शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

चांगलं दिसणं फक्त महत्त्वाचं नाही, चांगलं असणं जास्त महत्त्वाचं; तरच जग तुमच्या सोबत येईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 17:45 IST

प्रतिकूल परिस्थितीतही जो आनंदी राहतो, लोक त्याला आपला आदर्श मानतात. याबाबतीत ओशो म्हणतात... 

आजकाल ज्याला बघावे, तो आपल्याच दु:खाचे  तुणतुणे वाजवत फिरतो. प्रत्येकाला आपलेच दु:खं किती मोठे हे सांगण्यात आणि सनानुभूती मिळवण्यात आनंद मिळतो. मात्र, कोणी एक असा भेटत नाही, जो समाधानाने ईश्वराचे आभार मानत म्हणतो, `भगवंता, जे दिले आहेस, त्यात मी आनंदी आहे.' याबाबत ओशो म्हणतात-

सदा दु:खाचे प्रदर्शन करत सहानुभूती गोळा करण्यात काय अर्थ आहे? वेगळ्या तऱ्हेने लोकांचे लक्ष वेधून घ्या ना. हसा! चेहरा प्रसन्न दिसू द्या. रडून आकर्षित करणे हे काही खरे नाही. लोकांकडून सहानुभूती कशाला हवी? ती काही मागण्याजोगी गोष्ट आहे? लोकांकडून प्रेमाची अपेक्षा धरा आणि प्रेम मिळवण्यासाठी आधी प्रेम द्यायला शिका. 

सहानुभूतीची अपेक्षा म्हणजे आजारपण. प्रेम म्हणजे आरोग्य. जेव्हा तुम्हाला प्रेम मिळत नाही, तेव्हा तुम्ही सहानुभूतीसाठी झोळी पसरता. सहानुभूतीलाच प्रेम समजू लागता. खोट्या नाण्याला खरे नाणे म्हणून चलनात आणता. जेव्हा तुम्ही आपल्या सौंदर्याने लोकांना आकर्षित करू शकत नाही, तेव्हा कुरुपतेने लोकांची सहानुभूती मिळवू शकता. सौंदर्य आणि कुरुपता या गोष्टी मन, वृत्ती, आचार यांच्याशी संलग्न असतात. कसेही करून लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधायचे. तुमच्याकडे रसरशीत निरोगीपणा, सक्षमता असेल तर कोण बघणार? याला आपली गरज नाही, असा लोकांच्या मनात विचार येईल. मग आपल्याकडे कोणी लक्ष देणार नाही असे समजून तुम्ही आजारी होऊन रस्त्यावर पडलात तर लोकांची गर्दी जमते. लोक हळहळतात, सहानुभूती व्यक्त करतात. काहीही कारण असा़े. तुम्हाला वाटते लोकांनी तुम्हाला बघावे. तुम्हाला खास व्यक्ती मानावे. यासाठी माणूस काहीही करायला तयार होतो. 

मी इथे निरीक्षण करत असतो. हजार तऱ्हेचे लोक माझ्याकडे येतात. त्यांच्यात जे निरोगी वृत्तीचे असतात, सुंदर असतात, वागण्या बोलण्यात सहज स्वाभाविक असतात, त्यांच्याकडेसुद्धा लक्ष वेधले जाते. पण त्यांच्या एकंदर जडण घडणीत रुग्णता नसते. जे मुद्दाम दु:खी झालेत, स्वत:ला दु:खी बनवले आहे, कुरुप झाले आहेत, प्रेमाचे सगळे स्रोत आटून गेले आहेत, त्यांच्याकडेसुद्धा लक्ष वेधले जाते. पण त्यांच्या ध्यान आकर्षून घेण्यात मोठी कुरुपता असते. प्रत्येक उत्सवाच्या वेळी असा आरडा ओरडा करत खाली कोसळणाऱ्या चार पाच स्त्रिया हमखास आढळतात. स्वस्थ निरोगी शरीराच्या, मनानं आरोग्यपूर्ण असणाऱ्या स्त्रिया असे करत नाहीत.

ज्यांच्या जीवनात काही ना काही कला असेल, त्या कलेच्या माध्यमातून ते लोकांचे ध्यान आकर्षून घेतील. त्यांच्या जीवनात काही ना काही कला असेल. त्या कलेच्या माध्यमातून ते लोकांचे ध्यान आकर्षित करतील. 

मानसशास्त्रज्ञ म्हणतात, की मोठे कलाकार, सृजनशील व्यक्ती, राजनीतिज्ञ आणि अपराधी व्यक्ती यांच्यात फार फरक नसतो. आकर्षित करण्याचे मार्ग मात्र वेगळे असतात. कुणी सुंदर गीत गाऊन लक्ष वेधेल. जो असे सृजन करू शकणार नाही, तो कुणाची हत्या करेल. त्यामुळे वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर येईल. अमेरिकेत एका खुन्याने विनाकारण एका दिवसात सात हत्या केल्या. कारण त्याला आपले नाव वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर पहायचे होते.

लक्ष वेधून घेण्यासाठी आपली मानसिकता विकृत बनवायची की सुदृढ हे प्रत्येकाच्या हाती आहे. वाईट गोष्टीतून तुम्ही लक्ष वेधून घेण्यात यशस्वी व्हाल, परंतु तुमच्या व्यक्तीमत्त्वावर त्याच वाईट विचारांची छाप उमटली जाईल. याउलट कष्टपूर्वक तुम्ही निर्माण केलेली कलाकृती, व्यक्त केलेला विचार किंवा अन्य कोणतीही गोष्ट दीर्घकाळ लोकांच्या स्मरणात राहील आणि तुम्हाला वारंवार लोकांचे लक्ष वेधून घेण्याची आवश्यकता भासणार नाही, कारण लोक तुमच्या चांगुलपणावर लक्ष आणि विश्वास ठेवून असतील.