शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

छोट्याशा चिमणीने माळी दादाला, नव्हे आपल्या सर्वांना शिकवला मोठ्ठा धडा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 6:22 PM

चुकांची आपण पुनरावृत्ती करत राहिलो तर आपल्या आयुष्यात बाहेरचे लोक येऊन असेच नासधूस करत राहतील. 

एका माळ्याने सुंदर बाग तयार केली होती. तो त्या बागेचा जीवापाड सांभाळ करत असे. मात्र गेल्या काही दिवसांपासून एक चिमणी रोज येऊन त्याच्या बागेची नासधूस करत होती. माळ्याने तिला शिक्षा द्यायचं ठरवलं. तो तिच्या मागावर होता. दबा धरून बसला होता. पण काही केल्या चिमणी त्याच्या हातात येईना. त्याला त्रास देताना चिमणीला आणखी गंमत वाटे. 

एक दिवस माळ्याने मस्त सापळा रचला आणि नेमकी चिमणी त्या जाळ्यात अडकली. माळ्याला खूप आनंद झाला. आता तो चिमणीला शिक्षा देणार होता. त्याने चिमणीला हातात घट्ट धरलं आणि दामटवत विचारलं, 'काय गं चिमणे, माझ्या सुंदर बागेची नासधूस करताना तुला काहीच वाटलं नाही ना. बरी आता ताब्यात आलीस. तुला कशी शिक्षा करतो बघच!'

चिमणी घाबरली आणि बारीक आवाजात चिवचिवत म्हणाली, 'माळी दादा, माळी दादा मला माफ करा. पुन्हा अशी चूक नाही करणार.'माळी म्हणाला, 'लबाड आहेस तू. मला माहीत आहे. तुला काही आज मी सोडत नाही.' असे म्हणत माळ्याने तिला आणखीनच घट्ट धरली. चिमणी काकुळतीला येऊन म्हणाली, 'माळी दादा, आज माझे प्राण कंठाशी आल्यावर मला माझी चूक कळली आणि आता मला याची शिक्षाही मिळणार याची खात्री झाली आहे. पण आता मरण्याआधी तुला चार ज्ञानाच्या गोष्टी सांगाव्या वाटत आहेत, सांगू का?'माळ्याने नुसता हुंकार भरला. 

चिमणी म्हणाली, 'पहिली गोष्ट म्हणजे, अति आत्मविश्वास वाईटच! म्हणून कोणावरही विश्वास ठेवू नये.दुसरी गोष्ट म्हणजे शत्रूला कधीच कमकुवत समजून माफ करू नये. तिसरी गोष्ट म्हणजे गेलेल्या गोष्टीबद्दल पश्चात्ताप करू नये. आणि चौथी म्हणजे.... माळी दादा जरा पकड ढिली करा. गळा आवळला जातोय. थोडी मोकळीक दिलीत तर चौथी गोष्ट सांगते...'

माळ्याने पकड थोडी ढिली केली, तशी चिमणी फुर्क्कन उडाली आणि झाडावर जाऊन बसली. माळ्याला म्हणाली, 'माळी दादा, माझ्या पोटात २ हिरे होते, मला सोडून तू मोठी चूक केलीस'

हे ऐकून माळ्याचा चेहरा आणखीनच पडला. त्यावर चिमणी हसून म्हणाली, 'हे काय माळीदादा, आता सांगितलेल्या चारही गोष्टी तू विसरलास?अति आत्मविश्वास वाईटच! म्हणून कोणावरही विश्वास ठेवू नये. तरी तू माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवलास!शत्रूला कधीच कमकुवत समजून माफ करू नये. तू माझ्यावर दया दाखवून चूक केलीस.  गेलेल्या गोष्टीबद्दल पश्चात्ताप करू नये. हातून निसटून गेल्यावर तुला मी हिरे पोटात असल्याचे म्हटलं आणि तू विश्वास ठेवलास आणि पश्चात्ताप करू लागलास. ही आणखी मोठी चूक...!या चुका परत परत होऊ नये म्हणून तुला धडा शिकवायला मी तुझ्या बागेची नासधूस करत होते. आता यापुढे या गोष्टी लक्षात ठेव, मी पुन्हा परीक्षा घ्यायला येईन.' असे म्हणून चिमणी उडून गेली. माळी दादा आपल्याच चुकांवर हसू लागला.

वास्तविक पाहता ही शिकवण एकट्या माळी दादासाठी नसून आपल्या सगळ्यांसाठी आहे. या चुकांची आपण पुनरावृत्ती करत राहिलो तर आपल्या आयुष्यात बाहेरचे लोक येऊन असेच नासधूस करत राहतील.