शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाचे दिग्दर्शक झालात तर...; अक्षय कुमारच्या प्रश्नावर CM फडणवीसांचं दमदार उत्तर, टाळ्यांचा कडकडाट
2
योगी बुलडोजर चालवत आहेत तर...? बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर यांचा CJI बीआर गवईंना थेट सवाल
3
बिहारमध्ये भाजपाच्या अडचणी वाढणार, चिराग पासवान-प्रशांत किशोर यांना टाळी देण्याच्या तयारीत?
4
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे
5
जखमींना हॉस्पिटलला पोहचवा, २५ हजार ते १ लाख मिळवा; योगी सरकारनं आणली जबरदस्त योजना
6
VIRAL : तो नवरा आहे गं, महिषासुर नाही... करवा चौथची पूजा करण्यासाठी महिलेनं काय केलं, Video बघाच!
7
"आम्हाला दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचं नव्हतं...", रेणुका शहाणेंचा मोठा खुलासा, म्हणाल्या...
8
'या' एका निर्णयाने फिरलं वातावरण! ग्राहक जोडणीत BSNL ने Airtel ला टाकले मागे; जिओची काय स्थिती?
9
Cough Syrup : "पप्पा, घरी जाऊया...", कफ सिरपमुळे मुलीने गमावला जीव; १६ डायलिसिस, २२ दिवस मृत्यूशी झुंज
10
कतरिना कैफचं झालं बेबी शॉवर, 'या' फोटोमुळे मिळाली हिंट; ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
11
धक्कादायक! विरारमध्ये दोन विद्यार्थ्यांची १२ व्या मजल्यावरून उडी; दोघांचाही मृत्यू
12
“गेम करण्याएवढी ताकद नाही, आम्ही भांडी घासायला बसलोय का”; ओबीसी नेत्यांचे जरांगेंना उत्तर
13
Australia Squad Against India : टीम इंडियाच्या २ कॅप्टनसमोर ऑस्ट्रेलियाकडून मार्श दाखवणार ताकद
14
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
15
VIDEO: रस्त्याखाली काम, रस्त्यावर 'जॅम'! मेट्रो सुरू झाली, पण कार अजूनही ट्रॅफिकमध्येच; वरळी नाक्याजवळची कोंडी कधी फुटणार?
16
Video - राईड संपल्यानंतर 'ती' रॅपिडोवाल्याशी भिडली, पैसे मागताच डोळ्यात फेकली मिरची फूड
17
१५ राण्या, ३० मुलं अन् १०० नोकरांसह दुबईला पोहोचला 'या' देशाचा राजा; शेख पाहत राहिले...
18
जबरदस्त फिचर! नंबरशिवाय तुमचे WhatsApp काम करेल, लवकरच अपडेट होणार
19
सगळ्याच मर्यादा ओलांडल्या! १८ वर्षांच्या जावयाशी लग्न करणार होती सासू; मंगळसूत्र घालण्याआधीच मुलीची एंट्री झाली अन्.. 
20
‘मविआ’सोबत न घेण्याच्या हर्षवर्धन सपकाळांचा निर्णय, मनसेची पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले...

Lifelesson: प्रेमानंद महाराजांच्या 'या' ३ सूचना, तुमच्या मनाला उभारी देतील हे नक्की!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 11:56 IST

Lifelesson: माझ्या नशिबात सगळं वाईटच लिहिलंय असं ज्यांना वाटतं त्यांनी अध्यात्मिक गुरु प्रेमानंद महाराजांनी सांगितलेल्या तीन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. 

जीवनात सतत नकारात्मक आणि वाईट गोष्टींचा अनुभव येत असेल, तर मन खचून जाणे, निराश होणे स्वाभाविक आहे. अनेकांना असे वाटू लागते की आपल्या नशिबात सगळे वाईटच लिहिले गेले आहे. जेव्हा तुम्ही मेहनत करता आणि तरीही अपयश पदरी येते, तेव्हा 'माझ्या बाबतीतच असे का घडते?' हा प्रश्न मनात येतो. अशा वेळी, वृंदावनचे आध्यात्मिक गुरु प्रेमानंद महाराज आपल्याला एक अतिशय मोलाचा आणि दिलासा देणारा उपदेश देतात, जो या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतो.

आठवड्याची सुरुवात गजकेसरी योगाने; करिअर, कमाईत ६ राशींना मिळणार भरघोस फायदे!

महाराज सांगतात की, आयुष्यात जे काही घडते, ते काही वाईट नसते; तर ती ईश्वराची तयारी असते. ते ठामपणे सांगतात, "आज जर तुम्हाला अपयश मिळाले आहे, तर हे निश्चित समजा की उद्या तुम्हाला मोठे यश मिळणार आहे." ईश्वराचा नियम असा आहे की तो तुम्हाला कधीही तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त दु:ख देत नाही आणि तुमच्या मेहनतीचे फळ नक्कीच देतो. हे अपयश म्हणजे तुमच्या पुढील मोठ्या यशाची पूर्वतयारी आहे, हे लक्षात घ्या.

अपयशातूनच यशाचा पाया मजबूत होतो

महाराज आपल्या उपदेशात समजावून सांगतात की, मनुष्याला यश मिळण्यापूर्वी कठीण परीक्षांना सामोरे जावे लागते. जसे सोन्याला अग्नीत तापवल्याशिवाय त्याला खरी किंमत आणि तेज मिळत नाही, तसेच जीवनातील संकट आणि अपयश माणसाला अधिक मजबूत बनवतात. जेव्हा तुम्ही अपयशी होता, तेव्हा तुमच्यातील दोष, त्रुटी आणि कमतरता तुम्हाला कळतात. या अडचणी तुम्हाला अधिक चांगले शिकवतात आणि तुम्हाला मोठे यश पेलण्यासाठी तयार करतात. हे संकट म्हणजे तुमच्या कर्माचे शुद्धीकरण असते, ज्यामुळे तुमचा मार्ग निष्कंटक होतो.

Astro Tips: वैवाहिक सुखासाठी नवरा बायकोने दर शनिवारी लवंगीने दृष्ट कशी काढावी? वाचा 

अपयशाने खचून जाल तेव्हा पुढील तीन गोष्टी करा :

१. कर्म आणि कर्तव्य: तुमचे वर्तमान कार्य किंवा कर्म निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करत राहा. फळाची चिंता करू नका, कारण तुमचे कर्म कधीही व्यर्थ जात नाही.

२. श्रद्धा आणि संयम: हा कठीण काळ लवकरच निघून जाईल, यावर पूर्ण श्रद्धा ठेवा. परमेश्वराने तुमच्यासाठी याहून काहीतरी मोठे आणि चांगले नियोजित केले आहे, म्हणून संयम ठेवा.

३. उपासना आणि नामस्मरण: या कठीण काळात परमेश्वराचे नामस्मरण आणि उपासना वाढवा. महाराजांच्या मते, संवेदनशील काळात केलेली भक्ती अधिक फलदायी ठरते आणि याच भक्तीच्या बळावर तुमचा उद्याचा यशाचा दिवस निश्चित होतो.

म्हणून, वाईट घडणाऱ्या घटनांनी घाबरू नका. धीर धरा, कारण हा काळ लवकरच संपणार आहे. तुमच्या या कठीण काळात तुम्ही केलेली निष्ठा आणि मेहनत, हेच तुमच्या उद्याच्या मोठ्या यशाचा पायारू आहे, हे निश्चित. त्याबरोबरच यशस्वी होण्याचे सूत्र म्हणजे अपयशाने खचू नका आणि यशाने हुरळून जाऊ नका. जी परिस्थिती असेल तिच्याकडे तटस्थ भावनेने बघायला शिका. कारण आज यश असेल तर उद्या अपयश मिळणारच आणि आज अपयश मिळाले असेल तर उद्या यश मिळणारच!

English
हिंदी सारांश
Web Title : Lifelesson: Premanand Maharaj's 3 tips to uplift your spirit.

Web Summary : Spiritual guru Premanand Maharaj advises viewing failures as preparation for future success. Hardships refine individuals, revealing flaws and strengthening resolve. He suggests unwavering faith, dedicated work, and increased devotion during tough times guarantee ultimate success. Don't be disheartened by failures; they are stepping stones.
टॅग्स :spiritualअध्यात्मिक