शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
3
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
4
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
5
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
6
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
7
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
8
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
9
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
10
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
12
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
13
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
14
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
16
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
17
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
18
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
19
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
20
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा

कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव अन् चातुर्मासाची सांगता; वाचा, महत्त्व, मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 07:00 IST

Kartiki Ekadashi 2023 Date: कार्तिकी एकादशी अनेकार्थाने महत्त्वाची मानली जाते. का साजरा केला जातो विष्णुप्रबोधोत्सव? जाणून घ्या, डिटेल्स...

Kartiki Ekadashi 2023: नोव्हेंबर महिना अनेकार्थाने महत्त्वाचा मानला जात आहे. नोव्हेंबर महिन्यात वर्षातील मोठा आणि महत्त्वाचा मानला गेलेला दिवाळीचा सण, दीपोत्सव मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात देशभरात साजरा करण्यात आला. दिवाळी झाल्यानंतर आता कार्तिकी एकादशीचे वेध लागले आहेत. याला प्रबोधिनी एकादशी किंवा विष्णुप्रबोधोत्सव असेही म्हटले जाते. आषाढी एकादशीपासून सुरू झालेल्या चातुर्मासाची कार्तिकी एकादशीला सांगता होत आहे. कार्तिकी एकदशी कधी आहे? तारीख, महत्त्व आणि काही मान्यता जाणून घेऊया... (Kartiki Ekadashi 2023 Date)

आषाढी एकादशीप्रमाणे कार्तिकी एकादशीलाही हजारो वारकरी वारी करतात. विठ्ठल दर्शनाची ओढ भाविकांना लागलेली असते. आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशीचा कालावधी चातुर्मास म्हणून ओळखला जातो. कार्तिकी एकादशी अनेकार्थाने महत्त्वाची मानली जाते. यंदा श्रावण महिना अधिक असल्याने चातुर्मासाचा कालावधी पाच महिन्यांचा झाला होता. कार्तिकी एकादशीला चातुर्मासाची सांगता होत आहे. आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशींच्या दरम्यान चातुर्मास पाळला जातो. यंदा सन २०२३ मध्ये गुरुवार, २३ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. (Kartiki Ekadashi 2023 Significance)

विष्णुशयन ते विष्णुप्रबोधोत्सव

कार्तिक महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशी प्रबोधिनी एकादशी म्हणून साजरी केली जाते. दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते, तर उत्तरायण हा देवांचा दिवस. कर्क संक्रांत आषाढ मासात येते; म्हणूनच आषाढ शुद्ध एकादशीस 'देवशयनी एकादशी' म्हटले आहे; त्या दिवशी देव झोपी जातात, अशी समजूत रूढ आहे. कार्तिक शुद्ध एकादशीस देव झोप घेऊन जागृत होतात; म्हणून तिला 'प्रबोधिनी (बोधिनी, देवोत्थानी) एकादशी' असे म्हटले जाते. नवसृष्टीनिर्मिती हे ब्रह्मदेवाचे कार्य सुरू असताना पालनकर्ता श्रीविष्णु निष्क्रिय असतो; म्हणून चातुर्मासास विष्णुशयन म्हटले जाते. आषाढ शुद्ध एकादशीला विष्णुशयन, तर कार्तिक शुद्ध एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णुप्रबोधोत्सव साजरा केला जातो. (Prabodhini Ekadashi 2023 Vishnu Prabodh Utsav)

कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते पौणिमेपर्यंत तुलसी विवाह

कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौणिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशीचा श्री कृष्णाशी विवाह लावण्याची पद्धत आहे. तुलसी विवाह केल्यास कन्यादानाचे पुण्य मिळते व मोक्ष प्राप्ती होते, अशी मान्यता आहे. भारतीय संस्कृतीत तुळशीला फार महत्व आहे. श्रीविष्णूला तुळस प्रिय असल्यामुळे तिला हरिप्रिया असेही संबोधले जाते. तुळशीवाचून केलेली विष्णूची पूजा व्यर्थ ठरते असे पद्मपुराणात म्हटले आहे. समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघाले, तेंव्हा त्याचे थेंब जमिनीवर पडले, त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला, असे मानले जाते. तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रते घेतलेली असतील त्या सर्वांचे उद्यापन केले जाते.

 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमspiritualअध्यात्मिकPandharpur Wariपंढरपूर वारी