शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

Janmashtami 2022: युद्ध संपल्यावर श्रीकृष्ण रथातून आधी उतरले असते, तर अर्जुनाचा मृत्यू निश्चित होता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 13:11 IST

Janmashtami 2022: आपल्याही जीवन रथाचे सारथ्य श्रीकृष्णाने करावे असे वाटत असेल तर त्याची पार्श्वभूमीसुद्धा माहीत असायला हवी!

आज जन्माष्टमी. भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस. त्याने आठवा अवतार घेतला तो भक्त रक्षणासाठी! भगवंत आपल्या भक्तासाठी वाट्टेल ते करतो. कारण भक्ताचीसुद्धा भगवंतप्रति तेवढी दृढ भक्ती असते. त्याच्या प्रेमाखातर तो कधी त्याचा सेवक होतो, तर कधी मार्गदर्शक. मग तो आपल्या मदतीला कधीच का येत नाही, असा आपल्याला प्रश्न पडतो. त्याचे कारण म्हणजे आपण तितक्या आर्ततेने त्याला हाक मारतच नाही. तरीसुद्धा तो न बोलवता आपल्याला मदत पुरवत असतो. आपल्याला ती कधी ओळखता येते, तर कधी येत नाही. कधी कधी आपल्या अडचणीच्या वेळी अनपेक्षित पणे येऊन कोणी आपली मदत करून जातो, तेव्हा आपल्या तोंडून सहज निघून जाते, 'देवासारखा धावून आलास बघ!' देवाच्या ठायी आपली श्रद्धा दृढ असेल, तर देवाच्या मदतीची प्रचिती आपल्याला वारंवार येत राहील. जशी अर्जुनाला वेळोवेळी आली. 

महाभारतयुद्ध संपले आणि अर्जुनाने आदराने नम्रतेने त्या क्षणी भगवान श्रीकृष्णांना त्यांचा मान राखण्यासाटी रथामधून आधी उतरण्याची विनंती केली. परंतु भगवंतांनी मात्र एक वेगळेच हास्य करून त्या विनंतीला नकार दिला. अर्थातच अर्जुन आधी खाली उतरला. पाठोपाठ श्रीकृष्ण उतरले आणि अर्जुनाला आश्चर्याचा धक्का बसला. कारण, सबंध रथ भगवंताचा पदस्पर्श सुटताच धडाधड जळून गेला.

पहिले अठरा दिवस मात्र त्या रथाला काहीही झाले नाही. उघड आहे. कौरवांच्या दुष्ट प्रवृत्तींनी वेढून राहिलेल्या त्या रथावरील वासनांचा ज्वालामुखी, जो अर्जुनाला कोणत्याही क्षणी जाळू शकला असता, तो भगवंतांनी आपल्या दिव्य शक्तींनी अडवून धरला होता. युद्ध संपले होते. अर्थातच रथाची गरज संपली होती. म्हणून केवळ भगवंतांनी अर्जुनाला आधी खाली उतरवले. भक्ताचा अभिमान असणारा भगवंत त्याच्या रक्षणार्थ वेळप्रसंगी उत्कृष्ट सारथी होतो आणि त्याच्या प्राणांचे अशा प्रकारे रक्षण करतो. समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकात म्हणतात,

विधीकारणे जाहला मत्स्य वेगी,धरी कुर्मरूपे धरा पृष्ठभागी,जना रक्षणाकारणे नीच योनी, नुपेक्षा कदा देव भक्ताभिमानी।। श्रीराम।।

 

टॅग्स :Janmashtamiजन्माष्टमीShravan Specialश्रावण स्पेशलMahabharatमहाभारत