शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव अन् चातुर्मासाची सांगता; वाचा, महत्त्व, मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 07:00 IST

Kartiki Ekadashi 2023 Date: कार्तिकी एकादशी अनेकार्थाने महत्त्वाची मानली जाते. का साजरा केला जातो विष्णुप्रबोधोत्सव? जाणून घ्या, डिटेल्स...

Kartiki Ekadashi 2023: नोव्हेंबर महिना अनेकार्थाने महत्त्वाचा मानला जात आहे. नोव्हेंबर महिन्यात वर्षातील मोठा आणि महत्त्वाचा मानला गेलेला दिवाळीचा सण, दीपोत्सव मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात देशभरात साजरा करण्यात आला. दिवाळी झाल्यानंतर आता कार्तिकी एकादशीचे वेध लागले आहेत. याला प्रबोधिनी एकादशी किंवा विष्णुप्रबोधोत्सव असेही म्हटले जाते. आषाढी एकादशीपासून सुरू झालेल्या चातुर्मासाची कार्तिकी एकादशीला सांगता होत आहे. कार्तिकी एकदशी कधी आहे? तारीख, महत्त्व आणि काही मान्यता जाणून घेऊया... (Kartiki Ekadashi 2023 Date)

आषाढी एकादशीप्रमाणे कार्तिकी एकादशीलाही हजारो वारकरी वारी करतात. विठ्ठल दर्शनाची ओढ भाविकांना लागलेली असते. आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशीचा कालावधी चातुर्मास म्हणून ओळखला जातो. कार्तिकी एकादशी अनेकार्थाने महत्त्वाची मानली जाते. यंदा श्रावण महिना अधिक असल्याने चातुर्मासाचा कालावधी पाच महिन्यांचा झाला होता. कार्तिकी एकादशीला चातुर्मासाची सांगता होत आहे. आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशींच्या दरम्यान चातुर्मास पाळला जातो. यंदा सन २०२३ मध्ये गुरुवार, २३ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. (Kartiki Ekadashi 2023 Significance)

विष्णुशयन ते विष्णुप्रबोधोत्सव

कार्तिक महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशी प्रबोधिनी एकादशी म्हणून साजरी केली जाते. दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते, तर उत्तरायण हा देवांचा दिवस. कर्क संक्रांत आषाढ मासात येते; म्हणूनच आषाढ शुद्ध एकादशीस 'देवशयनी एकादशी' म्हटले आहे; त्या दिवशी देव झोपी जातात, अशी समजूत रूढ आहे. कार्तिक शुद्ध एकादशीस देव झोप घेऊन जागृत होतात; म्हणून तिला 'प्रबोधिनी (बोधिनी, देवोत्थानी) एकादशी' असे म्हटले जाते. नवसृष्टीनिर्मिती हे ब्रह्मदेवाचे कार्य सुरू असताना पालनकर्ता श्रीविष्णु निष्क्रिय असतो; म्हणून चातुर्मासास विष्णुशयन म्हटले जाते. आषाढ शुद्ध एकादशीला विष्णुशयन, तर कार्तिक शुद्ध एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णुप्रबोधोत्सव साजरा केला जातो. (Prabodhini Ekadashi 2023 Vishnu Prabodh Utsav)

कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते पौणिमेपर्यंत तुलसी विवाह

कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौणिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशीचा श्री कृष्णाशी विवाह लावण्याची पद्धत आहे. तुलसी विवाह केल्यास कन्यादानाचे पुण्य मिळते व मोक्ष प्राप्ती होते, अशी मान्यता आहे. भारतीय संस्कृतीत तुळशीला फार महत्व आहे. श्रीविष्णूला तुळस प्रिय असल्यामुळे तिला हरिप्रिया असेही संबोधले जाते. तुळशीवाचून केलेली विष्णूची पूजा व्यर्थ ठरते असे पद्मपुराणात म्हटले आहे. समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघाले, तेंव्हा त्याचे थेंब जमिनीवर पडले, त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला, असे मानले जाते. तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रते घेतलेली असतील त्या सर्वांचे उद्यापन केले जाते.

 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमspiritualअध्यात्मिकPandharpur Wariपंढरपूर वारी