यावर मेहनत सुरू कराल. जशी 'या' राजाने केली....

एका गावाचा नियम होता. त्या गावात जी व्यक्ती राजा म्हणून नियुक्त होईल, तिला सगळा राजेशाही थाटमाट, आदर, श्रीमंती उपभोगण्यास मिळत असे. परंतु राजपदाचा कार्यकाल केवळ पाच वर्षांचा असे. त्यानंतर गावकरी स्वत: त्या राजाची मिरवणुक काढत नदीपलीकडच्या जंगलात सोडून येत असत. तिथे गेलेली व्यक्ती आजवर कधीच परतली नव्हती. त्यामुळे राजपदावर बसण्याच्या वेळी पुढच्या पाच वर्षांनंतरची मृत्यूची भीती राजाला अस्वस्थ करीत असे. 

त्या गावात एक विद्वान होता. गावकऱ्यांची इच्छा होती की यंदाच्या निवडणुकीत त्या विद्वानाने राज्यपदी बसावे. मात्र विद्वानाला नियम माहित असल्याने त्याने स्पष्ट नकार दिला. तरी गावकऱ्यांनी तगादा लावल्याने विद्वान राज्यपदावर बसायला तयार झाला. त्याआधी त्याने नदीपलीकडचे जंगल बघायचे ठरवले. व त्यानुसार जंगलाची पाहणी केली. तिथे त्याला यापूर्वीच्या राजांचे सापळे दिसले. कारण जंगली प्राण्यांनी त्यांना मारून त्यांचे मांस खाऊन टाकले होते. विद्वानाने दोन चार गावकऱ्यांना हाताशी घेऊन सर्व जंगलाची पाहणी केली व राज्याभिषेक झाल्यावर तो राज्य सांभाळू लागला. 

राज्याचे कामकाज करत असतानाच त्याने नदीकडून पलीकडचा परिसर यांना जोडणारा चांगला मार्ग बनवून घेतला. पुढच्या वर्षी त्याने प्राणिमित्रांना बोलावून जंगलातील हिंस्त्र श्वापदांचे आणखी घनदाट जंगलात स्थलांतर केले. त्यानंतर पलीकडची जागा शेतीसाठी अनुकूल करून घेतली. रोजगार उपलब्ध झाल्याने लोक तिथे वस्तीसाठी जाऊ लागले. अन्य लोकांचीही भीड चेपली. दोन्ही बाजूला येजा सुरू झाली.

असे कामकाज पूर्ण करून विद्वान राजा म्हणून निवृत्तीसाठी तयार झाला. त्याला पाहण्यासाठी गाव गोळा झाले. मात्र या आधीच्या राजांसारखे त्याच्या चेहऱ्यावर भय, पश्चात्ताप, चिंता काहीच दिसले नाही. लोकांनी त्याला निरोप दिला आणि त्याच्या आनंदाचे कारण विचारले, तेव्हा विद्वान म्हणाला, `आजवर लोकांना ज्या जागेची भीती वाटत होती, त्या परिसराचे आज नंदनवन झाले आहे. त्यामुळे मी निश्चिंत आहे. मला कसलीही भीती नाही. तिथे जावे लागणार हे माहित असल्याने मी पाच वर्षांच्या कार्यकालात राजपद सांभाळून पुढच्या आयुष्याची तजवीज केला आणि आता त्या नव्या गावात मला राजा होण्याची संधी परत चालून आली आहे. 

याला म्हणतात दूरदृष्टी! तिचा अभाव असून उपयोग नाही. आयुष्यातल्या प्रतिकूल प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी आधीपासून केलेली असते, तेव्हा भविष्याच्या काळजीने वर्तमान बिघडत नाही!

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी