शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
2
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
3
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
5
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
6
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
7
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
8
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
9
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
10
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
11
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
12
"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा
13
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
14
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
15
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
16
Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
17
“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
18
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
19
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
20
उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

Lifelesson: प्रेमानंद महाराजांच्या 'या' ३ सूचना, तुमच्या मनाला उभारी देतील हे नक्की!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 11:56 IST

Lifelesson: माझ्या नशिबात सगळं वाईटच लिहिलंय असं ज्यांना वाटतं त्यांनी अध्यात्मिक गुरु प्रेमानंद महाराजांनी सांगितलेल्या तीन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. 

जीवनात सतत नकारात्मक आणि वाईट गोष्टींचा अनुभव येत असेल, तर मन खचून जाणे, निराश होणे स्वाभाविक आहे. अनेकांना असे वाटू लागते की आपल्या नशिबात सगळे वाईटच लिहिले गेले आहे. जेव्हा तुम्ही मेहनत करता आणि तरीही अपयश पदरी येते, तेव्हा 'माझ्या बाबतीतच असे का घडते?' हा प्रश्न मनात येतो. अशा वेळी, वृंदावनचे आध्यात्मिक गुरु प्रेमानंद महाराज आपल्याला एक अतिशय मोलाचा आणि दिलासा देणारा उपदेश देतात, जो या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतो.

आठवड्याची सुरुवात गजकेसरी योगाने; करिअर, कमाईत ६ राशींना मिळणार भरघोस फायदे!

महाराज सांगतात की, आयुष्यात जे काही घडते, ते काही वाईट नसते; तर ती ईश्वराची तयारी असते. ते ठामपणे सांगतात, "आज जर तुम्हाला अपयश मिळाले आहे, तर हे निश्चित समजा की उद्या तुम्हाला मोठे यश मिळणार आहे." ईश्वराचा नियम असा आहे की तो तुम्हाला कधीही तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त दु:ख देत नाही आणि तुमच्या मेहनतीचे फळ नक्कीच देतो. हे अपयश म्हणजे तुमच्या पुढील मोठ्या यशाची पूर्वतयारी आहे, हे लक्षात घ्या.

अपयशातूनच यशाचा पाया मजबूत होतो

महाराज आपल्या उपदेशात समजावून सांगतात की, मनुष्याला यश मिळण्यापूर्वी कठीण परीक्षांना सामोरे जावे लागते. जसे सोन्याला अग्नीत तापवल्याशिवाय त्याला खरी किंमत आणि तेज मिळत नाही, तसेच जीवनातील संकट आणि अपयश माणसाला अधिक मजबूत बनवतात. जेव्हा तुम्ही अपयशी होता, तेव्हा तुमच्यातील दोष, त्रुटी आणि कमतरता तुम्हाला कळतात. या अडचणी तुम्हाला अधिक चांगले शिकवतात आणि तुम्हाला मोठे यश पेलण्यासाठी तयार करतात. हे संकट म्हणजे तुमच्या कर्माचे शुद्धीकरण असते, ज्यामुळे तुमचा मार्ग निष्कंटक होतो.

Astro Tips: वैवाहिक सुखासाठी नवरा बायकोने दर शनिवारी लवंगीने दृष्ट कशी काढावी? वाचा 

अपयशाने खचून जाल तेव्हा पुढील तीन गोष्टी करा :

१. कर्म आणि कर्तव्य: तुमचे वर्तमान कार्य किंवा कर्म निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करत राहा. फळाची चिंता करू नका, कारण तुमचे कर्म कधीही व्यर्थ जात नाही.

२. श्रद्धा आणि संयम: हा कठीण काळ लवकरच निघून जाईल, यावर पूर्ण श्रद्धा ठेवा. परमेश्वराने तुमच्यासाठी याहून काहीतरी मोठे आणि चांगले नियोजित केले आहे, म्हणून संयम ठेवा.

३. उपासना आणि नामस्मरण: या कठीण काळात परमेश्वराचे नामस्मरण आणि उपासना वाढवा. महाराजांच्या मते, संवेदनशील काळात केलेली भक्ती अधिक फलदायी ठरते आणि याच भक्तीच्या बळावर तुमचा उद्याचा यशाचा दिवस निश्चित होतो.

म्हणून, वाईट घडणाऱ्या घटनांनी घाबरू नका. धीर धरा, कारण हा काळ लवकरच संपणार आहे. तुमच्या या कठीण काळात तुम्ही केलेली निष्ठा आणि मेहनत, हेच तुमच्या उद्याच्या मोठ्या यशाचा पायारू आहे, हे निश्चित. त्याबरोबरच यशस्वी होण्याचे सूत्र म्हणजे अपयशाने खचू नका आणि यशाने हुरळून जाऊ नका. जी परिस्थिती असेल तिच्याकडे तटस्थ भावनेने बघायला शिका. कारण आज यश असेल तर उद्या अपयश मिळणारच आणि आज अपयश मिळाले असेल तर उद्या यश मिळणारच!

English
हिंदी सारांश
Web Title : Lifelesson: Premanand Maharaj's 3 tips to uplift your spirit.

Web Summary : Spiritual guru Premanand Maharaj advises viewing failures as preparation for future success. Hardships refine individuals, revealing flaws and strengthening resolve. He suggests unwavering faith, dedicated work, and increased devotion during tough times guarantee ultimate success. Don't be disheartened by failures; they are stepping stones.
टॅग्स :spiritualअध्यात्मिक