शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

दृष्टी बदलली की सृष्टी बदलेल; जशी या शेठजींची बदलली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 08:00 IST

प्रश्नांचा विचार करू नका. उत्तर शोधण्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न करा. प्रश्न आपोआप सुटतील.

'चष्मा बदलो फिर देखो यारो' हे गाणे तुम्ही ऐकले असेल. गाण्याचा मतितार्थ सांगतो, की दृष्टी बदलली की सृष्टी बदलते. दृष्टी बदलण्यासाठी चष्म्याचा उपयोग होऊ शकतो का? की दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे? त्यासाठी पुढील गोष्ट वाचा... 

एक शेठजी होते. पैशांचा त्यांना प्रचंड माज होता. आपल्या अहंकारापुढे ते कोणालाही नीट वागवत नसत. त्यामुळे लोकांमध्ये मिसळणे दूरच, त्यांचे कोणाशी फार बोलणे चालणेही नव्हते. 

शेठजींना वाचनाचा मोठा व्यासंग होता. नव्या ठिकाणी, नव्या देशी गेल्यावर तिथल्या संस्कृतीचे, साहित्याचे पुस्तक विकत घेत असत. घरी आल्यावर वाळवीच्या वेगाने पुस्तकांचा फडशा पाडत असत. 

वयोमानानुसार त्यांची दृष्टी हळू हळू कमकुवत होत होती. त्यांनी डॉक्टरांना समस्या सांगितली. शेठजींची श्रीमंती पाहून डॉक्टर वाट्टेल तो उपाय सुचवू लागले आणि शेठजी डोळे बंद करून विश्वास ठेवू लागले. अनेक डॉक्टर झाले, अनेक औषधोपचार झाले, पण गुण येईना. शेठजी निराश झाले. त्यांना आणखी एका डॉक्टरांचा पत्ता मिळाला. शेठजींनी त्या डॉक्टरांनाही गाठले. 

अति वाचनामुळे दृष्टीवर ताण आला असल्याचे त्यांना जाणवले. त्यांनी शेठजींना साहित्यिक भाषेत उपाय सांगितला, ' शेठजी, पुढील काही दिवस तुम्ही फक्त हिरवा रंग पहायचा.' 

पुढचे काही ऐकण्याआधी शेठजी उपचार शुल्क देऊन रवाना झाले. त्यांनी ठरवले आणि घरात जिथे नजर जाईल तिथे हिरवळ दिसेल अशी व्यवस्था करवून घेतली. अंगणापेक्षा घरातच फुलझाडांनी गर्दी केली. परंतु फारसा फरक पडला नाही. मग शेठजींनी घराच्या भिंती हिरव्या रंगाच्या करायचे ठरवून घेतले. रंगारी बोलावले आणि हिरवा रंग मारायला सांगितला. सगळ्या घराला एकसारखा रंग, या विचाराने रंगारी गोंधळला. त्याने भीतभीत शेठजींना कारण विचारलं. त्यावर शेठजी म्हणाले, मला दृष्टिशोध दूर करण्यासाठी डॉक्टरांनी हिरवा रंग बघायला सांगितलं आहे. 

त्यावर रंगारी हसून म्हणाला, अहो शेठजी हिरवा रंग दिसला पाहिजे म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त निसर्गाच्या सान्निध्यात राहिले पाहिजे. तुम्ही केलेले खटाटोप व्यर्थ आहेत. एवढी रंग रंगोटी करण्यापेक्षा हिरवा गॉगल लावला असता, तर सगळं जग आपोआप हिरवे दिसले असते. रंगारीच्या बोलण्याचा मतितार्थ कळला आणि शेठजींना स्वतःचेच हसू आले. 

म्हणून प्रश्नांचा विचार करू नका. उत्तर शोधण्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न करा. प्रश्न आपोआप सुटतील.