शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Lifelesson: प्रेमानंद महाराजांच्या 'या' ३ सूचना, तुमच्या मनाला उभारी देतील हे नक्की!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 11:56 IST

Lifelesson: माझ्या नशिबात सगळं वाईटच लिहिलंय असं ज्यांना वाटतं त्यांनी अध्यात्मिक गुरु प्रेमानंद महाराजांनी सांगितलेल्या तीन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. 

जीवनात सतत नकारात्मक आणि वाईट गोष्टींचा अनुभव येत असेल, तर मन खचून जाणे, निराश होणे स्वाभाविक आहे. अनेकांना असे वाटू लागते की आपल्या नशिबात सगळे वाईटच लिहिले गेले आहे. जेव्हा तुम्ही मेहनत करता आणि तरीही अपयश पदरी येते, तेव्हा 'माझ्या बाबतीतच असे का घडते?' हा प्रश्न मनात येतो. अशा वेळी, वृंदावनचे आध्यात्मिक गुरु प्रेमानंद महाराज आपल्याला एक अतिशय मोलाचा आणि दिलासा देणारा उपदेश देतात, जो या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतो.

आठवड्याची सुरुवात गजकेसरी योगाने; करिअर, कमाईत ६ राशींना मिळणार भरघोस फायदे!

महाराज सांगतात की, आयुष्यात जे काही घडते, ते काही वाईट नसते; तर ती ईश्वराची तयारी असते. ते ठामपणे सांगतात, "आज जर तुम्हाला अपयश मिळाले आहे, तर हे निश्चित समजा की उद्या तुम्हाला मोठे यश मिळणार आहे." ईश्वराचा नियम असा आहे की तो तुम्हाला कधीही तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त दु:ख देत नाही आणि तुमच्या मेहनतीचे फळ नक्कीच देतो. हे अपयश म्हणजे तुमच्या पुढील मोठ्या यशाची पूर्वतयारी आहे, हे लक्षात घ्या.

अपयशातूनच यशाचा पाया मजबूत होतो

महाराज आपल्या उपदेशात समजावून सांगतात की, मनुष्याला यश मिळण्यापूर्वी कठीण परीक्षांना सामोरे जावे लागते. जसे सोन्याला अग्नीत तापवल्याशिवाय त्याला खरी किंमत आणि तेज मिळत नाही, तसेच जीवनातील संकट आणि अपयश माणसाला अधिक मजबूत बनवतात. जेव्हा तुम्ही अपयशी होता, तेव्हा तुमच्यातील दोष, त्रुटी आणि कमतरता तुम्हाला कळतात. या अडचणी तुम्हाला अधिक चांगले शिकवतात आणि तुम्हाला मोठे यश पेलण्यासाठी तयार करतात. हे संकट म्हणजे तुमच्या कर्माचे शुद्धीकरण असते, ज्यामुळे तुमचा मार्ग निष्कंटक होतो.

Astro Tips: वैवाहिक सुखासाठी नवरा बायकोने दर शनिवारी लवंगीने दृष्ट कशी काढावी? वाचा 

अपयशाने खचून जाल तेव्हा पुढील तीन गोष्टी करा :

१. कर्म आणि कर्तव्य: तुमचे वर्तमान कार्य किंवा कर्म निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करत राहा. फळाची चिंता करू नका, कारण तुमचे कर्म कधीही व्यर्थ जात नाही.

२. श्रद्धा आणि संयम: हा कठीण काळ लवकरच निघून जाईल, यावर पूर्ण श्रद्धा ठेवा. परमेश्वराने तुमच्यासाठी याहून काहीतरी मोठे आणि चांगले नियोजित केले आहे, म्हणून संयम ठेवा.

३. उपासना आणि नामस्मरण: या कठीण काळात परमेश्वराचे नामस्मरण आणि उपासना वाढवा. महाराजांच्या मते, संवेदनशील काळात केलेली भक्ती अधिक फलदायी ठरते आणि याच भक्तीच्या बळावर तुमचा उद्याचा यशाचा दिवस निश्चित होतो.

म्हणून, वाईट घडणाऱ्या घटनांनी घाबरू नका. धीर धरा, कारण हा काळ लवकरच संपणार आहे. तुमच्या या कठीण काळात तुम्ही केलेली निष्ठा आणि मेहनत, हेच तुमच्या उद्याच्या मोठ्या यशाचा पायारू आहे, हे निश्चित. त्याबरोबरच यशस्वी होण्याचे सूत्र म्हणजे अपयशाने खचू नका आणि यशाने हुरळून जाऊ नका. जी परिस्थिती असेल तिच्याकडे तटस्थ भावनेने बघायला शिका. कारण आज यश असेल तर उद्या अपयश मिळणारच आणि आज अपयश मिळाले असेल तर उद्या यश मिळणारच!

English
हिंदी सारांश
Web Title : Lifelesson: Premanand Maharaj's 3 tips to uplift your spirit.

Web Summary : Spiritual guru Premanand Maharaj advises viewing failures as preparation for future success. Hardships refine individuals, revealing flaws and strengthening resolve. He suggests unwavering faith, dedicated work, and increased devotion during tough times guarantee ultimate success. Don't be disheartened by failures; they are stepping stones.
टॅग्स :spiritualअध्यात्मिक